शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
3
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
4
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
5
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
6
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
7
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
8
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
9
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
10
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
11
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
12
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
13
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
14
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
15
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
16
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
17
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
18
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
19
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
20
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला

काव्यातून उमटले समाजव्यवस्थेवर भाष्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:28 IST

‘मागतो संवाद टाळतो मी वाद आता, माणसाच्या अंतरंगाला घालतो साद आता’, ‘विद्रोह शिव्या नसतो, विद्रोह असतो तुकारामांच्या ओव्या’, ‘बाप जेवायचा, पण अर्धीच भूक राखून’ या आणि अशा विद्रोही कवितांचे सादरीकरण रविवारी (दि. २९) ‘देश आमचा देव नाही देह आहे’ या वैचारिक वादळी कविसंमेलनात करण्यात आले.

नाशिक : ‘मागतो संवाद टाळतो मी वाद आता, माणसाच्या अंतरंगाला घालतो साद आता’, ‘विद्रोह शिव्या नसतो, विद्रोह असतो तुकारामांच्या ओव्या’, ‘बाप जेवायचा, पण अर्धीच भूक राखून’ या आणि अशा विद्रोही कवितांचे सादरीकरण रविवारी (दि. २९) ‘देश आमचा देव नाही देह आहे’ या वैचारिक वादळी कविसंमेलनात करण्यात आले.  परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कवी संमेलनात माणूस हा के ंद्रबिंदू मानून आजच्या समाज व्यवस्थेवर भाष्य करणाºया अनेकविध विद्रोही कवितांचे सादरीकरण करण्यात आले. पुणे येथील कवी रवींद्र कांबळे यांनी सुरुवातीला ‘मागतो संवाद टाळतो मी वाद आता’ ही कविता सादर करत आपल्या सभोवताली वेळोवेळी घडणाºया वादांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दीप पारधे (ठाणे) यांनी ‘चौकातला देव’ या कवितेतून अंधश्रद्धा तसेच पुरोगामी विचारसरणीच्या नेत्यांच्या झालेल्या हत्या याबाबत कवितेतून टीका केली.  उत्तरोत्तर हे काव्यसंमेलन रंगत असताना सोलापूर येथील कवी अंकुश आरेकर याने आपल्या कवितेतून आजची शिक्षण व्यवस्था कशी तकलादू आहे याचे दर्शन घडविले, तर सांगली येथील कवी नितीन चंदनशिवे यांनी आपल्या कवितेतून नास्तिकता, शेतकरी आत्महत्या, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे देशवासीयांचे झालेले नुकसान याबाबत भाष्य केले. नाशिक येथील कवी भीमराव कोते पाटील यांनी ‘माणसांच्या कविता’ या कवितेतून पुरोगामी, मूलतत्त्ववादी विचारसरणी अनुसरणाºया समाजातील घटकांवर मार्मिक भाष्य केले.‘देश आमचा देव नाही देह आहे’ या काव्यसंमेलनाचा नाशिक येथे सातव्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या या कविसंमेलनात जागतिक घडामोडी समोर ठेवून, देश, देशातील प्रत्येक नागरिक, भयमुक्त, रोगमुक्त, निर्भयपणे जगावा यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आकाश सोनवणे यांनी दिली. या कविसंमेलनास काव्य रसिकांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती.अनेक कवींचा सहभागकवी आकाश सोनवने यांच्या संकल्पेनेतून साकारलेल्या या काव्यसंमेलनात अंकुश आरेकर (सोलापूर), भीमराव कोते पाटील (नाशिक), राजेंद्र राठोड (पनवेल), सागर काकडे (सातारा), रवींद्र कांबळे (पुणे), नितीन चंदनशिवे (सांगली), जित्या जाली (पुरंदर), दीप पारधे (ठाणे), सुमित गुणवंत (शिरूर), हृदयमानव अशोक (अहमदनगर), गुरुनाथ साठेलकर (खोपोली) यांनी सहभाग नोंदवला.