शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकºयांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 12:29 AM

नाशिक : सामूहिक शेती प्रयोगामुळे शेतीव्यवसाय सकारात्मक बदल झाला आहे. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करणाºया शेतकºयांमुळे उत्पादनात वाढ होत आहे. शासनाकडून शेतकºयांसाठी अनेक योजना राबविल्या जातात या योजना शेतकºयांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आदर्श शेतकºयांनी पार पाडावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.

ठळक मुद्देयोजना शेतकºयांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आदर्श शेतकºयांनी पार पाडावी,

नाशिक : सामूहिक शेती प्रयोगामुळे शेतीव्यवसाय सकारात्मक बदल झाला आहे. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करणाºया शेतकºयांमुळे उत्पादनात वाढ होत आहे. शासनाकडून शेतकºयांसाठी अनेक योजना राबविल्या जातात या योजना शेतकºयांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आदर्श शेतकºयांनी पार पाडावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा परिषदेत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. यावेळी सांगळे बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य महेंद्रसिंग काले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ, जिल्हा वनअधिकारीरणावत, माजी प्रकल्प संचालक अशोक कांबळे, निवृत्त पोलीस कॉन्सटेबल काका चव्हाण, कृषी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सुनील वानखेडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.सांगळे म्हणाल्या की, जिल्'ातील शेतकºयांनी चांगले काम केलेले आहे. या शेतकºयांनी इतर शेतकºयांना प्रगतशेतीकडे वळविले पाहिजे. दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतीविकासाची पायाभरणी केली आहे याचा अभिमान असल्याचे सांगळे यांनी यावेळी सांगितले. कृषी समिती सदस्य महेंद्रसिंग काले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी सांगितले, वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजना, जलसंधारण, संकरित बियाणे मोहीम राबवून हरित शेतीसमृद्ध केली.याप्रसंगी प्रयोगशील शेतकरी, संस्था आणि बचतगटांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि शेवग्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेमुळे एक लाख २५ हजार क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. जलयुक्त शिवार ही योजना आता लोकचळवळ झाली आहे. विशेष म्हणजे अनेक खासगी कंपन्या आपल्या सीएसआर फंडाद्वारे या चळवळीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे हजारोंच्यावर गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावा पडवळ यांनी केला. यावेळी त्यांनी उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाचीही माहिती दिली. कृषी विकास अधिकारी हेमंत काळे यांनी आभार मानले.

बचतगटदारणामाई स्वयंसहा, बचत गट, पळसे, नाशिक, कश्यपी सेंद्रिय शेतमाल बचत गट, वाघेरा, त्र्यंबकेश्वर, शाश्वत शेतकरी बचत गट, दोडी बु., सिन्नर, कश्यप कृषी विकास गट, जोपूळ, चांदवड, श्रीकृष्ण कृषी विज्ञान मंडळ, पुरणगाव, येवला, माती फाउण्डेशन सेंद्रिय शेतमाल उत्पादक गट, रावळगाव, मालेगाव, श्रीशंकर महाराज सेंद्रिय शेतमाल उत्पादक गट, अंतापूर, सटाणासंस्था रोकडेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., निमगाव, सिन्नर, ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., उगाव, निफाड, ३) फायुस्टार ग्रीन फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., सावकी, देवळा, शिवराणा फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., नारूळ, कळवण, पंचरत्न फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., पानेवाडी, नांदगाव, दारणामाई फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., मुकणे, इगतपुरी, मल्हार अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., बोपेगाव, दिंडोरी.पीक स्पर्धा विजेतेगोरख हिरामण केकाणे, सायगाव, येवला (प्रथम खरीप), शिवाजी रामा सोनवणे, साताळी, येवला ( द्वितीय खरीप)े, मच्छिंद्र चंद्रभान उशीर, सायगाव, येवला (तृतीय खरीप), रतन नामदेव पैठणकर, नगरसूल, येवला (प्रथम रब्बी), श्रीमती कमला रतन पैठणकर, धूळगाव, येवला (द्वितीय रब्बी), श्रीमती मीनाबाई गणपत अनथ, नगरसूल, येवला (तृतीय रब्बी).वैयक्तिक शेतकरीबबनराव धोंडीराम कांगणे, दोणवाडे, ता. नाशिक, जयराम होनाजी गायकवाड, उंबरपाडा दि., ता. सुरगाणा, अविनाश मनोहर पाटोळे, वडनेर भैरव., ता. चांदवड बद्रीनाथ रामभाऊ जाधव, वडगाव, बल्हे, ता. येवला, समाधान काशीनाथ वाघारे, कोणे, ता. त्र्यंबकेश्वर, महेश जिभाऊ पाटील, मुळाणे, ता. सटाणा,भागवत विठोबा बलक, वडगाव, ता. सिन्नर, शिवाजी कोंडाजी मोंढे, अडसरे, ता. इगतपुरी, धनंजय विश्वासराव देशमुख, तळवाडे, ता. मालेगाव, श्रावण पावजी गायकवाड, पाठरूण, ता. कळवण, प्रकाश बापूराव पाटील, सावकी (लो.), ता. देवळा,सुधाकर दगू पवार, नागापूर, ता. नांदगाव, यशवंत महादू गावंडे, गावंधपाडा, ता. पेठ.