शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

मनपात सत्तांतराच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:57 IST

विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी आणि कॉँग्रेसने चांगली मजल मारल्यानंतर आता स्थानिक स्वराज संस्थांवरदेखील लक्ष केंद्रित केले जाण्याचे संकेत छगन भुजबळ यांनी दिले आहेत. शिवसेनेलादेखील सत्ता हवीच असल्याने आता पुढील महिन्यात होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत सत्तांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी आणि कॉँग्रेसने चांगली मजल मारल्यानंतर आता स्थानिक स्वराज संस्थांवरदेखील लक्ष केंद्रित केले जाण्याचे संकेत छगन भुजबळ यांनी दिले आहेत. शिवसेनेलादेखील सत्ता हवीच असल्याने आता पुढील महिन्यात होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत सत्तांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.अर्थातच त्यासाठी भाजपचे काही नगरसेवक फोडण्याचे महत्त्वाचे काम करण्याची तयारी सुरू असून, ते यशस्वी झाल्यास शिवसेना, मनसे, कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि अपक्ष अशी मोट बदलून महापौरपद मिळवण्याची तयारी सुरू झाल्याचे वृत्त आहे. महापौरपदाची निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या आधी म्हणजेच सप्टेंबर महिन्यात होणार होती.मात्र, महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून, भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे तिकीट कापल्याने ते राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये दाखल झाले आणि पक्षानेदेखील त्यांना उमेदवारी दिली. त्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे सानप यांना भेटल्याने त्याचवेळी वेगळे समीकरण जुळवले जात असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यात आता राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची भर पडली आहे. आघाडीने चांगला कौल मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष असल्याचे सांगितल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.सानप यांच्यावर मोठी जबाबदारीभाजपाचे शहराध्यक्ष असताना बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या आणि ६६ जागा मिळाल्या. सानप यांनी अनेक जणांना उमेदवारी दिली होती. काही नगरसेवक विधानसभा निवडणुकीत त्यांचा खुला प्रचार करीत होते तर काही जण छुपा प्रचार करीत होते यामुळे महापालिकेतील सत्तांतरासाठी त्यांच्यावर राष्टवादी कॉँग्रेस जबाबदारी देऊ शकते.पक्षांतराची अडचणमहापालिका अधिनियमात यापूर्वी पक्षातून फुटून वेगळा गट नोंदविण्याची तरतूद होती. पक्षातील एक तृतीयांश नगरसेवक फुटून वेगळा गट नोंदवू शकत होते. मात्र अनार्हता शीर्षाखालील कलम ४ मधील ही तरतूद २००६ मध्ये हटविण्यात आली असल्याने आता ब गट स्थापनेसारखे प्रकार करणे शक्य नाही. पक्षादेशाच्या विरोधात कृती केल्यास थेट अपात्र ठरविले जाईल. आता फोडाफोडीचे राजकारण कसे जमते ते बघणे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण