शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

एकलहरे केंद्र जागेवर सोलर पॉवर प्लॅन्टची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:20 IST

औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पापर्यंत कोळसा पोहचविणे खर्चिक बाब असल्याने अशा प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणे आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरत आहे. त्यामुळे असे प्रकल्प वाढविण्यापेक्षा आहे त्या स्थितीत ठेवून तेथील जागांवर सोलर पॉवर एनर्जी प्रकल्प उभारण्याची योजना असल्याने एकलहरे येथील जागेत सोलर पॉवर प्लॅन्ट उभारला जाऊ शकतो, असे संकेत राज्याच्या होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिले.

नाशिक : औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पापर्यंत कोळसा पोहचविणे खर्चिक बाब असल्याने अशा प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणे आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरत आहे. त्यामुळे असे प्रकल्प वाढविण्यापेक्षा आहे त्या स्थितीत ठेवून तेथील जागांवर सोलर पॉवर एनर्जी प्रकल्प उभारण्याची योजना असल्याने एकलहरे येथील जागेत सोलर पॉवर प्लॅन्ट उभारला जाऊ शकतो, असे संकेत राज्याच्या होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिले. त्यामुळे एकलहरे औष्णिक केंद्राच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.आघाडी सरकारच्या काळात एकलहरे येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे विस्तारीकरण करण्याच्या हालचाली सुरू असतानाच सत्तांतरानंतर एकलहरे प्रकल्प थेट नागपूरला स्थलांतरित करण्याबाबतची चर्चा होऊ लागली. त्यामुळे येथील कामगार, पूरक व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी सदर प्रकल्प कामयस्वरूपी सुरू राहावा यासाठी कृती समितीच्या माध्यमातून लढा सुरू केला आहे. यापूर्वी पाच संचाच्या साह्याने सुमारे साडेनऊशे मेगावॉट वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रातील संच टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले आहेत तर सध्या २१० मेगावॉटचे केवळ तीन संच कार्यान्वित आहेत.ग्रीन एनर्जी प्रस्तावित१२व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांमध्ये संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात पवन आणि सौरऊर्जा वीज निर्मिती प्रकल्पांची उभारणी प्रस्तावित आहे. यासाठी नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे नवीन प्रकल्पांच्या उभारणीसाठी ग्रीन एनर्जी कॉरिडॉर योजना राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून एकलहरे येथील जागेची पडताळणी होऊन शकते. एकलहरे प्रकल्पाची सुमारे ६८५ हेक्टर इतकी जागा आहे तर यातील केवळ ३५ ते ४० टक्केच जागेचा वापर होत असून उर्वरित जागा पडून आहे.ज्या औष्णिक प्रकल्पांमधून कमी प्रमाणात वीज निर्मिती होत आहे तेथील उपलब्ध जागेचा वापर हा सोलर पॉवर प्लॅन्ट उभारण्यासाठी करण्याचा सरकारचा विचार आहे. एकलहरे येथील रोजगार कमी होऊ नये म्हणून या ठिकाणी सोलर प्लॅन्टचा पर्याय असल्याचे सुचक विधानही पाठक यांनी केले आहे. त्यामुळे औष्णिक केंद्र केव्हाही गुंडाळले जाऊ शकते, असाच अर्थ यातून काढला जात आहे.औष्णिक वीज निर्मिती करणे खर्चिक बाब असल्यामुळे या केंद्रातून कमी प्रमाणात वीज निर्मिती केली जात आहे,मात्र सदर प्रकल्प बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचा विश्वास होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिला आहे.असे असले तरी ज्या ठिकाणी कोळसा पोहचविणे खर्चिक आहे तेथील संच पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य नसल्याचेदेखील त्यांनी सांगितल्यामुळे एकलहरे प्रकल्प आहे त्याच स्थितीत राहणार की भविष्यात बंद होणार याविषयीचे प्रश्नचिन्ह कायम आहे.सध्या एकलहरे येथील औष्णिक केंद्रात दोनच संचांमधूनच वीज निर्मिती केली जात आहे. तर एक संच बंद अवस्थेत असल्यामुळे एकलहरे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प अखेरच्या घटका मोजत असल्याच्या धसक्याने कामगारांसह गावकरीदेखील धास्तावले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज