शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

मालेगाव तालुक्यात काश्मिरी सफरचंदाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 01:47 IST

मालेगाव : काश्मिरात उत्पादित होणारे सफरचंद आता तालुक्यातील आघार शिवारात दिसू लागले असून, ही किमया केली आहे प्रयोगशील शेतकरी हिरामण शिवराम मानकर यांनी.

ठळक मुद्देखजुराचीही केली लागवड : आघार येथे शेतकरी हिरामण मानकर यांचा प्रयोग

शफीक शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : काश्मिरात उत्पादित होणारे सफरचंद आता तालुक्यातील आघार शिवारात दिसू लागले असून, ही किमया केली आहे प्रयोगशील शेतकरी हिरामण शिवराम मानकर यांनी.आघार शिवारात शिवराम बापू मानकर (८२) यांची अवघी सहा एकर जमीन. त्यांचे चिरंजीव हिरामण मानकर हे चांदवड येथे गटविकास अधिकारी होते.सेवानिवृत्त झाल्यानंतर वडिलोपार्जित जमिनीत शेती करायचे त्यांनी ठरवले. मात्र पारंपरिक शेतीत त्यांना रस नव्हता. काही तरी वेगळे करण्याची जिद्द मनात होती. शेतात डाळिंब पीक त्यांनी घेतले होते मात्र तेल्या रोगाने डाळिंबबागा उद्ध्वस्त होत असल्याने त्यांनी नवीन पिकाचा शोध सुरू केला. यू-ट्यूबवर अभ्यास सुरू केला. उष्ण प्रदेशात येणारी सफरचंदाची जात विकसित केली असल्याची माहिती त्यांना मिळाली. एचआरएमआयवाय ही उन्हाळ्यात ४५ ते ४८ अंश तपमानात टिकून राहणारी सफरचंदाची जात असल्याने तिची लागवड करण्याचा निर्धार त्यांनी केला. हिमाचल प्रदेशात पनयाला, जि. बिलासपूर येथील हरिमन शर्मा यांनी ही जात १९९९ मध्ये विकसित केल्याचे हिरामण मानकर यांना कळाले. आॅक्टोबर २०१९ मध्ये ही माहिती मिळाली. तत्कालीन राष्ट्रपती अबुल कलाम यांच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवनात ३५ रोपे शर्मा यांनी लावली होती. एकेका रोपाला ३५० सफरचंदाची फळे लागली होती. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी मानकर यांना अहमदाबादच्या नॅशनल इन्व्होवेशन फाउण्डेशन यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. आॅक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी रोपांची बुकिंग केली. दीड एकरात मानकर यांनी ३१५ सफरचंदाच्या रोपाची लागवड केली. वर्षभरात सुमारे पाच फूट झाड वाढते. नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान पानगळ होते आणि फेब्रुवारीत झाडांना फुले येतात. जूनमध्ये फळे परिपक्व होतात. फळांना शंभर रुपये किलो दर मिळतो त्यामुळे ही परवडणारी शेती असल्याचे मानकर यांनी सांगितले.खजुराची लागवडमानकर यांनी एका एकरात बदई जातीच्या खजूर पिकाची लागवड केली आहे. साधारणपणे तिसऱ्या वर्षी फळ लागते. चौथ्या वर्षांपासून एकेका झाडाला दोन क्विंंटल माल येतो. ओली खजूर विकली तरी दहा लाखांचे उत्पन्न येते. यालादेखील फारसा खर्च येत नाही.सफरचंदासाठी खडकाळ पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. पिकाला पाणी कमी लागते. यामुळे मानकर यांनी ठिबक सिंचन करून घेतले आहे. त्यासाठी त्यांना दहा हजार, तर कुरिअरने रोपे मागवण्यासाठी २५ हजार रुपये खर्च आला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी