शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्टोन्मेंट निवडणुकीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:01 IST

देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनाकडून मतदार यादीला अंतिम स्वरूप देण्याचे काम केले जात असून, घरपट्टी लागू नसलेल्या घरातील सभासदांचे मतदार यादीतील नाव वगळण्यात आल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.

ठळक मुद्देयाद्यांचे काम सुरू : घरपट्टी नसलेल्यांना मतदानाचा हक्क नाही

प्रवीण आडके । लोकमत न्यूज नेटवर्कदेवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनाकडून मतदार यादीला अंतिम स्वरूप देण्याचे काम केले जात असून, घरपट्टी लागू नसलेल्या घरातील सभासदांचे मतदार यादीतील नाव वगळण्यात आल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. कॅन्टोन्मेंट निवडणुकीच्या मतदानाचा हक्क पाच हजार नागरिकांना बजावता येणार नाही.ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या कॅन्टोन्मेंट प्रशासनाला कायद्याने स्वतंत्र अस्तित्व देताना राज्य व केंद्र सरकारचे नियम न पाळण्याची मुभा देण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर कोणतेही सरकारी अधिसूचना जारी न करता लागू करणे म्हणजे नागरिकांना मूलभूत मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवावे लागणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ज्यांनी मतदान केले, अशा सुमारे पाच हजार नागरिकांना कॅन्टोन्मेंटच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नावांमध्ये तर अनेक इच्छुक उमेदारांचा समावेश आहे.निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जे नागरिक सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत वास्तव्यास आहेत त्यांना मतदानाचा हक्क देण्यासाठी स्वतंत्रपणे उपक्रम राबविला होता. त्याच निवडणूक प्रकियेसाठी संरक्षण विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या कॅन्टोन्मेंट परिषदेला मात्र निवडणूक आयोगाचे कोणतेही नियम लागू नाहीत. २०१६ सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार संरक्षण विभागाच्या जागेवर अतिक्रमण व ज्या घरांना घरपट्टी लागू करण्यात आलेली नाही अशा घरातील सभासदांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार यादीतून वगळण्यात आल्याने देवळाली कॅम्पमधील अंदाजे पाच हजार मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे.दर वर्षीप्रमाणे जून महिन्यात कॅन्टोन्मेंटच्या प्रशासनाने मतदार नोंदणी राबवून आगामी निवडणुका लक्षात घेत मतदार यादीला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू केले आहे. मात्र घरपट्टी लागू नसलेल्या मतदारांना मतदानापासून दूर ठेवण्याच्या निर्णयामुळे लगतच्या मळे भागातील नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. संजय गांधी झोपडपट्टी व जुनी स्टेशनवाडी येथील २५००पेक्षा जास्त नागरिकांचे नावे वगळण्यात आली आहे. देवळाली कॅम्प परिसरात पाचशे ते सातशेहून अधिक घरांना घरपट्टी लावण्याची प्रक्रिया राहून गेल्याने २५०० पेक्षा नागरिकांना मतदान करता येणार नाही.अतिक्रमितांना अभयघरपट्टी लागू नये अशांची मतदार यादीतून गच्छंती करण्याची तरतूद असली तरी, ज्या लोकप्रतिनिधींनी अतिक्रमित बांधकाम केले त्यांची नावे मात्र मतदार म्हणून घेण्यात आले आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट कायद्यात विरोधाभास आढळून येतो.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारElectionनिवडणूक