शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

नाशिक महापालिकेच्या पाय-यांवर होणा-या आंदोलनांमुळे नागरिकांना प्रवेश अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 15:44 IST

सुरक्षा रक्षकांची बघ्याची भूमिका : दीड कोटी रुपये खर्चून ४५ सुरक्षा रक्षकांची नेमणूक

ठळक मुद्दे४५ सुरक्षारक्षकांपैकी २९ सुरक्षारक्षकांची नेमणूक राजीव गांधी भवनमध्येकाही महिन्यांपासून काही आंदोलकांकडून आतील प्रवेशद्वारावर धडक मारत पाय-यांवर बसून निदर्शने केली जाण्याचे प्रकार वाढीस

नाशिक - महापालिकेत वार्षिक दीड कोटी रुपये खर्चून शस्त्रधारी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली परंतु, या सुरक्षारक्षकांच्या तैनातीनंतरही महापालिकेच्याराजीव गांधी भवनच्या आतील प्रवेशद्वारावरील पाय-यांवर आंदोलक धडक मारत असल्याने विविध कामकाजासाठी येणा-या नागरिकांना मुख्यालयात प्रवेश करणे अवघड बनत आहे. वाट बंद करून टाकणा-या या आंदोलकांना आवरण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने आंदोलकांचेही फावते आहे.महापालिका मुख्यालयात राजीव गांधी भवनमध्ये महाराष्ट सुरक्षारक्षक मंडळाचे शस्त्रधारी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. एकूण ४५ सुरक्षारक्षकांपैकी २९ सुरक्षारक्षकांची नेमणूक राजीव गांधी भवनमध्ये करण्यात आलेली आहे. राजीव गांधी भवनच्या मुख्य प्रवेशद्वारासह आतील प्रवेशद्वारावरही हे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. दरम्यान, महापालिकेवर विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष-संघटनांचे मोर्चे येत असतात तर काही संघटनांकडून पालिकेसमोर धरणे, निदर्शने तसेच ठिय्या आंदोलने केली जात असतात. महापालिका मुख्यालयावर येणारे मोर्चे हे बाहेरील प्रवेशद्वारावरच अडवले जातात आणि त्यातील निवडक आंदोलकांना आतमध्ये निवेदने देण्याकरीता प्रवेश दिला जातो. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून काही आंदोलकांकडून आतील प्रवेशद्वारावर धडक मारत पाय-यांवर बसून निदर्शने केली जाण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे विविध कामकाजानिमित्त महापालिका मुख्यालयात येणा-या नागरिकांची वाट अडवली जाते आणि त्यांना पूर्व दरवाजाने पाठविले जाते. ब-याचदा नागरिकांना वाट काढणे मुश्किल बनते. मंगळवारी (दि.२) गंजमाळवरील श्रमिकनगर मधील पाच ते सात आंदोलकांनी घरकुलाच्या मागण्यांसाठी पाय-यांवर ठिय्या मांडला आणि घोषणाबाजी सुरू केली. सदर आंदोलकांना रस्त्यातून बाजूला करण्याचे काम सुरक्षा रक्षकांकडून होणे अपेक्षित होते अथवा त्यातील पाच जणांना आतमध्ये निवेदन देण्यासाठी पाठवून देत आंदोलनाची इतिश्री करणे सोपे होते. परंतु, सुरक्षारक्षकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने मुख्यालयात ये-जा करणा-या नागरिकांना गैरसोय सहन करावी लागली. सदर आंदोलकांनी पाय-यांवर बसून वाट अडवल्याने त्या काळात आलेल्या दोघा अपंग बांधवांना वाट काढणे मुश्किल बनले होते. महापालिकेने एकीकडे अपंग बांधवांसाठी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर व्हीलचेअर उपलब्ध करुन दिल्याचा दावा केला आहे परंतु, प्रत्यक्षात व्हीलचेअर मात्र दिसून येत नाही. महापालिकेवर होणा-या विविध आंदोलनांप्रसंगी सामान्य नागरिकांना मुख्यालयात प्रवेश करताना अडचणी येणार नाहीत, अशा प्रकारचे नियोजन होण्याची गरज असल्याची भावना यावेळी काही नागरिकांनी बोलून दाखविली.श्रमिकनगर रहिवाशांची निदर्शनेश्रमिकनगर येथील झोपडपट्टी स्थलांतरीत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. झोपडपट्टीतील रहिवाशांना चुंचाळे येथील घरकुल योजनेत सामावून घेतले जाणार आहे. परंतु, रहिवाशांना जवळपासच घरकुल देण्याच्या मागणीसाठी श्रमिकनगर रहिवाशी संघाच्यावतीने दीपक डोके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना आयुक्तांची भेट नाकारल्याने आंदोलकांनी पाय-यांवर ठिय्या मांडून निषेध नोंदविला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाagitationआंदोलन