शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आरोग्यावर पाच टक्क्यांपर्यंत हवी तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:47 AM

अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा माणसाच्या मानला जातात. याचप्रमाणे आरोग्यालाही महत्त्व दिले गेले पाहिजे. विकसित देशांनी आरोग्याला तितकेच महत्त्व देत त्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पात भरीव तरतूद आरोग्य खर्चासाठी केली आहे.

नाशिक : अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा माणसाच्या मानला जातात. याचप्रमाणे आरोग्यालाही महत्त्व दिले गेले पाहिजे. विकसित देशांनी आरोग्याला तितकेच महत्त्व देत त्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पात भरीव तरतूद आरोग्य खर्चासाठी केली आहे. त्या तुलनेत भारत कमालीचा पिछाडीवर आहे. देशाची आरोग्यसेवा अधिकाधिक बळकट करण्यासाठी आरोग्यावरील खर्चाची तरतूद किमान पाच टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी वैद्यकीय व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे.शासकीय आरोग्यसेवा बळकट करावीआरोग्यावरील खर्चाची तरतूद सर्वप्रथम ५ टक्के करावी. मूलभूत गरजांमध्ये आरोग्याचा समावेश मानला जावा. शासकीय आरोग्यव्यवस्था सुधारण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न केले जावे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, तालुका व जिल्हा रुग्णालयांमधील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरली जावी. यासाठी अर्थसंकल्पात योग्य त्या तरतुदी करून त्याची अंमलबजावणी केली जावी. जिल्हानिहाय शासकीय पदवी व पदव्युत्तर महाविद्यालये सुरू करण्याबाबत विचार होणे काळाची गरज आहे.- डॉ. प्रशांत देवरे, अध्यक्ष, आयएमए, नाशिकआरोग्यावरील खर्चाची मर्यादा वाढवावीआरोग्यावरील खर्चाची मर्यादा वाढविली पाहिजे. देशाच्या आरोग्यक्षेत्राच्या गरजा मोठ्या असून, त्यादृष्टीने अर्थसंकल्पात तरतुदींची आवश्यकता आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढविणेही तितकेच गरजेचे आहे. सरकारने शासकीय आरोग्यव्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी अर्थसंकल्पात योग्य  त्या तरतुदी कराव्या.  खासगी वैद्यकीय क्षेत्रावरील वाढता भार लक्षात घेता,लहान रुग्णालये, नर्सिंग  होम, प्रसूतीगृहांना अधिकाधिक पाठिंबा  देणे आवश्यक आहे.- डॉ. हेमंत सोननीस, उपाध्यक्ष, आयएमए, नाशिकआपत्कालीन उद्भवणाऱ्या आजारांचा विचार व्हावासरकारने आपत्कालीन वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन अचानकपणे उद्भवणाºया साथीच्या आजारांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व औषधोपचाराबाबत अर्थसंकल्पात विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी औषधे, लसींवरील खर्चाच्या तरतुदी केल्या जाव्या. औषधांवरील खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी किमती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात. तसेच जीवनशैली सुधार कार्यक्रम राष्टय पातळीवर अधिक वाढविण्यावर भर दिला जावा.- डॉ. विकास गोगटे, फॅमिली फिजिशियनवैद्यकीय साहित्य, औषधांच्या किमतींवर नियंत्रण हवेआरोग्यासाठी आवश्यक त्या तरतुदींचा सरकारने विचार करायला हवा. वाढत्या औषधांच्या किमती नियंत्रणात कशा येतील, यासाठी अर्थसंकल्पात उपाययोजना कराव्या. जेणेकरून सर्वसामान्यांना रुग्णालयाचा खर्च झेपण्यास मदत होईल. वैद्यकीय साहित्यसामुग्रीवरील किमतींमध्ये घट झाल्यास रुग्णालयांचा खर्च कमी होईल. त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होईल. शासकीय आरोग्ययंत्रणा बळकट करण्यासाठी सरकारने आवश्यक उपाययोजना कराव्यात. - डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पHealthआरोग्य