वीजबिल माफीचा शेतकर्‍यांना सरसकट लाभ द्यावा

By Admin | Updated: May 7, 2014 22:36 IST2014-05-07T21:49:38+5:302014-05-07T22:36:48+5:30

राज्यात जानेवारी ते मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीत शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यामुळे शासनाने जानेवारी ते जून २०१४ या सहा महिन्यांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्यांच्या नावावर लाईटबिल आहे,

Powerful benefits should be given to farmers of electricity bill | वीजबिल माफीचा शेतकर्‍यांना सरसकट लाभ द्यावा

वीजबिल माफीचा शेतकर्‍यांना सरसकट लाभ द्यावा

नाशिक : राज्यात जानेवारी ते मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीत शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यामुळे शासनाने जानेवारी ते जून २०१४ या सहा महिन्यांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्यांच्या नावावर लाईटबिल आहे, त्यांनाच या निर्णयाचा लाभ होणार असल्याने लाईटबिल अन्य नातलगांच्या नावावर असलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनाही वीजबिल माफ करण्यात यावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीत मंजूर करण्यात आला.
कृषी समितीची मासिक बैठक उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत कृषी विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना जानेवारी ते जून २०१४ या कालावधीतील वीजबिल माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कालावधीतील वीज देयक शासन अदा करणार आहे. परंतु मोेठ्या प्रमाणात शेतकरी कागदोपत्री प्रत्यक्ष वीजग्राहक नसल्यामुळे या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तरी जे शेतकरी प्रत्यक्ष वीजग्राहक नाहीत परंतु वारसदार किंवा वीज उपभोक्ता म्हणून वीजबिल भरत आहेत अशा सर्व शेतकर्‍यांना या शासनाच्या निर्णयाचा लाभ देण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण ठराव तसेच सभेच्या सुरुवातीलाच मार्चनंतरही जिल्‘ात प्रामुख्याने मालेगाव, बागलाणसह काही तालुक्यांत बेमोसमी पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करण्यात यावेत, असा ठराव शैलेश सूर्यवंशी यांनी मांडला. त्यास बाळासाहेब गुंड यांनी अनुमोदन दिले. जिल्‘ात विशेषत: सटाणा व मालेगाव तालुक्यात शासकीय उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात फळबागा लागवड करण्यात येते. त्यात डाळींब या फळपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. त्यासाठी लागणारी कलमे अन्य तालुक्यांतील रोपवाटिकेतून घेण्यात येऊ नये अशी सक्ती करण्यात येते. अशी सक्ती करण्यात येऊ नये, असा ठराव शैलेश सूर्यवंशी यांनी मांडला, तो संमत करण्यात आला. तसेच बागलाण, निफाडसह अन्य तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. म्हणून केळझर, हरणबारी यांसह अन्य धरणांतून पाण्याचे आवर्तन तत्काळ सोडण्यात यावे, असा ठराव शैलेश सूर्यवंशी व भावना भंडारे यांनी मांडला, तो संमत करण्यात आला. बैठकीस अर्जुन बर्डे, श्रीमती शोभा डोखळे, सुभाष चौधरी, श्रीमती सुनंदा भोये, जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Powerful benefits should be given to farmers of electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.