शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आधी सर्वेक्षण, मग लाभाची चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:22 AM

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे नगररचना योजना (टीपी स्कीम) राबवून तेथे नियोजनबद्ध नगरी वसविण्याच्या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारून स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांची कोंडी केली.

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे नगररचना योजना (टीपी स्कीम) राबवून तेथे नियोजनबद्ध नगरी वसविण्याच्या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारून स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांची कोंडी केली. शेतकºयांना पूर्वकल्पना न देता महासभेत हा विषय मांडलाच कसा, असा प्रश्न करीत विविध मागण्यांची सरबत्ती केली. विशेषत: अधिक लाभ का देत नाही तसेच वाढीव चटई क्षेत्र किती देणार, असा प्रश्न केल्यानंतर प्रशासनाने प्रस्तावित योजनेसाठी आधी सर्वेक्षण करू द्या मग लाभ किती मिळू शकतो याची पडताळणी करून लाभ किती मिळू शकतो हे सांगता येईल, असेच उत्तर शेतकºयांना देण्यात आले. अखेरीस शेतकºयांना सर्वेक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक बोलावू असे सांगण्यात आले तर कंपनीने सर्वेक्षण केल्यानंतर तीन महिन्यांत सर्व पडताळणी करून शेतकºयांना किती जमीन मिळेल किंवा वाढीव फायदे मिळतील याबाबत माहिती देऊ शकू, असे सांगण्यात आले.मौजे नाशिक आणि मौजे मखमलाबाद शिवारात सुमारे सव्वासातशे एकर क्षेत्रात नगर रचना योजना आणि नंतर खास नियोजनबद्ध नगरी वसविण्याची स्मार्ट सिटी अंतर्गत योजना असून, त्यासंदर्भात बुधवारी (दि. १२) स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल तसेच नगररचनाकार कांचन बोधले यांनी महाकवी कालिदास कला मंदिरात सादरीकरण केले. यावेळी महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडकेदेखील उपस्थित होत्या.मौजे नाशिक शिवारातील ५४ तर मखमलाबाद येथील वीस अशा ७४ सर्व्हे क्रमांकावर एकूण ७५४ एकर क्षेत्रात महापालिका खास नियोजनबद्ध शहर वसविणार आहे. त्यासाठी आधी नगररचना योजना राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शेतकºयांकडून जमिनी घेऊन त्या एकत्रित करून एकच सर्व्हे नंबरप्रमाणे गृहीत धरून लॅण्ड पुलिंग करण्यात येईल आणि त्यानंतर पन्नास टक्के जागा शेतकºयांना परत देण्यात येतील. यात भूसंपादनाचा प्रकार नसून बाधित शेतकरीच भागीदार असणार आहेत. त्यामुळे शेतकºयांना लाभ मिळेल अशी माहिती यावेळी देण्यात आली तसेच कांचन बोधले यांनी महापालिकेने एकदा इरादा जाहीर केल्यानंतर एक महिन्याच्या आत त्याला राजपत्रात प्रसिद्धी मिळेल आणि त्यानंतर हरकती आणि सूचना मागविण्याची कार्यवाही होऊन अंतिमत: नऊ महिन्यांत योजना अंतिम होईल तसेच तीन वर्षांत योजना पूर्ण होईल असे सांगितले.मग, प्रस्तावाची घाई कशासाठी ?महापालिकेच्या वतीने शेतकºयांना नगररचना योजना प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले, तसेच तत्पूर्वी शेतकºयांना अहमदाबाद दौरा घडविण्यात आला. त्याआधी महासभेवरच मखमलाबाद येथे नगररचना परियोजना राबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला; मात्र हा सर्व उलटा क्रम ही योजना राबविण्याचा प्रस्ताव महासभेत कसा काय पाठविला गेला, असा प्रश्न शरद कोशिरे यांच्यासह अन्य शेतकºयांनी केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी