शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

काव्यातून उमटले समाजव्यवस्थेवर भाष्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:28 IST

‘मागतो संवाद टाळतो मी वाद आता, माणसाच्या अंतरंगाला घालतो साद आता’, ‘विद्रोह शिव्या नसतो, विद्रोह असतो तुकारामांच्या ओव्या’, ‘बाप जेवायचा, पण अर्धीच भूक राखून’ या आणि अशा विद्रोही कवितांचे सादरीकरण रविवारी (दि. २९) ‘देश आमचा देव नाही देह आहे’ या वैचारिक वादळी कविसंमेलनात करण्यात आले.

नाशिक : ‘मागतो संवाद टाळतो मी वाद आता, माणसाच्या अंतरंगाला घालतो साद आता’, ‘विद्रोह शिव्या नसतो, विद्रोह असतो तुकारामांच्या ओव्या’, ‘बाप जेवायचा, पण अर्धीच भूक राखून’ या आणि अशा विद्रोही कवितांचे सादरीकरण रविवारी (दि. २९) ‘देश आमचा देव नाही देह आहे’ या वैचारिक वादळी कविसंमेलनात करण्यात आले.  परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कवी संमेलनात माणूस हा के ंद्रबिंदू मानून आजच्या समाज व्यवस्थेवर भाष्य करणाºया अनेकविध विद्रोही कवितांचे सादरीकरण करण्यात आले. पुणे येथील कवी रवींद्र कांबळे यांनी सुरुवातीला ‘मागतो संवाद टाळतो मी वाद आता’ ही कविता सादर करत आपल्या सभोवताली वेळोवेळी घडणाºया वादांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दीप पारधे (ठाणे) यांनी ‘चौकातला देव’ या कवितेतून अंधश्रद्धा तसेच पुरोगामी विचारसरणीच्या नेत्यांच्या झालेल्या हत्या याबाबत कवितेतून टीका केली.  उत्तरोत्तर हे काव्यसंमेलन रंगत असताना सोलापूर येथील कवी अंकुश आरेकर याने आपल्या कवितेतून आजची शिक्षण व्यवस्था कशी तकलादू आहे याचे दर्शन घडविले, तर सांगली येथील कवी नितीन चंदनशिवे यांनी आपल्या कवितेतून नास्तिकता, शेतकरी आत्महत्या, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे देशवासीयांचे झालेले नुकसान याबाबत भाष्य केले. नाशिक येथील कवी भीमराव कोते पाटील यांनी ‘माणसांच्या कविता’ या कवितेतून पुरोगामी, मूलतत्त्ववादी विचारसरणी अनुसरणाºया समाजातील घटकांवर मार्मिक भाष्य केले.‘देश आमचा देव नाही देह आहे’ या काव्यसंमेलनाचा नाशिक येथे सातव्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या या कविसंमेलनात जागतिक घडामोडी समोर ठेवून, देश, देशातील प्रत्येक नागरिक, भयमुक्त, रोगमुक्त, निर्भयपणे जगावा यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आकाश सोनवणे यांनी दिली. या कविसंमेलनास काव्य रसिकांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती.अनेक कवींचा सहभागकवी आकाश सोनवने यांच्या संकल्पेनेतून साकारलेल्या या काव्यसंमेलनात अंकुश आरेकर (सोलापूर), भीमराव कोते पाटील (नाशिक), राजेंद्र राठोड (पनवेल), सागर काकडे (सातारा), रवींद्र कांबळे (पुणे), नितीन चंदनशिवे (सांगली), जित्या जाली (पुरंदर), दीप पारधे (ठाणे), सुमित गुणवंत (शिरूर), हृदयमानव अशोक (अहमदनगर), गुरुनाथ साठेलकर (खोपोली) यांनी सहभाग नोंदवला.