शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यपालांच्या आगमनाने पसरले गुलाबी चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 01:06 IST

श्याम खैरनार सुरगाणा : गुलाबी गाव म्हणून लौकिक असलेल्या सुरगाणा तालुक्यातील भिंतघर येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आगमनामुळे अवघ्या ...

ठळक मुद्देभिंतघरला दिवाळी साजरी : सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण, गोशाळेचे उद‌्घाटन

श्याम खैरनारसुरगाणा : गुलाबी गाव म्हणून लौकिक असलेल्या सुरगाणा तालुक्यातील भिंतघर येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आगमनामुळे अवघ्या गावात गुलाबी चैतन्य पसरले आणि ग्रामस्थांनी सडा-रांगोळी घालत, गुढ्या उभारत जणू दिवाळीच साजरी केली. राज्यपालांनीही या आदिवासी संस्कृतीशी आपली नाळ जोडली असल्याचे सांगत भरभरून कौतुक केले आणि आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर चिंतन केले.

तालुक्यातील रोकडपाडा ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत असलेले गुलाबी गाव भिंतघर येथील आदिवासी सांस्कृतिक भवन इमारतीचे लोकार्पण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले तसेच येथील गोशाळेचे देखील उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोश्यारी यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधताना सांगितले की, मला आदिवासी संस्कृती आवडते. येथील लोक प्रकृतीने चांगले आहेत. मी नंदुरबारमध्ये गावातच राहिलो होतो. आदिवासी भागातील महिलांना केवळ सात किंवा दहा हजार रुपयांचे चेक देऊन फारसा उपयोग होणार नाही. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

शेतीसह सर्व कामे व्यवस्थित व्हावी यासाठी मी व सरकार प्रयत्न करत आहे. पेसा कायद्याअंतर्गत चांगले अधिकार दिले आहेत. पूर्वीपेक्षा आत्ताचा काळ प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय धावपटू कविता राऊत व एवरेस्ट शिखर पादाक्रांत केलेली हेमलता गायकवाड या दोघींचे त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. स्नेहा शिरोळे यांनी केले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोडे, जि. प. सदस्य कलावती चव्हाण, एन . डी. गावित, रोकड पाडा ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच कांतीलाल खांडवी आदी उपस्थित होते.वनपट्टा सातबारा लाभार्थ्यांना सुपूर्दकार्यक्रमात वनपट्टा लाभार्थी तुळशीराम लहानु जाधव (भिंतघर), गुलाब पांडू वाघेरे(अंबोडे), बंसू काशिराम कडाळी(भिंतघर)या तीन आदिवासी मजुरांना वनपट्टा सातबारा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे लाभार्थी विमलबाई किसन जाधव (भिंतघर) यांना घरकुलाची चावी सुपुर्द करण्यात आली. .राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आमच्या गावात आल्याने खूप आनंद झाला. या गावात आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून हातसडीचा तांदूळ, आकाशकंदील, वनौषधी इत्यादी व्यवसाय करतो. त्यांच्या या दौऱ्यामुळे मार्केटिंगला वाव मिळून सर्व महिलांना चांगला रोजगार उपलब्ध होईल तसेच शेतीमालाला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे.- सविता जाधव, सखी महिला बचत गटराज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने पाणी, रस्ते, सपाटीकरण, शिक्षण, आरोग्य व्यवस्था यांचा समावेश आहे. आमच्या मागण्या पूर्ण होतील याची खात्री आहे.- कांतीलाल कृष्णा खांडवी, सरपंच

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी