शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

काव्यातून उमटले समाजव्यवस्थेवर भाष्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:28 IST

‘मागतो संवाद टाळतो मी वाद आता, माणसाच्या अंतरंगाला घालतो साद आता’, ‘विद्रोह शिव्या नसतो, विद्रोह असतो तुकारामांच्या ओव्या’, ‘बाप जेवायचा, पण अर्धीच भूक राखून’ या आणि अशा विद्रोही कवितांचे सादरीकरण रविवारी (दि. २९) ‘देश आमचा देव नाही देह आहे’ या वैचारिक वादळी कविसंमेलनात करण्यात आले.

नाशिक : ‘मागतो संवाद टाळतो मी वाद आता, माणसाच्या अंतरंगाला घालतो साद आता’, ‘विद्रोह शिव्या नसतो, विद्रोह असतो तुकारामांच्या ओव्या’, ‘बाप जेवायचा, पण अर्धीच भूक राखून’ या आणि अशा विद्रोही कवितांचे सादरीकरण रविवारी (दि. २९) ‘देश आमचा देव नाही देह आहे’ या वैचारिक वादळी कविसंमेलनात करण्यात आले.  परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कवी संमेलनात माणूस हा के ंद्रबिंदू मानून आजच्या समाज व्यवस्थेवर भाष्य करणाºया अनेकविध विद्रोही कवितांचे सादरीकरण करण्यात आले. पुणे येथील कवी रवींद्र कांबळे यांनी सुरुवातीला ‘मागतो संवाद टाळतो मी वाद आता’ ही कविता सादर करत आपल्या सभोवताली वेळोवेळी घडणाºया वादांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दीप पारधे (ठाणे) यांनी ‘चौकातला देव’ या कवितेतून अंधश्रद्धा तसेच पुरोगामी विचारसरणीच्या नेत्यांच्या झालेल्या हत्या याबाबत कवितेतून टीका केली.  उत्तरोत्तर हे काव्यसंमेलन रंगत असताना सोलापूर येथील कवी अंकुश आरेकर याने आपल्या कवितेतून आजची शिक्षण व्यवस्था कशी तकलादू आहे याचे दर्शन घडविले, तर सांगली येथील कवी नितीन चंदनशिवे यांनी आपल्या कवितेतून नास्तिकता, शेतकरी आत्महत्या, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे देशवासीयांचे झालेले नुकसान याबाबत भाष्य केले. नाशिक येथील कवी भीमराव कोते पाटील यांनी ‘माणसांच्या कविता’ या कवितेतून पुरोगामी, मूलतत्त्ववादी विचारसरणी अनुसरणाºया समाजातील घटकांवर मार्मिक भाष्य केले.‘देश आमचा देव नाही देह आहे’ या काव्यसंमेलनाचा नाशिक येथे सातव्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या या कविसंमेलनात जागतिक घडामोडी समोर ठेवून, देश, देशातील प्रत्येक नागरिक, भयमुक्त, रोगमुक्त, निर्भयपणे जगावा यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आकाश सोनवणे यांनी दिली. या कविसंमेलनास काव्य रसिकांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती.अनेक कवींचा सहभागकवी आकाश सोनवने यांच्या संकल्पेनेतून साकारलेल्या या काव्यसंमेलनात अंकुश आरेकर (सोलापूर), भीमराव कोते पाटील (नाशिक), राजेंद्र राठोड (पनवेल), सागर काकडे (सातारा), रवींद्र कांबळे (पुणे), नितीन चंदनशिवे (सांगली), जित्या जाली (पुरंदर), दीप पारधे (ठाणे), सुमित गुणवंत (शिरूर), हृदयमानव अशोक (अहमदनगर), गुरुनाथ साठेलकर (खोपोली) यांनी सहभाग नोंदवला.