पुरोगामी संघटना : तीन महिने चालणार उपक्रम ‘शिवराय ते भीमराय’ जन्मोत्सवाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:44 IST2018-02-10T00:43:39+5:302018-02-10T00:44:24+5:30
नाशिक : परिवर्तनवादी संघटना व पक्षांनी महापुरुषांचे खरे विचार पोहोचविण्यासाठी ‘शिवराय ते भीमराय’ जन्मोत्सव २०१८ एकत्रितपणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुरोगामी संघटना : तीन महिने चालणार उपक्रम ‘शिवराय ते भीमराय’ जन्मोत्सवाचा निर्णय
नाशिक : महाराष्ट्रातील सध्याचे जातीय तणावाचे वातावरण पाहता नाशिकमधील परिवर्तनवादी संघटना व पक्षांनी सामाजिक ऐक्य बळकट करण्यासाठी व तरुणांपर्यंत या महापुरुषांचे खरे विचार पोहोचविण्यासाठी ‘शिवराय ते भीमराय’ जन्मोत्सव २०१८ एकत्रितपणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच सर्व समाजाला एकत्र जोडण्याचे व अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे काम केले. या महापुरुषांनी सर्व समाजाठी काम केलेले आहे, परंतु काही समाजकंटके या महापुरुषांच्या नावे आपल्या समाजात जाणीवपूर्वक विष कालविण्याचे काम करीत असल्याचे आजवरच्या काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे समाजात या दोन्ही महापुरुषांच्या नावे फूट पाडणाºयांना चोख उत्तर देण्यासाठी व सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी ‘शिवराय ते भीमराय जन्मोत्सव २०१८’ साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. या संदर्भात गुरुवारी रमाबाई आंबेडकर विद्यालयात बैठक घेण्यात आली व त्यात जन्मोत्सवाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.‘शिवराय ते भीमराय’ या विषयावर निबंध स्पर्धा व व्हिडीओ ब्लॉग स्पर्धा घेण्याचे ठरविण्यात आले. या उपक्रमात भाकप, आम आदमी पार्टी, भारिप बहुजन महासंग, छात्रभारती, मार्शल ग्रुप, विवेकवाहिनी या पक्ष व संघटनांचा सहभाग असून, अन्य पक्ष, संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. समितीची पुढील बैठक १० फेब्रुवारी रोजी रमाबाई आंबेडकर विद्यालयात सायंकाळी ५ वाजता घेण्यात येणार आहे. या बैठकीस राजू देसले, नितीन भुजबळ, स्वप्नील घिया, तुषार जगताप, विनय कटारे, योगेश कापसे, सुरेश नखाते, अभिजित गोसावी, विशाल रनमाळे, राज खरात, महादेव खुडे, स्वप्नील वंजोरी, शरद कोकाटे, करुणासागर पगारे उपस्थित होते.