शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

मालेगाव तालुक्यात काश्मिरी सफरचंदाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 01:47 IST

मालेगाव : काश्मिरात उत्पादित होणारे सफरचंद आता तालुक्यातील आघार शिवारात दिसू लागले असून, ही किमया केली आहे प्रयोगशील शेतकरी हिरामण शिवराम मानकर यांनी.

ठळक मुद्देखजुराचीही केली लागवड : आघार येथे शेतकरी हिरामण मानकर यांचा प्रयोग

शफीक शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : काश्मिरात उत्पादित होणारे सफरचंद आता तालुक्यातील आघार शिवारात दिसू लागले असून, ही किमया केली आहे प्रयोगशील शेतकरी हिरामण शिवराम मानकर यांनी.आघार शिवारात शिवराम बापू मानकर (८२) यांची अवघी सहा एकर जमीन. त्यांचे चिरंजीव हिरामण मानकर हे चांदवड येथे गटविकास अधिकारी होते.सेवानिवृत्त झाल्यानंतर वडिलोपार्जित जमिनीत शेती करायचे त्यांनी ठरवले. मात्र पारंपरिक शेतीत त्यांना रस नव्हता. काही तरी वेगळे करण्याची जिद्द मनात होती. शेतात डाळिंब पीक त्यांनी घेतले होते मात्र तेल्या रोगाने डाळिंबबागा उद्ध्वस्त होत असल्याने त्यांनी नवीन पिकाचा शोध सुरू केला. यू-ट्यूबवर अभ्यास सुरू केला. उष्ण प्रदेशात येणारी सफरचंदाची जात विकसित केली असल्याची माहिती त्यांना मिळाली. एचआरएमआयवाय ही उन्हाळ्यात ४५ ते ४८ अंश तपमानात टिकून राहणारी सफरचंदाची जात असल्याने तिची लागवड करण्याचा निर्धार त्यांनी केला. हिमाचल प्रदेशात पनयाला, जि. बिलासपूर येथील हरिमन शर्मा यांनी ही जात १९९९ मध्ये विकसित केल्याचे हिरामण मानकर यांना कळाले. आॅक्टोबर २०१९ मध्ये ही माहिती मिळाली. तत्कालीन राष्ट्रपती अबुल कलाम यांच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवनात ३५ रोपे शर्मा यांनी लावली होती. एकेका रोपाला ३५० सफरचंदाची फळे लागली होती. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी मानकर यांना अहमदाबादच्या नॅशनल इन्व्होवेशन फाउण्डेशन यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. आॅक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी रोपांची बुकिंग केली. दीड एकरात मानकर यांनी ३१५ सफरचंदाच्या रोपाची लागवड केली. वर्षभरात सुमारे पाच फूट झाड वाढते. नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान पानगळ होते आणि फेब्रुवारीत झाडांना फुले येतात. जूनमध्ये फळे परिपक्व होतात. फळांना शंभर रुपये किलो दर मिळतो त्यामुळे ही परवडणारी शेती असल्याचे मानकर यांनी सांगितले.खजुराची लागवडमानकर यांनी एका एकरात बदई जातीच्या खजूर पिकाची लागवड केली आहे. साधारणपणे तिसऱ्या वर्षी फळ लागते. चौथ्या वर्षांपासून एकेका झाडाला दोन क्विंंटल माल येतो. ओली खजूर विकली तरी दहा लाखांचे उत्पन्न येते. यालादेखील फारसा खर्च येत नाही.सफरचंदासाठी खडकाळ पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. पिकाला पाणी कमी लागते. यामुळे मानकर यांनी ठिबक सिंचन करून घेतले आहे. त्यासाठी त्यांना दहा हजार, तर कुरिअरने रोपे मागवण्यासाठी २५ हजार रुपये खर्च आला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी