शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

एकलहरे वीज प्रकल्प सुरू करण्यासाठी जनहित याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 6:41 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : येथील टप्पा क्रमांक एकमधील १४० मेगावॉटच्या दोन संचाचे लिलाव करून मोडीत काढू नये, जोपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : येथील टप्पा क्रमांक एकमधील १४० मेगावॉटच्या दोन संचाचे लिलाव करून मोडीत काढू नये, जोपर्यंत या दोन संचांच्या बदल्यात प्रस्तावित ६६० मेगावॉटचे काम प्रारंभ होत नाही तोवर टप्पा क्रमांक दोनमधील २१० मेगावॉटचे संच बंद करण्यात येऊ नये यासाठी उच्च न्यायालयात प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

२०११ मध्ये नाशिक औष्णिक वीज केंद्रातील दोन संच कालमर्यादा संपल्याने कायमस्वरूपी बंद करण्यात आले. या दोन संचांच्या बदल्यात ६६० मेगावॉटच्या बदली संचास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली होती, परंतु त्यास खीळ बसली. हा प्रस्तावित प्रकल्प सुरू करण्यासाठी बचाव संघर्ष समितीने पाठपुरावा केला, परंतु सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. मात्र ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रकल्प नाशिकलाच होईल, असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात भुसावळ ६६० मेगावॉटला मंजुरी मिळून कामही सुरू झाले. उमरेड नागपूर येथे ८०० मेगावॉटच्या दोन संचांना परवानगी मिळाली. नंतर हे संच कोराडी येथे ६६० मेगावॉट हलविण्यात आले. परंतु एकलहरे प्रकल्पाबाबत काहीच हालचाल झाली नसल्याचे पाहून अखेर जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत म्हटले आहे की, एकलहरे येथील सार्वजनिक उपक्रम बंद न करता त्याचे संवर्धन व वाढीसाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात यावेत, मंजूर संचाची उभारणी होत नाही तोवर जुने संच आर अ‍ॅन्ड एम करून कार्यान्वयीत ठेवण्यात यावे, औष्णिक वीज केंद्रासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर फक्त औष्णिक प्रकल्प उभारण्यात यावा, सौर प्रकल्प केल्यास लाखो विविध जातींच्या वृक्षांची तोड करावी लागेल, मंजूर प्रकल्पाची उभारणी न केल्यास त्यावर अवलंबून असलेले २५ ते ३० हजार लोक बेरोजगार होतील, असे मुद्दे मांडण्यात आले असून, न्यायालयात ही याचिका दाखल करून घेण्यात आली आहे.चौकट====आधीच्या आघाडी सरकारचे खासगी उद्योगांशी हितसंबंध असल्याने या प्रकल्पास वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. युती सरकारनेही प्रांतवाद करून विदर्भाचा विकास साधला. त्यामुळेच शेवटी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला आहे.- शंकरराव धनवटे, अध्यक्ष, प्रकल्प बचाव संघर्ष समिती

टॅग्स :Energy Budget 2018ऊर्जा बजेट 2018Nashikनाशिक