शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

शहर बससेवेला प्राधान्य : आवश्यकतेनुसार नोकरभरती; ई-गर्व्हनन्सवर भर मुंढे राबविणार मुख्यमंत्र्यांचा अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:01 AM

नाशिक : महापालिकेत नाशिककरांनी स्पष्ट बहुमत देऊनही वर्षभरात सत्ताधारी भाजपाला विकासाच्या दृष्टीने पावले उचलण्यात आलेले अपयश आणि अंतर्गत कलह लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढे यांच्याकडे नाशिक महापालिकेची धुरा सोपविल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देआवश्यकतेनुसार नोकरभरती निर्देशानुसारच आपला कारभार

नाशिक : महापालिकेत नाशिककरांनी स्पष्ट बहुमत देऊनही वर्षभरात सत्ताधारी भाजपाला विकासाच्या दृष्टीने पावले उचलण्यात आलेले अपयश आणि अंतर्गत कलह लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढे यांच्याकडे नाशिक महापालिकेची धुरा सोपविल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी (दि.९) मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच आपला कारभार चालणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार, शहर बससेवा ताब्यात घेण्याला प्राधान्यक्रम दिला जाणार असून, ई-गर्व्हनन्सवर भर देत आवश्यकतेनुसार नोकरभरती केली जाणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुंढे यांनी आपली नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या मर्जीनेच झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पांना गती देणे आणि माहिती तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांची उभारणी करणे आदी बाबींवर आपला भर राहणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. मुंढे म्हणाले, शहर बससेवा महापालिकेनेच चालवायची आहे. त्याबाबतचा अहवाल क्रिसिलने महापालिकेला दिलेला आहे. फक्त मॉडेल कोणते वापरायचे यावर निर्णय बाकी आहे. शहराला सार्वजनिक वाहतुकीची जास्त आवश्यकता आहे. भविष्यात शहराचे पर्यावरणीयदृष्ट्या संतुलन बिघडायचे नसेल तर खासगी वाहनांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करावा लागणार आहे. महापालिकेत यापुढे कोणताही प्रकल्प राबविताना त्याची खरोखरच आवश्यकता आहे काय, हे तपासले जाईल. कामांच्या निविदा या प्रचलित डीएसआर रेटच्यावर जाणार नाहीत, याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात येईल. गुणवत्तेशी अजिबात तडजोड केली जाणार नाही. शहरात वाहनतळांचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी पार्किंग पॉलिसी तयार करण्यात येईल. आॅफ रोड पार्किंगवर जास्त भर दिला जाईल. शहरातील स्वच्छताही महत्त्वाची आहे. सफाई कामगारांनी वेळेवर नियमित सफाई केली पाहिजे. त्यासाठी आपण स्वत: शहरात फिरणार असल्याचेही मुंढे यांनी स्पष्ट केले. महापालिकेत अपुºया मनुष्यबळाची जाणीव आहे. शासनाकडे महापालिकेने आकृतिबंध पाठविला आहे. तो शासनाकडून मंजूर करून आणून आवश्यकतेनुसार कुशल कर्मचाºयांची भरती केली जाईल. प्रशासकीय कामकाजात आयटीचा वापर अधिक वाढविण्यात येईल. स्मार्ट सिटी अंतर्गत होणाºया प्रकल्पांना गती दिली जाणार असून, महापालिका व स्मार्ट सिटी कंपनी यांच्यात उत्तम समन्वय राखला जाईल, अशी ग्वाहीही मुंढे यांनी दिली.