शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

मनपात सत्तांतराच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:57 IST

विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी आणि कॉँग्रेसने चांगली मजल मारल्यानंतर आता स्थानिक स्वराज संस्थांवरदेखील लक्ष केंद्रित केले जाण्याचे संकेत छगन भुजबळ यांनी दिले आहेत. शिवसेनेलादेखील सत्ता हवीच असल्याने आता पुढील महिन्यात होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत सत्तांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी आणि कॉँग्रेसने चांगली मजल मारल्यानंतर आता स्थानिक स्वराज संस्थांवरदेखील लक्ष केंद्रित केले जाण्याचे संकेत छगन भुजबळ यांनी दिले आहेत. शिवसेनेलादेखील सत्ता हवीच असल्याने आता पुढील महिन्यात होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत सत्तांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.अर्थातच त्यासाठी भाजपचे काही नगरसेवक फोडण्याचे महत्त्वाचे काम करण्याची तयारी सुरू असून, ते यशस्वी झाल्यास शिवसेना, मनसे, कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि अपक्ष अशी मोट बदलून महापौरपद मिळवण्याची तयारी सुरू झाल्याचे वृत्त आहे. महापौरपदाची निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या आधी म्हणजेच सप्टेंबर महिन्यात होणार होती.मात्र, महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून, भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे तिकीट कापल्याने ते राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये दाखल झाले आणि पक्षानेदेखील त्यांना उमेदवारी दिली. त्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे सानप यांना भेटल्याने त्याचवेळी वेगळे समीकरण जुळवले जात असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यात आता राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची भर पडली आहे. आघाडीने चांगला कौल मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष असल्याचे सांगितल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.सानप यांच्यावर मोठी जबाबदारीभाजपाचे शहराध्यक्ष असताना बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या आणि ६६ जागा मिळाल्या. सानप यांनी अनेक जणांना उमेदवारी दिली होती. काही नगरसेवक विधानसभा निवडणुकीत त्यांचा खुला प्रचार करीत होते तर काही जण छुपा प्रचार करीत होते यामुळे महापालिकेतील सत्तांतरासाठी त्यांच्यावर राष्टवादी कॉँग्रेस जबाबदारी देऊ शकते.पक्षांतराची अडचणमहापालिका अधिनियमात यापूर्वी पक्षातून फुटून वेगळा गट नोंदविण्याची तरतूद होती. पक्षातील एक तृतीयांश नगरसेवक फुटून वेगळा गट नोंदवू शकत होते. मात्र अनार्हता शीर्षाखालील कलम ४ मधील ही तरतूद २००६ मध्ये हटविण्यात आली असल्याने आता ब गट स्थापनेसारखे प्रकार करणे शक्य नाही. पक्षादेशाच्या विरोधात कृती केल्यास थेट अपात्र ठरविले जाईल. आता फोडाफोडीचे राजकारण कसे जमते ते बघणे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण