शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

दसऱ्याच्या तोंडावर नाशिककरांना गढूळ पाण्याचा 'प्रसाद'; मनपाविरोधात महिलांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 09:47 IST

संतप्त महिलांनी रस्त्यावर आपटले हंडे अन सोडले नळ, एकाही लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्याने दखल घेतली नाही

नाशिक : दसऱ्याच्या एक दिवस अगोदर गुरुवारी सकाळी नाशिक महानगरपालिके या गलथान कारभाराचा फटका पुन्हा एकदा नागरिकांना बसला सणासुदीच्या काळात नाशिक मधील महापालिकेच्या प्रभाग 30 मध्ये असलेल्या वडाळागाव परिसरामध्ये नळांना अक्षरशः पावसाच्या पाण्याप्रमाणे पुरवठा झाल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यावर सोडून दिले तसेच महिलांनी हंडे आपटून मनपा पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त केला.

माती मिश्रित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सलग 2 तास नळांना असेच अशुद्ध गढूळ पाणी आल्याने हे पाणी नागरिकांनी नळ सुरू करून रस्त्यावर सोडले. दरम्यान मनपाचे अधिकारी कोणत्याही लोकप्रतिनिधी, नगरसेवक, महापौर यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी फोन देखील रिसिव्ह न केल्याने संतापात अधिकच भर पडली.

वडाळा गावात अशा प्रकारे दूषित पाणीपुरवठा होण्याची ही पहिली वेळ नसल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला नेहमीच धोका निर्माण होतो. पाणी पुरवठा विभागाने होणाऱ्या दूषित पाणी पुरवठाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.  गुरुवार (दि14) रोजी सकाळी वडाळा गावातील खंडोबा चौक, माळी गल्ली, राजवाडा, रामोशी वाडा, गरीब नवाज कॉलनी, गोपालवाडीसह आदी परिसरात दूषित पाणीपुरवठा झाल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे गावातील नागरिकांना पोटाचे विकाराच्या तक्रारी उद्धभवू शकतात तसेच अशुद्ध पाण्यावाटे पसरणाऱ्या आजराची लागण होण्याची श्यक्यता नाकारता येत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे .मग मुकणे धरणातील पाणी फिल्टर होत नाही का...?नाशिक महानगर पालिकेकडून गंगापूर मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आज वडाळा गावाला पाणीपुरवठा करणारा जलकुंभ मुकणे धरणात जलवाहिनीद्वारे भरला गेला त्यामुळे गावात गढूळ पाणी पुरवठा झाल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले तर मग मुकणेमधून येणारे पाणी फिल्टर होत नाही का असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केलेला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक