शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

एकलहरे केंद्र जागेवर सोलर पॉवर प्लॅन्टची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:20 IST

औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पापर्यंत कोळसा पोहचविणे खर्चिक बाब असल्याने अशा प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणे आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरत आहे. त्यामुळे असे प्रकल्प वाढविण्यापेक्षा आहे त्या स्थितीत ठेवून तेथील जागांवर सोलर पॉवर एनर्जी प्रकल्प उभारण्याची योजना असल्याने एकलहरे येथील जागेत सोलर पॉवर प्लॅन्ट उभारला जाऊ शकतो, असे संकेत राज्याच्या होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिले.

नाशिक : औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पापर्यंत कोळसा पोहचविणे खर्चिक बाब असल्याने अशा प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणे आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरत आहे. त्यामुळे असे प्रकल्प वाढविण्यापेक्षा आहे त्या स्थितीत ठेवून तेथील जागांवर सोलर पॉवर एनर्जी प्रकल्प उभारण्याची योजना असल्याने एकलहरे येथील जागेत सोलर पॉवर प्लॅन्ट उभारला जाऊ शकतो, असे संकेत राज्याच्या होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिले. त्यामुळे एकलहरे औष्णिक केंद्राच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.आघाडी सरकारच्या काळात एकलहरे येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे विस्तारीकरण करण्याच्या हालचाली सुरू असतानाच सत्तांतरानंतर एकलहरे प्रकल्प थेट नागपूरला स्थलांतरित करण्याबाबतची चर्चा होऊ लागली. त्यामुळे येथील कामगार, पूरक व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी सदर प्रकल्प कामयस्वरूपी सुरू राहावा यासाठी कृती समितीच्या माध्यमातून लढा सुरू केला आहे. यापूर्वी पाच संचाच्या साह्याने सुमारे साडेनऊशे मेगावॉट वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रातील संच टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले आहेत तर सध्या २१० मेगावॉटचे केवळ तीन संच कार्यान्वित आहेत.ग्रीन एनर्जी प्रस्तावित१२व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांमध्ये संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात पवन आणि सौरऊर्जा वीज निर्मिती प्रकल्पांची उभारणी प्रस्तावित आहे. यासाठी नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे नवीन प्रकल्पांच्या उभारणीसाठी ग्रीन एनर्जी कॉरिडॉर योजना राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून एकलहरे येथील जागेची पडताळणी होऊन शकते. एकलहरे प्रकल्पाची सुमारे ६८५ हेक्टर इतकी जागा आहे तर यातील केवळ ३५ ते ४० टक्केच जागेचा वापर होत असून उर्वरित जागा पडून आहे.ज्या औष्णिक प्रकल्पांमधून कमी प्रमाणात वीज निर्मिती होत आहे तेथील उपलब्ध जागेचा वापर हा सोलर पॉवर प्लॅन्ट उभारण्यासाठी करण्याचा सरकारचा विचार आहे. एकलहरे येथील रोजगार कमी होऊ नये म्हणून या ठिकाणी सोलर प्लॅन्टचा पर्याय असल्याचे सुचक विधानही पाठक यांनी केले आहे. त्यामुळे औष्णिक केंद्र केव्हाही गुंडाळले जाऊ शकते, असाच अर्थ यातून काढला जात आहे.औष्णिक वीज निर्मिती करणे खर्चिक बाब असल्यामुळे या केंद्रातून कमी प्रमाणात वीज निर्मिती केली जात आहे,मात्र सदर प्रकल्प बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचा विश्वास होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिला आहे.असे असले तरी ज्या ठिकाणी कोळसा पोहचविणे खर्चिक आहे तेथील संच पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य नसल्याचेदेखील त्यांनी सांगितल्यामुळे एकलहरे प्रकल्प आहे त्याच स्थितीत राहणार की भविष्यात बंद होणार याविषयीचे प्रश्नचिन्ह कायम आहे.सध्या एकलहरे येथील औष्णिक केंद्रात दोनच संचांमधूनच वीज निर्मिती केली जात आहे. तर एक संच बंद अवस्थेत असल्यामुळे एकलहरे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प अखेरच्या घटका मोजत असल्याच्या धसक्याने कामगारांसह गावकरीदेखील धास्तावले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज