शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नाशकात टमाटा व्यापाऱ्याला पिस्तूल लावून खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:22 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटा खरेदी विक्रीचे व्यवहार  करणाऱ्या एका टमाटा व्यापाऱ्याला तिघा संशयित आरोपींनी डोक्याला पिस्तूल लावून डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न करीत सायंकाळपर्यंत 50 हजार रुपये दिले नाही तर जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.15) सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला आहे.

ठळक मुद्दे टमाटा व्यापाऱ्याला पिस्तूल लावून खंडणीची मागणी शेतकऱ्यांकडून माल न घेताच व्यापारी परतले माघारीबाजार समितीतील व्यापाऱ्यांमध्ये गुंडांची दहशत

नाशिक : दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटा खरेदी विक्रीचे व्यवहार  करणाऱ्या एका टमाटा व्यापाऱ्याला तिघा संशयित आरोपींनी डोक्याला पिस्तूल लावून डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न करीत सायंकाळपर्यंत 50 हजार रुपये दिले नाही तर जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.15) सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळच्या सुमाराला घडलेल्या घटनेमुळे शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्या शेकडो व्यापारी, आडत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दुपारी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या सर्व संचालक मंडळाने पोलीस ठाण्यात धाव घेत झाल्याप्रकाराबाबत तपास करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन दिले आहे. बाजारसमितीत खंडणी मागणारे आरोपी दुचाकीवरून आल्याचे बाजारसमिती कॅमेऱ्यात कैद झाले आहे. काही दिवसांपूर्वी एका युवकाचा खून प्रकरणात सहभाग असलेले संशयित व त्यांचे हस्तक बाजारसमितीतील व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली करीत असल्याचे व्यापाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखविले आहे. या प्रकारामुळे  बाजारसमितीत व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्यामाहितीनुसार,  बाजारसमितीत  सोमवारी सकाळी बाजारसमितीत टमाटा व्यापारी त्याच्या गाळ्यात असताना ऍक्टिव्हा दुचाकीवरून तिघे भामटे आले त्यांनी थेट त्या व्यापाऱ्याच्या गाळ्यात जाऊन त्याला शिवीगाळ करीत हातातील पिस्तूल डोक्याला लावून तर अन्य एकाने हातात दगड घेत डोक्यात मारण्याचा प्रयत्न करून संध्याकाळपर्यंत 50 हजार रुपये खंडणी दे नाहीतर जिवंत ठार मारू अशी धमकी दिली. सदर प्रकरणानंतर त्या व्यापाऱ्याने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. दरम्यान,अशा प्रकारे व्यापाऱ्याकडे खंडणी मागण्याचा प्रकार घडल्याने तसेच दोन ते तीन शेतकऱ्यांना मारहाण केल्यामुळे भयभीत झालेल्या 5 ते 6 व्यापाऱ्यांनी शेतमाल वाहनात न भरताचं बाजारसमितीतून काढता पाय घेतला. बाजारसमितीत गेल्या काही महिन्यांपासून गुंडाराज वाढला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे टोळके व खून प्रकरणातील संशयित व आरोपींचे हस्तक व्यापारी, आडत्यांना धमकी देत खंडणी वसूल करत असल्याचा धक्कादायक खुलासा व्यापाऱ्यांनी केला आहे. गुंड प्रवृत्तीचे टोळके शेतकऱ्यांना मारहाण करून त्यांचा शेतमाल पळविणे, पैसे काढून घेणे असा प्रकार करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसMarketबाजार