शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
3
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
5
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
6
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
7
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
8
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
9
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
10
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
11
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
12
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
13
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
14
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
15
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
16
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
17
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
18
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
19
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
20
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

करंजगाव-मांजरगाव रस्त्यालगत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 19:09 IST

निफाड : कृषी दिनानिमित्त वन विभागाच्या वतीने निफाड तालुक्यातील करंजगाव येथे सोमवारी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सदस्य तथा जी.प. शिवसेना गटनेते बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करंजगाव-मांजरगाव रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले.

ठळक मुद्देवृक्ष दिंडी यशस्वी करण्यासाठी कृषिदूतांनी प्रयत्न केले.

निफाड : कृषी दिनानिमित्त वन विभागाच्या वतीने निफाड तालुक्यातील करंजगाव येथे सोमवारी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सदस्य तथा जी.प. शिवसेना गटनेते बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करंजगाव-मांजरगाव रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले.या योजनेअंतर्गत सुमारे पाच हजार वृक्षलागवड हिवरगाव-म्हाळसाकोरे-गाजरवाडी व करंजगाव-मांजरगाव रस्त्यावर करण्यात येणार आहे. यावेळी निफाडचे वनक्षेत्रपाल संदिप पाटील, पंचायत समिती सदस्य शहाजी राजोळे, करंजगावचे सरपंच राजेंद्र राजोळे, माजी सरपंच खंडू बोडके, नंदू राजोळे, नंदू निरभवणे, सचिन राजोळे, वनपाल अजय शिंदे, शरद चितोडे, भाऊसाहेब माळी, वनरक्षक योगिता काळे-खिरकाडे, अश्विनी सोमवंशी, हर्षवर्धन सोळसे, प्रदीप पवार, शरद दराडे आदी उपस्थित होते.खेडलेझुंगे येथे वृक्षदिंडी सोहळानिफाड : येवला तालुक्यातील बाभूळगाव कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत व तुकाराम बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खेडले झुंगे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीदिनानिमित्त खेडलेंझुगे येथे वृक्षदिंडी काढण्यात आली.वृक्ष लागवड काळाची गरज, वृक्ष संवर्धन, एक मूल एक झाड असा संदेश या वृक्ष दिंडीच्या निमित्ताने देण्यात आला. याप्रसंगी जुन्या व नवीन लावलेल्या झाडाचे केक कापून वाढदिवस देखील साजरे करण्यात आले. यावेळी सरपंच सुषमा गीते, प्राचार्य एस. सी. राहटल, पर्यवेक्षक डी. पी. कडवे, वायकर, क्षीरसागर, विलास निरभवणे, पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब केदारे तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्र माचे आयोजन कृषी महाविद्यालय बाभूळगाव येवला येथील प्रामुख्याने अनिकेत बोरस्ते, अभिजित भड, गौरव थोरात, ऋ षिकेश दरेकर, अक्षय बागल, विवेक भगरे, सुरज तिडके, गोरख कोल्हे, धनंजय निकम या कृषिदूतांनी केले होते त्यांना प्राचार्य डॉ. डी. पी. कूळधर, डॉ. किशोर मुठाळ, प्रा. जयपाल राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.येवला तालुक्यातील बाभूळगाव कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत, जळगांव ग्रामपंचायत व जि. प. प्राथमिक शाळा यांच्यावतीने कृषी दिनानिमित्त तालुक्यातील जळगांव येथे कृषी दिंडी काढण्यात आली होती. याप्रसंगी विनता वडघुले, गणेश वडघुले, ज्ञानेश्वर वडघुले, रमेश वडघुले, अमति वडघुले, जि. प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय डेर्ले, आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसगी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.ही वृक्ष दिंडी यशस्वी करण्यासाठी शुभम भालेराव, श्याम आगळे, अमर लिंगाराव, चंदू मधूमानी, भूषण भालेराव, प्रवीण देवरे, तुषार बोरसे, राहुल देशमुख या कृषिदूतांनी प्रयत्न केले.