शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

२ आॅक्टोबरला लोकप्रतिनिधींच्या घरासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 01:16 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या शनिवारी (दि.२६) नाशकात दिवसभर झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २ आॅक्टोबर रोजी आमदार, खासदार यांच्या घरासमोर निदर्शने व ५ आॅक्टोबर रोजी राज्यातील जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांसमोर धरणे धरण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या शनिवारी (दि.२६) नाशकात दिवसभर झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २ आॅक्टोबर रोजी आमदार, खासदार यांच्या घरासमोर निदर्शने व ५ आॅक्टोबर रोजी राज्यातील जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांसमोर धरणे धरण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीत प्रत्येक ग्रामपंचायतमार्फत मोर्चाने अधिकृतरीत्या दिलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे, २ आॅक्टोबरला खासदार व आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणे, मोर्चातील तरुणांवर दाखल गुन्हे मागे घेणे, सन २०१९ मध्ये एमपीएससीमध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांची निवड संरक्षित करणे, अतिवृष्टीची नुकसानभरपाई द्यावी आदी विविध ठराव करण्यात आले. सर्व स्तरातून येणाºया निवेदनाचा मसुदा एकसारखा असावा, प्रत्येक विषयासाठी अभ्यास तज्ज्ञांची विषयानुरूप वेगवेगळी समिती स्थापन करावी, राज्य शासनाने राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे एसइबीसी प्रवर्ग १०२ घटना दुरुस्तीनुसार नोटिफाय करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवावा, राज्य शासनाने केंद्र शासनाला राज्य घटनेमध्ये दुरुस्ती करून ५० टक्क्यांची मर्यादा रद्द/संपविण्यासाठी विनंती प्रस्ताव पाठवावा, राज्य सरकारने आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत वाढीव जागांची तरतूद (सुपर न्युमररी) करून आर्थिक तरतूद करावी, सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडणाºया ज्येष्ठ वकिलांना ब्रिफिंग करण्यासाठी सुचवलेल्या वकिलांची समिती तत्काळ गठीत करण्यात यावी, आरक्षणाचा प्रश्न घटना दुरुस्तीमुळे सुटणार असल्याने केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी दिल्लीमध्ये मराठा क्रांती मोर्चा आयोजित केला जावा, ज्या योजनांबाबत सरकारने घोषणा केल्या आहेत. त्यांची तत्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे, आठ ते दहा लोकांची समिती नियुक्त करून त्या समितीलाच शासन प्रशासनाशी चर्चा करण्याचे अधिकार द्यावेत, मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत, आंदोलनाबाबत माध्यमांना माहिती देण्यासाठी अधिकृत अभ्यासू प्रवक्ते नियुक्त करावेत, त्यांनीच माध्यमांशी संवाद करावा, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी, भविष्यातील कुठलेही आंदोलन शांततेच्या मार्गाने व्हावे. मराठा क्रांती मोर्चाची परंपरा कायम राखावी, आदी विविध महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले.कुठल्याही मागासवर्ग समाजाच्या विरोधात क्रांती मोर्चा जाणार नाही, आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयीन लढ्यात सरकारची पर्यायाने समाजाची बाजू मांडण्यास अपयशी ठरलेले महाअधिवक्ता कुंभकोणी यांचे अधिकार काढून घ्यावेत, महाराष्ट्रात १० आॅक्टोबर रोजी होणाºया आंदोलनाशी महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाचा कुठलाही संबंध नाही, असेही शेवटी जाहीर करण्यात आले आहे.सारथीला एक हजार कोटींचा निधी द्याकेंद्र सरकारने मराठा आरक्षण स्थगितीची दखल न घेतल्यास दिल्लीवर क्रांती मोर्चा काढणे, येत्या ५ आॅक्टोबरला महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणे, सारथी संस्थेच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजीराजे यांची नियुक्ती करावी, सारथीला एक हजार कोटींचा निधी द्यावा, राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये मराठा समाजासाठी १२ टक्के जागा वाढवून त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.गटबाजी करणाऱ्यांना धडा शिकवा : छत्रपती संभाजीराजेमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनाची गरज तर आहेच; परंतु कायदेशीर लढादेखील महत्त्वाचा आहे, जे सोबत येणार नाहीत, त्यांना धडा शिकविण्याचे कामही समाजाने केले पाहिजे, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.च्आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर असून, त्यासाठी आंदोलन, जागृती गरजेची आहे, हा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे तेथे कायदेशीर लढावे लागणार आहे. समाजालादेखील या लढाईत सहभागी व्हावे लागणार आहे.च्मराठा आरक्षणासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक असून, समाजातील गटबाजी समाजानेच मोडून काढायला हवी, असे आवाहन त्यांनी केले तसेच आपण व उदयनराजे यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकMaratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती