शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२ आॅक्टोबरला लोकप्रतिनिधींच्या घरासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 01:16 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या शनिवारी (दि.२६) नाशकात दिवसभर झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २ आॅक्टोबर रोजी आमदार, खासदार यांच्या घरासमोर निदर्शने व ५ आॅक्टोबर रोजी राज्यातील जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांसमोर धरणे धरण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या शनिवारी (दि.२६) नाशकात दिवसभर झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २ आॅक्टोबर रोजी आमदार, खासदार यांच्या घरासमोर निदर्शने व ५ आॅक्टोबर रोजी राज्यातील जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांसमोर धरणे धरण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीत प्रत्येक ग्रामपंचायतमार्फत मोर्चाने अधिकृतरीत्या दिलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे, २ आॅक्टोबरला खासदार व आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणे, मोर्चातील तरुणांवर दाखल गुन्हे मागे घेणे, सन २०१९ मध्ये एमपीएससीमध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांची निवड संरक्षित करणे, अतिवृष्टीची नुकसानभरपाई द्यावी आदी विविध ठराव करण्यात आले. सर्व स्तरातून येणाºया निवेदनाचा मसुदा एकसारखा असावा, प्रत्येक विषयासाठी अभ्यास तज्ज्ञांची विषयानुरूप वेगवेगळी समिती स्थापन करावी, राज्य शासनाने राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे एसइबीसी प्रवर्ग १०२ घटना दुरुस्तीनुसार नोटिफाय करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवावा, राज्य शासनाने केंद्र शासनाला राज्य घटनेमध्ये दुरुस्ती करून ५० टक्क्यांची मर्यादा रद्द/संपविण्यासाठी विनंती प्रस्ताव पाठवावा, राज्य सरकारने आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत वाढीव जागांची तरतूद (सुपर न्युमररी) करून आर्थिक तरतूद करावी, सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडणाºया ज्येष्ठ वकिलांना ब्रिफिंग करण्यासाठी सुचवलेल्या वकिलांची समिती तत्काळ गठीत करण्यात यावी, आरक्षणाचा प्रश्न घटना दुरुस्तीमुळे सुटणार असल्याने केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी दिल्लीमध्ये मराठा क्रांती मोर्चा आयोजित केला जावा, ज्या योजनांबाबत सरकारने घोषणा केल्या आहेत. त्यांची तत्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे, आठ ते दहा लोकांची समिती नियुक्त करून त्या समितीलाच शासन प्रशासनाशी चर्चा करण्याचे अधिकार द्यावेत, मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत, आंदोलनाबाबत माध्यमांना माहिती देण्यासाठी अधिकृत अभ्यासू प्रवक्ते नियुक्त करावेत, त्यांनीच माध्यमांशी संवाद करावा, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी, भविष्यातील कुठलेही आंदोलन शांततेच्या मार्गाने व्हावे. मराठा क्रांती मोर्चाची परंपरा कायम राखावी, आदी विविध महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले.कुठल्याही मागासवर्ग समाजाच्या विरोधात क्रांती मोर्चा जाणार नाही, आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयीन लढ्यात सरकारची पर्यायाने समाजाची बाजू मांडण्यास अपयशी ठरलेले महाअधिवक्ता कुंभकोणी यांचे अधिकार काढून घ्यावेत, महाराष्ट्रात १० आॅक्टोबर रोजी होणाºया आंदोलनाशी महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाचा कुठलाही संबंध नाही, असेही शेवटी जाहीर करण्यात आले आहे.सारथीला एक हजार कोटींचा निधी द्याकेंद्र सरकारने मराठा आरक्षण स्थगितीची दखल न घेतल्यास दिल्लीवर क्रांती मोर्चा काढणे, येत्या ५ आॅक्टोबरला महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणे, सारथी संस्थेच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजीराजे यांची नियुक्ती करावी, सारथीला एक हजार कोटींचा निधी द्यावा, राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये मराठा समाजासाठी १२ टक्के जागा वाढवून त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.गटबाजी करणाऱ्यांना धडा शिकवा : छत्रपती संभाजीराजेमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनाची गरज तर आहेच; परंतु कायदेशीर लढादेखील महत्त्वाचा आहे, जे सोबत येणार नाहीत, त्यांना धडा शिकविण्याचे कामही समाजाने केले पाहिजे, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.च्आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर असून, त्यासाठी आंदोलन, जागृती गरजेची आहे, हा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे तेथे कायदेशीर लढावे लागणार आहे. समाजालादेखील या लढाईत सहभागी व्हावे लागणार आहे.च्मराठा आरक्षणासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक असून, समाजातील गटबाजी समाजानेच मोडून काढायला हवी, असे आवाहन त्यांनी केले तसेच आपण व उदयनराजे यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकMaratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती