शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनाची तयारी झाली?

By संजय पाठक | Updated: May 16, 2019 22:08 IST

नाशिक- नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीने आता पावसाळापूर्व कामांची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे नाले सफाई केली जाईल आणि त्याची बिलेही काढले जातील. परंतु पावसाळ्यात सखल भागात पाणी साचले की, दोष पावसाच्या वेगाला दिला जाईल. इतकेच नव्हे तर पावसाळी गटारी तुंबल्या की, लोकांनी प्लास्टीकच्या कॅरीबॅगा फेकल्यानेच ही समस्या उदभवल्याचा ठपका देखील ठेवला जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे वाडे आणि काजी गढीचा प्रश्न हा सोडविला गेला ना सुटेल. परंतु दुर्घटना घडली की दोष मात्र वाडेकऱ्यांनाच दिला जाईल.

ठळक मुद्देगोदावरीतील अतिक्रमणे जैसे थेगावठाणातील वाड्यांवर निर्णय नाहीआपत्ती व्यवस्थापनासमोरच आपत्ती

संजय पाठक. नाशिक- नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीने आता पावसाळापूर्व कामांची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे नाले सफाई केली जाईल आणि त्याची बिलेही काढले जातील. परंतु पावसाळ्यात सखल भागात पाणी साचले की, दोष पावसाच्या वेगाला दिला जाईल. इतकेच नव्हे तर पावसाळी गटारी तुंबल्या की, लोकांनी प्लास्टीकच्या कॅरीबॅगा फेकल्यानेच ही समस्या उदभवल्याचा ठपका देखील ठेवला जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे वाडे आणि काजी गढीचा प्रश्न हा सोडविला गेला ना सुटेल. परंतु दुर्घटना घडली की दोष मात्र वाडेकऱ्यांनाच दिला जाईल.

खरे तर पावसाळा ही यंत्रणेसाठी इष्टापत्तीच असते. मुंबईत नाले सफाईत घोटाळे होतात तसे येथेही उघड होतात. परंतु त्याचे पुरावे नसतात. नाशिक महापालिकेने दहा ते पंधरा वर्षांपूर्वी पावसाळी गटार योजना साकारली. सुमारे तीनशे कोटी रूपयांच्या योजनेने काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी गटार योजना ज्या भागात केली आहे. तेथेही पाणी साचते. मग, पावसाळी गटारीचा महाघोटाळा टाळण्यासाठी पावसाला म्हणजे निसर्र्गालाच दोषी धरले जाईल.

आता महापालिकेने पावसाळा पूर्व कामांची लगबग सुरू केली आहे. नाले सफाई सुरू आहे. गावठाण भागातील मोडकळीस आलेल्या वाड्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. परंतु अशा सर्व तयारी मुळे सर्वच ठिकठाक होईल असे नाही याचे मुळ कारण अनेक बाबतीत स्थायी तोडगा काढणे शक्य असून तो कधीही काढला जात नाही. गेल्या वर्षी तांबटलेनमधील काळे वाडा पडून दोन जण ठार झाले होते. त्यानंतर गावठाण भागात क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय चर्चिला गेला. राजकिय नेत्यांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्षात कलस्टर मंजुर झालेच नाही. असे अनेकबाबतीत घडते. काजीची गढी हा सर्वाधिक धोकादायक भाग. तो खासगी जागेवर असल्याने त्याचा तिढा सुटलेला नाही. सर्वात महत्वाचा मुद्दा नदीपात्राचा असून नदीपात्रातील अतिक्रमीत बांधकामे त्यातील अवरोध होईल असे अडथळे जैसे थे आहे. त्यामुळे सराफ बाजार आणि अन्यत्र पाणी शिरणारच!

मग हे सर्व होणार असेल तर पावसाळा पूर्व कामांची सज्जता झाली असे म्हणता तरी कसे येईल. एकुणातच आव्हानासाठी सज्जता म्हणायला ठीक आहे. परंतु सर्वच जैसे थे असेल तर आपत्ती कशी टळणार? 

 

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊस