शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

पालखेड आवर्तनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:12 IST

तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना पालखेड डावा कालव्याला पाणी सुटणाºया दाव्या-प्रतिदाव्यामुळे सर्वसामान्य शेतकरी संभ्रमात पडले असून, पाणी सुटणार की नाही याबाबत अद्याप साशंकता व्यक्त केली जात आहे.

येवला : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना पालखेड डावा कालव्याला पाणी सुटणाºया दाव्या-प्रतिदाव्यामुळे सर्वसामान्य शेतकरी संभ्रमात पडले असून, पाणी सुटणार की नाही याबाबत अद्याप साशंकता व्यक्त केली जात आहे.  उत्तर पूर्व भागात तर पिके करपून गेली; मात्र पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन मिळणार या भरवशावर लाल कांदा, जनावरांसाठी चारा पिके उभी केली. तालुक्यात विविध पक्ष आणि शेतकरी संघटनांनी पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन मिळण्यासाठी आंदोलने केली. पालखेडचे आवर्तन १५ नोव्हेंबरपर्यंत द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेने प्रशासनाकडे करूनही येवला तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. १५ नोव्हेंबरनंतर पाणी आल्यावर उभी पिके करपून जातील, अशी भीती शेतकºयांच्या मनात आहे. जलसंपदामंत्री आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत ओरड करूनसुद्धा येवलेकरांच्या पदरी काही पडले नाही. जेवढे दिवस पाणी उशिरा येईल तेवढे शेतकºयांचे नुकसान होऊन दुष्काळात हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो का? अशी चिंता शेतकरी वर्गाला सतावत आहे. पालखेड डावा कालवा प्रशासनाने तातडीने आवर्तन चालू करून शेतकºयांची उभी पिके वाचवावी व नंतर कागदी सोपस्कार पार पाडावे, कारण १५ आॅक्टोबरचा पाणीसाठा गृहीत धरून कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाण्याचे सिंचन, बिगर सिंचन आरक्षणाचे नियोजन केले जाते; मात्र यावर्षी अद्यापही काहीही नियोजन झालेले नाही. याचा फटका शेतकºयांना बसत असून, हेच का शेतकºयांना अच्छे दिन! असा टोला शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, सुभाष सोनवणे, अरुण जाधव, मल्हारी दराडे, शिवाजी वाघ यांनी लगावला आहे.दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील संदेशावरून पाच दिवसांत आवर्तन मिळणार असल्याचे संदेश फिरत होते; मात्र जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे शेतकरी संघटनेने संपर्ककेला असता ठोस उत्तर मिळाले नाही. अद्याप पाणी नियोजन आराखडा तयार करण्याचे काम चालू असल्याचे समजले. तालुक्यात सध्या पालखेडचे पाणी आवर्तन मिळणार असल्याची चर्चा आहे; मात्र पाणी कोटा किती मिळेल? आवर्तन किती दिवस चालणार? याबाबत ठोस माहिती दिली नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीWaterपाणी