शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

पालखेड आवर्तनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:12 IST

तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना पालखेड डावा कालव्याला पाणी सुटणाºया दाव्या-प्रतिदाव्यामुळे सर्वसामान्य शेतकरी संभ्रमात पडले असून, पाणी सुटणार की नाही याबाबत अद्याप साशंकता व्यक्त केली जात आहे.

येवला : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना पालखेड डावा कालव्याला पाणी सुटणाºया दाव्या-प्रतिदाव्यामुळे सर्वसामान्य शेतकरी संभ्रमात पडले असून, पाणी सुटणार की नाही याबाबत अद्याप साशंकता व्यक्त केली जात आहे.  उत्तर पूर्व भागात तर पिके करपून गेली; मात्र पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन मिळणार या भरवशावर लाल कांदा, जनावरांसाठी चारा पिके उभी केली. तालुक्यात विविध पक्ष आणि शेतकरी संघटनांनी पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन मिळण्यासाठी आंदोलने केली. पालखेडचे आवर्तन १५ नोव्हेंबरपर्यंत द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेने प्रशासनाकडे करूनही येवला तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. १५ नोव्हेंबरनंतर पाणी आल्यावर उभी पिके करपून जातील, अशी भीती शेतकºयांच्या मनात आहे. जलसंपदामंत्री आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत ओरड करूनसुद्धा येवलेकरांच्या पदरी काही पडले नाही. जेवढे दिवस पाणी उशिरा येईल तेवढे शेतकºयांचे नुकसान होऊन दुष्काळात हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो का? अशी चिंता शेतकरी वर्गाला सतावत आहे. पालखेड डावा कालवा प्रशासनाने तातडीने आवर्तन चालू करून शेतकºयांची उभी पिके वाचवावी व नंतर कागदी सोपस्कार पार पाडावे, कारण १५ आॅक्टोबरचा पाणीसाठा गृहीत धरून कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाण्याचे सिंचन, बिगर सिंचन आरक्षणाचे नियोजन केले जाते; मात्र यावर्षी अद्यापही काहीही नियोजन झालेले नाही. याचा फटका शेतकºयांना बसत असून, हेच का शेतकºयांना अच्छे दिन! असा टोला शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, सुभाष सोनवणे, अरुण जाधव, मल्हारी दराडे, शिवाजी वाघ यांनी लगावला आहे.दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील संदेशावरून पाच दिवसांत आवर्तन मिळणार असल्याचे संदेश फिरत होते; मात्र जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे शेतकरी संघटनेने संपर्ककेला असता ठोस उत्तर मिळाले नाही. अद्याप पाणी नियोजन आराखडा तयार करण्याचे काम चालू असल्याचे समजले. तालुक्यात सध्या पालखेडचे पाणी आवर्तन मिळणार असल्याची चर्चा आहे; मात्र पाणी कोटा किती मिळेल? आवर्तन किती दिवस चालणार? याबाबत ठोस माहिती दिली नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीWaterपाणी