शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने....
2
कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला
3
पत्रकाराने प्रश्न विचारला,रेणुका चौधरी यांनी भौ-भौ करत दिले उत्तर; व्हिडीओ व्हायरल
4
विराट कोहली १६ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार; प्रत्येक सामन्यासाठी 'इतकी' मॅच फी मिळणार
5
अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या...
6
'केंद्र सरकारने सत्य उघडले'; महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीचा प्रस्तावच पाठवला नाही; सुप्रिया सुळेंची टीका
7
तपोवन वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला अजित पवारांचा पाठिंबा; म्हणाले, झाडं वाचली तरच पुढची पिढी..."
8
USD to INR: का होतेय भारतीय रुपयामध्ये घसरण? आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चलनांमध्ये सामिल
9
डोळ्याला मोठा भिंगाचा चष्मा आणि पुढे आलेले दात; जस्सीचा बदलला लूक, आता ओळखताही येत नाही
10
IND vs SA 2nd ODI Live Streaming: टीम इंडियानं सलग २० व्या वनडेत गमावला टॉस! मॅचसह मालिका जिंकणार?
11
देशात घुसखोरांच्या स्वागतासाठी लाल गालीचा अंथरणे योग्य आहे का?, सुप्रीम  कोर्टाने विचारला सवाल
12
वृक्षतोडीचं राजकारण करणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून 'शाळा'; म्हणाले, झाडं जपायलाच हवीत, पण कुंभमेळ्याची संस्कृतीही...
13
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: तीन वर्षांपासून आमचे संबंध नाही; अनंत गर्जेच्या प्रेयसीने पोलिसांना काय सांगितले?
14
'ही काही फॅक्टरी नाहीये...', दीपिका पादुकोणच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर राणा दग्गुबती स्पष्ट मत
15
आता १९ नव्हे, 'या' ३० देशांच्या लोकांना अमेरिकेत 'नो एन्ट्री'! डोनाल्ड ट्रम्प कायदे आणखी कठोर करणार
16
Tatkal Ticket: ...तर आरक्षण खिडकीवरून तत्काळ तिकीट मिळणार नाही; नवा नियम लवकरच लागू!
17
Dollar Vs Rupee: अरे बाप रे... १ डॉलर = ₹ ९०.१३ ! भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण; तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?
18
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
19
६० व्या वर्षी ₹५००० चं पक्कं पेन्शन, पात्रतेसोबत जाणून घ्या अर्ज करायची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
School Holiday: तामिळनाडूत शाळा बंद, जम्मू काश्मीरसह MP, UP मध्येही शाळांना दिर्घ काळ सुट्टी घोषित, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नविन कांदा येईपर्यंत दर चढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 19:49 IST

लासलगाव (शेखर देसाई) पावसाने कर्नाटक राज्यातील पुरपरिस्थितीमुळे कांदा पिकाचे नुकसान आणि आंध्र प्रदेशात लागवडीतच पावसाने कांदा खराब झाल्याने देशांतर्गत मागणीचा जोर महाराष्ट्रावर व विशेषता नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेत वाढला व कांदा कमी असुन नवीन मुबलक कांदा बाजारपेठेत दाखल होण्यास दोन महीने कालावधी लागणार असल्याने बाजार भाव कमी होणार नाहीत असे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.

ठळक मुद्देलासलगाव : नाफेड संचालक नानासाहेब पाटील

लोकमत संडे स्पेशल मुलाखतलासलगाव (शेखर देसाई) पावसाने कर्नाटक राज्यातील पुरपरिस्थितीमुळे कांदा पिकाचे नुकसान आणि आंध्र प्रदेशात लागवडीतच पावसाने कांदा खराब झाल्याने देशांतर्गत मागणीचा जोर महाराष्ट्रावर व विशेषता नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेत वाढला व कांदा कमी असुन नवीन मुबलक कांदा बाजारपेठेत दाखल होण्यास दोन महीने कालावधी लागणार असल्याने बाजार भाव कमी होणार नाहीत असे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.कांदा भाववाढीचे गणित व भविष्यात होणारे कांदा बाजारपेठेतील संभाव्य बदल याबाबत नानासाहेब पाटील यांनी अभ्यासपुर्ण विवेचन दिले आहे.कांदा स्थिराकरण योजनेनुसार खरेदी केलेला कांदा शासनाच्या सुचनेनुसार दररोज किमान तिनशे टन मोठ्या शहरात पाठविला जात असुन केंद्र शासन रास्त दरात हा कांदा ग्राहकांना विक्र ी करीत योग्य भावात मिळाला पाहीजे यासाठी जोरदार काम करीत आहे. आतापर्यंत दिल्ली, कोलकत्ता,चेन्नई व सिलीगुडीसह मोठ्या शहरात कांदा रवाना होऊन तो वितरीत करण्यात आला असल्याची माहीती लोकमतशी बोलतांना पाटील यांनी दिली.आंध्र व कर्नाटक राज पावसाने कांदा खराब झाला आहे.त्या तुलनेत महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादन कमीच होते. देशातील इतर राज्यांत मागणी पुरी करण्याची जबाबदारी मुख्यते नाशिक जिल्ह्यावर आली आहे.नागपंचमीला लागण होणारा कांदा येत्या ५ आॅक्टोबर पर्यंत बाजारपेठेत येतो व उन्हाळ कांद्याची मागणी कमी होते. यावेळी दुर्दैवाने नागपंचमी सणाचे वेळी लागवड पावसाने झाली नाही ती विलंबाने झाली. त्यामुळे आता हा कांदा आॅक्टोबर महीन्यात बाजारपेठेत येणार नाही. तो नोव्हेंबर अखेरीस बाजारात विक्र ीस आला व त्यात आवकेचे प्रमाण वाढल्या नंतरच भाव पुर्वपदावर येतील असे दिसत आहे.कांदा लागवडीसाठी पाऊस वेळेवर आहे का किंवा कांदा लागवडीनंतर अतिवृष्टीमुळे कांदा पिक वाचविता येत नाही. ही सर्व नैसर्गिकरीत्या होणारी प्रक्रि या असुन त्याचा परीणाम बाजारपेठेत होत असतो, म्हणुन मागणीचा दाब अधिक वाढला तर कांदा अधिक भाव देणार आहे. तरी गेल्या काही महिन्यापासून साठवणुक केलेला कांदा त्यातील निघणारा नाशवंत कांदा तसेच होणारी वजनातील कांदयाची घट ही देखील मोठी आहे. भाववाढ झाली तरी कांदा उत्पादकांच्या उत्पन्नाचे प्रमाण कमी आहे. ही बाब नजरेआड करता येणार नसल्याचे ते म्हणाले.देशाला दररोज ५० हजार मेट्रिक टन कांदा हा खाण्यासाठी लागतो. त्यामुळे सत्तेत कोणीही असल्यास इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा आयात करू शकणार नसल्याचे सांगत कांदा आयात करण्याची जरी निविदा काढण्यात आली असली तरी, कांद्याच्या बाजारभावावर कुठलाही परिणाम होणार नाही.येणाऱ्या दिवसात नवीन कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत अशीच कांद्याची होलसेल बाजारात भाव वाढ होणार आहे. कांदा भाव वाढीतून शहरी भागातील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शासनाने ५० हजार मेट्रिक टन खरेदी केलेल्या कांद्यातून आतापर्यंत २५ टक्के म्हणजे साडेबारा हजार मेट्रिक टन कांदा हा शहरी भागात पाठवण्यात आला आहे, असे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.(फोटो २१ लासलगाव कांदा, २१ नानासाहेब पाटील)