शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

तिघा पादचारी देवीभक्तावर काळाने घातली झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:11 IST

कळवण : अनेक किमी अंतर पायी वाटचाल करत मजल दरमजल करून चैत्रोत्सव निमित्ताने आई भगवतीच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या तिघा देवीभक्तावर कळवणजवळ कोल्हापूर फाटा येथे सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास काळाने झडप घातल्याने एक देवीभक्त जागीच ठार झाला तर दोन नाशिक येथे औषधोपचार दरम्यान मृत्युमुखी पडल्याने या अपघातात ३ ठार तर दोघे जखमी झाले.

ठळक मुद्देकळवण : पायी जाणाऱ्या यात्रेकरुंना खासगी वाहनाने दिली जोरदार धडक

कळवण : अनेक किमी अंतर पायी वाटचाल करत मजल दरमजल करून चैत्रोत्सव निमित्ताने आई भगवतीच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या तिघा देवीभक्तावर कळवणजवळ कोल्हापूर फाटा येथे सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास काळाने झडप घातल्याने एक देवीभक्त जागीच ठार झाला तर दोन नाशिक येथे औषधोपचार दरम्यान मृत्युमुखी पडल्याने या अपघातात ३ ठार तर दोघे जखमी झाले.देवीभक्त नांदुरीकडे पायी जात असताना कळवणकडून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाºया खासगी प्रवासी वाहतूक गाडीने (एम एच १९ सी एफ ०७५१) कोल्हापूर फाटा येथे पादचारी देवीभक्ताना मागून धडक दिली, त्यात गुंजाळनगर येथील शुभम बापू देवरे हे जागीच ठार झाले, तर त्यांचे चार सहकारी देवीभक्त जखमी झाले. जखमीना कळवण उपजिल्हा रु ग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक येथे जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर दुपारी औषधोपचार सुरु असताना त्यापैकी दोघांचा मृत्यु झाला. या प्रकरणी कळवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमवारी (दि १५) पहाटे ४ वाजेच्या सुमारास देवळा तालुक्यातील खालप येथील देवीभक्त कळवण शहरापासून चार किमी अंतरावर कोल्हापूर फाटा परिसरातुन सप्तश्रुंगी गडाकडे पायी पदयात्रेने चालले होते त्यावेळी कळवणकडून नाशिककडे भरधाव वेगाने खाजगी प्रवासी वाहतूक करणार्या एम एच १९ सी एफ ०७५१ या ट्रक्स क्रु झर गाडीने पाठीमागून रस्त्यावरील पादचारी देवीभक्ताना उडवल्याने त्यात शुभम बापू देवरे (१७) गुंजाळनगर (देवळा) हा झालेल्या अपघातात जागीच ठार झाला तर त्याच्या सोबत असलेले कल्पेश रविंद्र सूर्यवंशी (२५), भाऊसाहेब पुंडलिक पवार (१५) यांच्यासह ३० ते ३५ वयोगटातील दोन भावीक जखमी झाले असून त्यांची ओळख पटलेली नसल्याने त्यांची नावे समजू शकली नाही.दरम्यान घटनास्थळी कळवणचे पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी भेट देऊन पहाणी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ठुमसे तपास करीत आहेत.- सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी चालत जाणार्या भाविकांनी रस्त्याच्या कडेने डाव्या बाजूने सावध रीतीने चालावे तसेच रणरणते उन्हाने रस्ते तापलेले आहेत. चालताना भाविकांना त्रास होतो. म्हणून वाहन धारकांनी नेहमीच्या वेगापेक्षा हळू वेगाने वाहने हळू चालवावी. प्रशासनाला सहकार्य करावे.प्रमोद वाघ -पोलीस निरीक्षक कळवण.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात