शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नाशिक महापालिकेत कर्जामागचे राजकारण, सोयीचाच भाग !

By संजय पाठक | Updated: January 28, 2021 16:50 IST

नाशिक : महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने आता गेली चार वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या अनेक नगरसेवकांचा आता पक्ष धर्म जागृत झाला आहे. सत्तेवर भाजप असल्याने लगेच शिवसेना आणि काँग्रेससह काही पक्षांनी विरोध सुरू केला आहे. वास्तविक, यापूर्वी महापालिकेने कर्ज काढले नव्हते असे नाही. त्या कर्जामुळे वाहिलेल्या गंगेत सारेच पक्ष न्हाऊन निघाले आहेत. आताही एरव्ही सर्व निर्णय एकमेकांच्या सहमतीने हेात असताना अचानक कर्ज काढण्यावरून सुरू झालेले आरोप प्रत्यारोप नाशिककरांचे मनोरंजन करणारे ठरत आहे.

ठळक मुद्दे काँग्रेसने सर्व प्रथम काढले कर्ज निवडणुकीपूर्वी एकत्र, मग विरोध

संजय पाठक, नाशिक : महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने आता गेली चार वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या अनेक नगरसेवकांचा आता पक्ष धर्म जागृत झाला आहे. सत्तेवर भाजप असल्याने लगेच शिवसेना आणि काँग्रेससह काही पक्षांनी विरोध सुरू केला आहे. वास्तविक, यापूर्वी महापालिकेने कर्ज काढले नव्हते असे नाही. त्या कर्जामुळे वाहिलेल्या गंगेत सारेच पक्ष न्हाऊन निघाले आहेत. आताही एरव्ही सर्व निर्णय एकमेकांच्या सहमतीने हेात असताना अचानक कर्ज काढण्यावरून सुरू झालेले आरोप प्रत्यारोप नाशिककरांचे मनोरंजन करणारे ठरत आहे.

महापालिकेत १९९२ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाल्यानंतर सुरुवातीला काही काळ रुटीन कामकाज हेाते. परंतु नंतर मात्र ट्रेंड बदलला. भरघोस विकासकामे करायची असेल तर त्यासाठी निधी हवा आणि नियमित अंदाजपत्रकाच्या पलीकडे कामे करावी लागणार असतील तर दोन ते तीन पर्याय उपलब्ध होऊ शकतात. त्यात पहिला म्हणजे सरकारकडून विशेष अनुदान मिळविणे आणि दुसरीबाब म्हणजे कर्ज काढणे. राज्यात सरकार कोणाचे आणि महापालिकेत सत्ता कोणाची यावर सरकारी अनुदानाचा राजकीय निर्णय अवलंबून असतो. त्यातच एका महापालिकेला विशेष बाब म्हणून मदत केली तर अन्य महापालिकेकडूनदेखील मागणी होते. त्यामुळे सहसा पहिला पर्याय वापरला जात नाही. त्यातच नाशिकमध्ये भाजपची, तर राज्यात शिवसेना सत्तेवर असल्याने हा पर्याय होऊच शकत नाही. दुसरा पर्याय कर्जाचा आहे, त्यात वेगवेगळे विकल्प आहेत. कर्ज उभारणे, कर्जासाठी रोखे उभारणे आणि तिसरी बाब म्हणजेच डिफर्ड पेमेंट म्हणजेच ठेकेदारांकडून रस्ते तयार करून घेऊन त्यांना स्वव्याज परतफेड टप्प्याटप्प्याने करणे असे अनेक पर्याय आहेत. समजा कोणतेही कर्ज काढले की ते फेडणे स्वाभाविक असते. आणि ते फेडले जाते. नाशिकमध्ये कर्ज काढण्याची पहिली सुरुवात काँग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात करण्यात आली. १९९९मध्ये डॉ. शोभा बच्छाव महापौर असताना कर्जरोखे काढण्यात आले. अशाप्रकारची कर्जरोखे काढणारी राज्यातील नव्हे तर देशातील पहिली महापालिका असल्याचे सांगितले जात होते. शंभर कोटी रुपयांचे बाँडस काढल्यानंतर नाशिकमधील सहकारी बँंकाने ते घेण्यास सांगण्यात आले आणि त्या बदल्यात महापालिकेने वेगळ्या मार्गाने ठेवी ठेवल्या आणि सहकारी बॅंकाना आर्थिक सुरक्षितता दिली. परंतु हा प्रयोग यशस्वी ठरला. नियमानुसार बॉंडसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेडदेखील झाली. याशिवाय अन्य पर्यायदेखील वेळोवेळी वापरण्यात आले आहेत. डिफर्ड पेमेंट कर्जाऊ स्वरूपाचे असल्याने त्याचाही वापर झाला तर बँकेकडून कर्ज काढण्याचेही प्रकार घडले आहेत. अगदी अलीकडे म्हणजेच २०१८ मध्ये तुकाराम मुंढे यांनी मुदतपूर्व कर्जफेड करून महापालिकेचा व्याजापोटी लागणारा मोठा भुर्दंड वाचविला आहे. थोडक्यात महापालिकेने कर्जाचे अनेक फंडे वापरून बघितले आहेत. त्यामुळे त्यातून फार काही वेगळे झाले आणि महापालिकेला कर्जामुळे पगार थांबवावे लागले किंवा नागरिकांच्या माथी कर्जाचा बोजा टाकावा लागला असे नाही.

खरे तर नाशिक महापालिकेची नवी वर्गवारी ‘ब’ अशी आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेला अगदी जागतिक बँकेकडूनदेखील कर्ज घेता येऊ शकते. राहिला प्रश्न सरकारच्या परवानगीचा तर आता कोरोनामुळे राज्य सरकारांचीच आर्थिक परिस्थिती जेम-तेम आहे. तेव्हा केंद्र सरकारनेच त्यांना सॉफ्टलोन घ्या, असे सांगितले आहे. त्यामुळे राज्य सरकारला ही मुभा असेल तर महापालिका त्यापेक्षा खालील आहेत. मुळातच महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे महापालिकेला त्यांच्या गरजेनुसार कर्ज घेण्याचा पूर्णत: अधिकार आहे. परंतु हा कायदेशीर मुद्दा तपासायचा केाणाला? महापालिकेत सत्ता भाजपची असेल तर सेना, राष्ट्रवादी आणि सर्व प्रथम कर्जबाजारी करणाऱ्या कॉंग्रेसने विरोध करायचा तेच सत्ता बदल झाल्यावर भाजपने टीका करायचे हा पट लिहिलेल्या नाट्यसंहितेसारखाच आहे. यात सर्वसामान्यांच्या अपेक्षाचा कोण विचार करतो? कालपर्यंत महापालिकेत सत्ता म्हणून निर्णय घेणारे सत्तारूढ पक्ष आणि त्यांच्या निर्णयात अप्रत्यक्ष सहभागी होऊन दिखावा म्हणून विरोध करणारे विरोधी पक्ष हे सर्वसारखेच आहे. हे न अेाळखण्याइतपत नागरिक थेाडेच दुधखुळे आहेत?

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस