कांद्याला प्रतिकिलो २० रुपये दर द्या कृषीमंत्र्यांना साकडे : शेतकरी संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 17:47 IST2020-07-15T17:46:55+5:302020-07-15T17:47:11+5:30
कळवण : कांद्याला प्रति किलो २० रु पये दर देण्यात यावा आणि त्यामधील दुरावा शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करावा, अशा आशयाचे निवेदन देऊन कळवण तालुक्यातील शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे,कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना कळवण दौºयात साकडे घातले.

कांद्याला प्रतिकिलो २० रुपये दर द्या कृषीमंत्र्यांना साकडे : शेतकरी संघटनेची मागणी
कळवण : कांद्याला प्रति किलो २० रु पये दर देण्यात यावा आणि त्यामधील दुरावा शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करावा, अशा आशयाचे निवेदन देऊन कळवण तालुक्यातील शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे,कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना कळवण दौºयात साकडे घातले.
कांदा उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने तो कवडीमोल दराने विकला जात आहे. शासनाने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी शेतकरी नेते देविदास पवार यांनी केली. शेतकºयांचा कांदा उत्पादन खर्च ११ ते १२ रु पये येत असून कांदा आज ५ ते ६ रु पये दराने विकला जात आहे. यामुळे शेतकºयांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. दर वाढल्यानंतर सरकार विदेशातून कांदा आयात करत दर पाडण्याचे काम करते. कांदा उत्पादकांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने २० रु पये दराप्रमाणे कांदा खरेदी करून शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.