शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

समाजात साहित्यिकाचे स्थान अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:31 AM

समाजमनावर माध्यमांचा प्रभाव पडत जरी असला तरी नव्या पिढीच्या लेखनावर त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. सोशल मीडियाच्या काळातही साहित्य व साहित्यिक सुरक्षित असून, त्यांचे महत्त्व कायम अबाधित राहणार आहे, यात तीळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन ‘फेसाटी’ कादंबरीचे युवा लेखक नवनाथ गोरे यांनी केले.

ठळक मुद्देनवनाथ गोरे : सावानाच्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन

नाशिक : समाजमनावर माध्यमांचा प्रभाव पडत जरी असला तरी नव्या पिढीच्या लेखनावर त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. सोशल मीडियाच्या काळातही साहित्यसाहित्यिक सुरक्षित असून, त्यांचे महत्त्व कायम अबाधित राहणार आहे, यात तीळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन ‘फेसाटी’ कादंबरीचे युवा लेखक नवनाथ गोरे यांनी केले.सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी (दि.१३) करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून गोरे बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ‘लोकमत’च्या फिचर एडिटर अपर्णा वेलणकर होत्या. समवेत कवी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी संजय चौधरी, सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके उपस्थित होते. यावेळी गोरे म्हणाले, नाशिकच्या भूमीने शारदेला अनेक बहुमूल्य रत्न दिले आहे, त्यामुळे ही भूमी नेहमीच श्रेष्ठ ठरणारी आहे. या भूमित मेळाव्याच्या निमित्ताने प्रथमच पाय ठेवण्याची संधी लाभली हे भाग्यच. काळानुरूप साहित्यिकाने आपल्यामध्ये बदल करून माहिती तंत्रज्ञानाच्या युगाचा फायदा साहित्याच्या प्रगतीसाठी करून घ्यायला हवा. कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘शेवटी साहित्यिक हा शब्दांचा सौदागर आहे’, हे विसरून चालणार नाही, असे गोरे म्हणाले.प्रास्ताविक प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. शंकर बोºहाडे यांनी केले.आजचा काळ गुंतागुंतीचा : अपर्णा वेलणकरअपर्णा वेलणकर यांनी आजचा अभिव्यक्तीचा काळ हा संभ्रमावस्था निर्माण करणारा असल्याचे सांगितले. सोशल मीडियाद्वारे मनुष्य हजारोंच्या संख्येने लोकांशी जोडला गेला असला तरीदेखील त्याला त्याच्या मनातील गोष्टी बोलून दाखविण्यासाठी असा एक जवळचा मित्र या काळात सापडणे दुरापास्त झाले आहे, हीदेखील चिंतेची बाब असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे हा काळ एकाकीपणाची जाणीवदेखील करून देतो.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिकcultureसांस्कृतिक