शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

पाटोदा परिसरात पावसाची हजेरी; पिकांना जीवदान, शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 5:45 PM

पाटोदा :दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून पाटोदा परिसरात पुनरागमन करीत हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी वर्ग सुखावला आहे. ठाणगाव, पिंपरी, दहेगाव, कानडी, आडगाव रेपाळ, कातरणी, विखरणी, धुळगाव परिसरात पावसाने हजेरी लावली.

परिसरात रोहिणीच्या पावसाच्या ओलीवर शेतकरीवर्गाने खरीप हंगामातील पिकांची लागवड केली. पेरणीनंतरही पावसाने हजेरी लावल्याने पिके जोमदार होती मात्र दहा -अकरा दिवसांपासून परिसरात पावसाने ओढ दिल्याने शेतातील पिके सुकू लागली होती. कर्ज, उसनवारीच्या पैशांवर घेतलेल्या महागड्या बी-बियाणे व खतांचा खर्च वाया जाईल की काय अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र योग्यवेळी झालेल्या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला आहे. या पावसाने मका पिकावरील अळी नष्ट होण्यास थोडीफार मदत होणार असल्याचे शेतकरीवर्गाकडून सांगीतले जात आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती