शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

ताम्र-पाषाणयुगाचा संरक्षित ‘वारसा’ होतोय नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:34 AM

उत्क्रांतीनंतर प्राचीन युगातील मानवाचे बदलत गेलेले राहणीमान, काळानुरूप त्याला अवगत होत गेलेल्या विविध कला, लागलेले शोध हे सर्व अद्भुतच आहे. त्यापैकी एक ताम्र-पाषाणयुगाची साक्ष देणारा भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित केलेला वारसा अर्थात काजीची गढी (जुनी मातीची गढी) हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

‘वारसा’ नाशिकचानाशिक : उत्क्रांतीनंतर प्राचीन युगातील मानवाचे बदलत गेलेले राहणीमान, काळानुरूप त्याला अवगत होत गेलेल्या विविध कला, लागलेले शोध हे सर्व अद्भुतच आहे. त्यापैकी एक ताम्र-पाषाणयुगाची साक्ष देणारा भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित केलेला वारसा अर्थात काजीची गढी (जुनी मातीची गढी) हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कालौघात निम्म्यापेक्षा अधिक गढी गोदावरी नदीच्या पाण्यात वाहून गेली आहे, मात्र याचे कोणालाही सोयरसुतक नाही.उत्क्र ांतीनुसार जसा मानव बदलत गेला, तसे त्याचे राहणीमानही बदलले. ताम्र, अश्म असे सर्वच युग हे आपापल्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण कलेसाठी ओळखले जातात. या प्रत्येक युगाची संस्कृती अद्वितीय राहिली आहे. अशाच काही युगांमधील मानवी वस्ती, ते वापरत असलेली मातीची भांडी, जळालेले लाकूड, हाडे, राखेचे ढिगारे, विहिरी, मातीपासून तयार केलेल्या भेंड्यांच्या भिंती, कोळसा झालेली भांडी, मातीची कौलं, काचेच्या बांगड्या, चकाकणारी भांडी जी आजपासून सुमारे २५०० ते ३५०० वर्षांपूर्वीची असावी आणि उत्खननादरम्यान ते पुरातत्त्व विभागाच्या हाती लागले.काजीच्या गढीवर ख्रिस्तपूर्व ५०० ते १५०० मधील ताम्रयुगातील मानवी वस्ती असावी, असा कयासदेखील पुरातत्त्व विभागाने आढळून आलेल्या जुन्या प्राचीन वस्तूंच्या आधारे लावला आहे.काजी गढीचा वारसा अखेर ‘बेवारस’चकाळानुरूप या प्राचीन ऐतिहासिक वारशाकडे सर्वच शासकीय यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत गेले. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या संरक्षित वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळूनही गढी जणू एकप्रकारे ‘बेवारस’च राहिली. गढीचे संरक्षण कोणत्याही शासकीय खात्याला करता आलेले नाही. सध्या जे रहिवासी येथे वास्तव्यास आहे, त्यांचे संरक्षक भिंतीच्या जुन्या मागणीचे घोंगडे अद्याप भिजतच पडले आहे.उत्खननानंतर ४ कालखंड झाले निश्चित१९५०-५१ साली पुरातत्त्व विभागाने गढीवर केलेल्या उत्खननात मानवी अधिवासाचे प्राचीन एकूण ४ कालखंड पुरातत्त्व विभागाने निश्चित केले आहेत. त्यानंतर या वास्तूला संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला गेला, मात्र या वास्तूच्या संवर्धनासाठी आतापर्यंत कधीही प्रयत्न झाले नाही. गढीवर दाट लोकवस्ती तयार झाली. सध्या काजी गढी धोकादायक ठिकाण म्हणून जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर या धोकादायक गढीवरील रहिवाशांच्या स्थलांतरासाठी प्रशासनाकडून तारेवरची कसरत करण्यात आली होती.

टॅग्स :historyइतिहासNashikनाशिकArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण