शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
2
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
3
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
4
भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
5
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
6
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
7
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
8
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
9
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
10
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
11
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
12
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
13
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
14
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
15
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
16
२७ जागांवर वंचित कुणाचा करणार 'गेम', महापालिका निवडणुकीत ५३ उमेदवार उतरवले रिंगणात
17
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
18
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
19
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
20
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्षीच्या ऑगस्टपर्यंत पाणी पुरवा; पालकमंत्री दादा भुसेंच्या प्रशासनाला सूचना

By sandeep.bhalerao | Updated: November 7, 2023 14:49 IST

नाशिक जिल्ह्यात यंदा ७० ते ७५ टक्के इतकाच पाऊस झाला असून धरणे देखील मागीलवर्षी पेक्षा कमी भरली आहेत.

संदीप भालेराव, नाशिक: जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेला पाणीसाठा आणि पाण्यासाठी असलेली मागणी यांचा विचार करता यंदा पाणी नियोजनासाठी जिल्ह्याला कसरत करावी लागणार आहे. दरवर्षी साधारणपणे जुलै अखेरपर्यंतचे नियोजन करावे लागते. परंतु पुढीलवर्षीसाठी ऑगस्ट पर्यत पाणी पुरेल यासाठी नियोजन करावे लागणार आहे. याबाबतच्या सुचना पालकमंत्री दादा भूसे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

नाशिक जिल्ह्यात यंदा ७० ते ७५ टक्के इतकाच पाऊस झाला असून धरणे देखील मागीलवर्षी पेक्षा कमी भरली आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील लघु आणि मध्यम धरणांमधील पाण्याचा साठा ८३ टक्के इतका आहे. त्यातच जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश असल्याने जिल्ह्यातील पाणी वाचविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी जलसंपदा विभागाला नियोजनासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. 

यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने, जिल्ह्यातील पाणीसाठा कमी आहे. पर्जन्यमानाची परिस्थिती बदलत असल्याचे पालकमंत्री दादा भूसे यांनी पाणी नियोजन बैठकीत सांगितले.  परतीचा पाऊसही यंदा होऊ शकला नाही. त्यामुळे निश्चित पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. यापूर्वी  जुलैअखेरपर्यंत आपण नियोजन केले जात होते यंदाची परिस्थिती पाहता, ऑगस्टअखेरपर्यंत नियोजन करावे लागणार असल्याच्या सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रशासनाला दिल्या.

टॅग्स :Waterपाणी