शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

नाशकातील विद्यार्थ्यांचे पर्यावरण संवर्धनासाठी 'पोलूशन वर सोलूशन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 16:18 IST

ग्रामोदय माध्यमिक विद्यालयात पोलूशन वर सोलूशन उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांनी विविध चित्र रेखाटून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांनी झाडांच्या तीन पानांवर 'कचरा जाळत नाही 'रू 5000/दंड आहे, 'कचरा घंटागाडीतच टाकतो', 'कचरा वर्गीकरण करतो' अशा प्रकारच्या स्वच्छतेवर आधारित प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठीच्या उपाययोजना सांगणारे घोषवाक्य लिहितांनाच प्रदुषणामुळे पर्यावरणाची होणारी हाणी आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा विपरीत परिणाम या विषयी जनजागृती केली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे 'पोलूशन वर सोलूशन' पर्यावरण संवर्धनासाठी रेखाटले चित्र चित्रकलेच्या माध्यमातून केली जनजागृती

नाशिक : ग्रामोदय माध्यमिक विद्यालयात पोलूशन वर सोलूशन उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांनी विविध चित्र रेखाटून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांनी झाडांच्या तीन पानांवर 'कचरा जाळत नाही 'रू 5000/दंड आहे, 'कचरा घंटागाडीतच टाकतो', 'कचरा वर्गीकरण करतो' अशा प्रकारच्या स्वच्छतेवर आधारित प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठीच्या उपाययोजना सांगणारे घोषवाक्य लिहितांनाच प्रदुषणामुळे पर्यावरणाची होणारी हाणी आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा विपरीत परिणाम या विषयी जनजागृती केली. यावेळी विद्याथ्यार्ंनी त्यांच्या पालकांनाही आपल्या घरी व परिसरातील सर्व लोकांनीही तंतोतंत पाळव्यात अशी विनंती केली असून विद्यालयात विद्यार्थ्यांकडून याविषयावर आधारित एक प्रतिज्ञा म्हणून घेतली.विद्यार्थ्यांच्या चित्रकलेच्या या उपक्रमामुळे नाशिक शहरातील प्रदुषण रोखण्यास हातभार लागणार असून प्रदूषित शहरांमध्ये समावेश असलेल्या नाशकातील भावी पीढी अशा प्रकार पर्यावरण संवधर्नाचा विचार करून लागल्याने नाशिकचा पर्यावरण दृष्ट्या असलेला लौकिक व गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यास योगदान मिळणार आहे. भारतातील महत्वाची नदी व महाराष्ट्राची गंगा म्हणून आज भारतभर गोदावरी नदी प्रचलित आहे. परंतु, सध्या गोदावरीलाही प्रदुषणाचे ग्रहण लागले आहे. त्याचा नदीकाठच्या अनेक गावांना फटका बसत आहे. नदीमध्ये शहरतील अनेक वस्त्यामधील सांडपाणी नदीपात्रात सोडल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.नाशिक शहरात दररोज धावणाऱ्या वाहनांची संख्या साडेतीन लाखांच्या वर गेली आहे. दरवर्षी :वाहनांच्या संख्येत सातत्याने भर पडत असल्याने वायू प्रदूषणाची समस्या भेडसावू लागली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक शहरही प्रदूषणाबाबत वरच्या स्थानावर आले आहे. शहर प्रदूषणमुक्त राहण्यासाठी दक्ष राहण्याचा संदेश या विद्यार्थ्यार्ंनी त्यांच्या चित्रकलेच्या माध्यमतून दिला असून नाशिकचे भावी नागरिक आतापासूनच प्रदुषणावर उपाय शोधू लाघल्याने स्वच्छ व सुंदर नाशिक शहराचा संकल्प लवकरच पूर्ण होईल, अशा विश्वास नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयSchoolशाळाStudentविद्यार्थी