शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

Padma Award : अदनान सामींचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान, नवाब मलिकांचं खोचक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 17:27 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते आज राजधानी दिल्ली येथे पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. राजभवनात शानदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल मानकरी महोदयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

ठळक मुद्दे सामी यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतरही मलिक यांनी सामी आणि केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे

नवी दिल्ली - गायक अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी, मनसेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यास विरोध केला. पाकिस्तानमधून कोण इथं येऊन जय मोदी हा नारा देत असेल तर त्याला देशाचं नागरिकत्व दिलं जातं अन् पद्मश्री पुरस्कार मिळतो हे स्पष्ट उदाहरण आहे, असे राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. आता, पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी अदनान सामी आणि केंद्र सरकारवर टीका केलीय.  

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते आज राजधानी दिल्ली येथे पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. राजभवनात शानदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल मानकरी महोदयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामध्ये, बॉलिवूड, कला, क्रीडा, साहित्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. गायक अदनाना सामी यांनीही राष्ट्रपतींच्याहस्ते हा पुरस्कार स्विकारला. मात्र, अदनाना सामी यांनी पुरस्कार स्विकारताच मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे.  अदनान सामीला पुरस्कार देणं हा देशातील जनतेचा अपमान आहे, अशी टीका नवाब मलिकांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर केली होती. आता, सामी यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतरही मलिक यांनी सामी आणि केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे. जे आमच्यासोबत आहेत, त्यांना आम्ही नागरिकताही देऊ आणि पद्मश्रीही. मग, ते पाकिस्तानचे का असेनात. अदनाना सामी यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन... असे खोचक ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे.   दरम्यान, कला क्षेत्रातून ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्यासह गायक अदनान सामीलादेखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

मनसेनंही व्यक्त केली होती नाराजी

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं ते अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे असं अमेय खोपकर यांनी म्हटलं होतं. याशिवाय, 2015 मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसpadma shri awardsपद्मश्री पुरस्कारAdnan samiअदनान सामी