शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडे ३० कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 16:54 IST

नाशिकच्या ज्या भागात वितरण वाहिन्या टाकण्यात येतात, त्या भागात पाणीपुरवठा सुरळीत होत जाणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेने राज्य शासनाकडे ३० कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर एकूण दीड लाख लोक संख्येला या सुधारणांचा फायदा होईल असा विश्वास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देनवीन कामांचे महापालिकेकडून नियोेजन यंदा ६० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे सुरूसुमारे दीड लाख नागरीकांना लाभ होणार

नाशिक : शहराला दोन धरणांमधून मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत असते. ती दूर करण्यासाठी महापालिकेने ४० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे हाती घेतली असून आणखी ६० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक भागांतील पाणीपुरवठा सुरळीत होईल परंतु त्याचबरोबर आणखी नववसाहतीत कामे करण्यासाठी राज्य शासनानाला ३० कोटी रुपयांच्या निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर  सुमारे दीड लाख नागरीकांना लाभ होणार आहे.

नाशिक शहराला गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गंगापूर धरण आणि चेहेडी बंधाऱ्याच्या माध्यमातून ४३० ते ४३५ दशलक्ष लिटर्स पाणी ६५ किलो मीटर लांबीच्या उर्ध्ववाहिनी आणि गुरुत्ववाहिनीद्वारे विविध शुद्धीकरण केंद्रात पाठविले जाते. शहरात शिवाजीनगर, बारा बंगला, पंचवटी, गांधीनगर, नाशिकरोड, निलगिरी बाग या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते आणि शहरातील २११ किलोमीटर लांबीच्या शुद्ध पाण्याच्या मुख्य वाहिन्यांद्वारे १०३ जलकुंभ भरण्यात येते. या जलकुंभांतून ग्राहकांपर्यंत पाणीपुरवठा करण्याकरिता १८०० किलोमीटर लांबीच्या वितरण वाहिन्या आहेत. विविध व्हॉल्व्हद्वारे पाण्याचा दाब नियंत्रित करून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र तरीही अनेक भागांत पाणीपुरवठ्याविषयी तक्रारी असतात. यासंदर्भात महापालिकेच्या वतीने वॉटर व एनर्जी आॅडिट करून घेण्यात आले. त्यानंतर आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी हायड्रोलिक मॉडेलिंग करण्यात आले. त्यानुसार कामांचे नियोजन करण्यात आले असून, सध्याच्या त्याच पद्धतीने कामे सुरू आहेत.शहरात चाळीस किलोमीटर लांबीच्या वितरण वाहिन्यांची कामे सुरू असून, आणखी ६० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे येत्या काही दिवसांत सुरू होत आहेत.

नाशिकच्या ज्या भागात वितरण वाहिन्या टाकण्यात येतात, त्या भागात पाणीपुरवठा सुरळीत होत जाणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेने राज्य शासनाकडे ३० कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर एकूण दीड लाख लोक संख्येला या सुधारणांचा फायदा होईल असा विश्वास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी