शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

पुढील वर्षीच्या ऑगस्टपर्यंत पाणी पुरवा; पालकमंत्री दादा भुसेंच्या प्रशासनाला सूचना

By sandeep.bhalerao | Updated: November 7, 2023 14:49 IST

नाशिक जिल्ह्यात यंदा ७० ते ७५ टक्के इतकाच पाऊस झाला असून धरणे देखील मागीलवर्षी पेक्षा कमी भरली आहेत.

संदीप भालेराव, नाशिक: जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेला पाणीसाठा आणि पाण्यासाठी असलेली मागणी यांचा विचार करता यंदा पाणी नियोजनासाठी जिल्ह्याला कसरत करावी लागणार आहे. दरवर्षी साधारणपणे जुलै अखेरपर्यंतचे नियोजन करावे लागते. परंतु पुढीलवर्षीसाठी ऑगस्ट पर्यत पाणी पुरेल यासाठी नियोजन करावे लागणार आहे. याबाबतच्या सुचना पालकमंत्री दादा भूसे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

नाशिक जिल्ह्यात यंदा ७० ते ७५ टक्के इतकाच पाऊस झाला असून धरणे देखील मागीलवर्षी पेक्षा कमी भरली आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील लघु आणि मध्यम धरणांमधील पाण्याचा साठा ८३ टक्के इतका आहे. त्यातच जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश असल्याने जिल्ह्यातील पाणी वाचविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी जलसंपदा विभागाला नियोजनासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. 

यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने, जिल्ह्यातील पाणीसाठा कमी आहे. पर्जन्यमानाची परिस्थिती बदलत असल्याचे पालकमंत्री दादा भूसे यांनी पाणी नियोजन बैठकीत सांगितले.  परतीचा पाऊसही यंदा होऊ शकला नाही. त्यामुळे निश्चित पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. यापूर्वी  जुलैअखेरपर्यंत आपण नियोजन केले जात होते यंदाची परिस्थिती पाहता, ऑगस्टअखेरपर्यंत नियोजन करावे लागणार असल्याच्या सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रशासनाला दिल्या.

टॅग्स :Waterपाणी