शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

जिल्ह्यातील  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर : टँकर शंभरीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:58 AM

जिल्ह्यात गेल्या वर्षी ११३ टक्के पडलेला पाऊस व सलग चार वर्षे जलयुक्त शिवार योजनेत शेकडो गावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करूनही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, सुमारे ४२७ गावे, वाड्यांना ९५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मान्सूनचे आगमन अद्याप जिल्ह्यात झालेले नसल्याने पाऊस लांबणीवर पडल्यास टॅँकर शंभरी पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक : जिल्ह्यात गेल्या वर्षी ११३ टक्के पडलेला पाऊस व सलग चार वर्षे जलयुक्त शिवार योजनेत शेकडो गावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करूनही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, सुमारे ४२७ गावे, वाड्यांना ९५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मान्सूनचे आगमन अद्याप जिल्ह्यात झालेले नसल्याने पाऊस लांबणीवर पडल्यास टॅँकर शंभरी पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  गेल्या वर्षी मेअखेर जिल्ह्यात ७८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करून टंचाईग्रस्त गावांची तृष्णा भागविण्यात आली होती, तथापि, पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात ११३ टक्के पाऊस पडून नदी, नाले दुथडी भरून वाहिले व धरणांमध्येही शंभर टक्केपाणी साठवणूक झाली असताना यंदा जानेवारी महिन्यापासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. सिन्नर, नांदगाव, बागलाण तालुक्यांनी टॅँकरचे प्रस्ताव पाठवूनही प्रशासनाने या प्रस्तावांमध्ये तांत्रिक दोष काढून ते परत पाठविले व ज्या गावांना पाणीटंचाई निर्माण झाली त्या गावाच्या लगत तीन किलोमीटर अंतरावर पाण्याचे स्रोत शोधण्याचा जालीम उपाय सुचविण्यात आला होता. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे  मात्र जलयुक्त शिवार योजनेच्या कामांच्या उद्घाटनाचा सपाटाही लावण्यात आला तर गेल्या चार वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेत केलेल्या कामांनी भूपृष्ठातील जलपातळी वाढल्याचे दावेही करण्यात आले. प्रत्यक्षात जून महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही जिल्ह्णातील अकरा तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून, १२८ गावे व २९९ वाड्यांसाठी ९५ टॅँकर मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्णात अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही, मात्र ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत दमदार पाऊस झाल्याशिवाय ते शक्य नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई