शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

पाकिस्तानी विनाशबुद्धी भारतासह जगासाठी घातक : शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 1:00 AM

पाकिस्तानची निर्मितीच विनाश बुद्धीतून झाली आहे. भारताच्या फाळणीपासूनच पाकिस्तानने विकासात्मक प्रगतीच्या दिशेने वाटचाल न करता विनाशकारी मानसिकतेतून सातत्याने भारतविरोधी कारवायांना प्राधान्य दिले.

नाशिक : पाकिस्तानची निर्मितीच विनाश बुद्धीतून झाली आहे. भारताच्या फाळणीपासूनच पाकिस्तानने विकासात्मक प्रगतीच्या दिशेने वाटचाल न करता विनाशकारी मानसिकतेतून सातत्याने भारतविरोधी कारवायांना प्राधान्य दिले. त्यामुळे पाकिस्तान स्वत:च प्रगतीपासून दूर राहिला असून, भारताच्याही प्रगतीच्या मार्गावर वारंवार अडचण निर्माण करण्याचा प्रयन्न त्याच्याकडून सुरू आहे. याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम संपूर्ण जगावर होत असून, पाकिस्तानची विनाश बुद्धी ही भारतासह संपूर्ण जगासाठी घातक असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.सार्वजनिक वाचनालय नाशिक व लेट्स टॉक यांच्यातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शनिवारी (दि.११) डॉ. सच्चिदानंद शेवडे व डॉ. परीक्षित शेवडे लिखित ‘पाकिस्तान विनाशाकडून विनाशाकडे’ पुस्तकाचे प्रकाशन निवृत्त ब्रिगेडियर जगदीशचंद्र बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्याख्यानात त्यांनी, भारत पाकिस्तानच्या फाळणीची पार्श्वभूमी आणि तत्कालीन सरकारच्या भूमिके वर प्रकाशझोत टाकताना तत्कालीन भारतीय नेत्यांनी कच खाल्ल्यामुळेच पाकिस्तानची फाळणी झाल्याचा आरोप यावेळी केला. तर डॉ. परीक्षित शेवडे यांनीही, पाकिस्तानात शाळेतूनच विनाशकारी शिक्षण दिले जात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, फाळणीनंतर पाकिस्तानने वारंवार भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश मिळाले नाही. यश मिळत नसल्याने आता त्यांनी भारताच्या विरोधात प्रॉक्सीवार सुरू केले असून, त्यातूनच भारतात दहशतवादी हल्ले होत आहेत. शालेय शिक्षणातूनच विनाशकारी शिकविण दिली जात असल्याने पाकिस्तानच्या पुढील पिढ्याही विनाशकारी विचार करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी मोरया प्रकाशनचे दिलीप महाजन, सावानाचे कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख सचिव धर्माजी बोडके, सहायक सचिव अ‍ॅड. अभिजित बगदे, वस्तुसंग्रहालयाचे उदयकुमार मुंगी उपस्थित होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNashikनाशिक