शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

ओझरखेड कालव्याला सोडले रबीचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 6:19 PM

शिरवाडे वणी : ओझरखेड कालव्याला रबी हंगामातील पिके घेण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा आरक्षित साठा असल्यामुळे गावतळे भरण्यासाठी सोडण्यात आले असून पाण्याचा लाभ घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये, तसेच पाण्याचा दुरुपयोगसुद्धा करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने तसेच पाणी वापर संस्थेच्या वतीने केले आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे विभाग : दुरुपयोग न करण्याचे आवाहन

शिरवाडे वणी : ओझरखेड कालव्याला रबी हंगामातील पिके घेण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा आरक्षित साठा असल्यामुळे गावतळे भरण्यासाठी सोडण्यात आले असून पाण्याचा लाभ घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये, तसेच पाण्याचा दुरुपयोगसुद्धा करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने तसेच पाणी वापर संस्थेच्या वतीने केले आहे.          येथील परिसराला लागून असलेल्या रबी हंगामातील पिके घेण्यासाठी या वर्षातील नुकतेच पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. मागील महिन्यात बहुतांशी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली; परंतु त्याचा दुरुपयोग झाला असून रबी हंगामातील गहू, हरभरा, मका, उन्हाळी कांदे, जनावरांसाठी चारा व इतर भाजीपाला वर्गीय पिके घेण्यासाठी पाणी देणे गरजेचे असते.              ओझरखेड कालव्याच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या जमिनीपैकी बहुतांशी जमीन डोंगर भागातील ओबड-धोबड व वरकस स्वरूपाचे आहे. त्यामुळे या भागात पडणारा पाऊस भौगोलिक रचनेमुळे लगेच वाहून जातो. तसेच अनियमित पाऊस झाला तर दुबार, तिबार पेरणीच्या संकटांना सामोरे जावे लागते. तेथील जमीन बहुतांशी भागात मुरमाड व हलक्‍या-मध्यम स्वरूपाची असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होण्यास वेळ लागत नाही.              काही ठराविक भागात पाणीटंचाईसुद्धा तितकीच भासली होती व उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे उन्हाच्या तीव्र माऱ्यामुळे पिकांना पाण्याची गरज मोठ्या प्रमाणावर भासत असते. परिसरातील रानवड, सावरगाव, नांदू शिरवाडे, मुखेड, वावी, नांदूर, गोरठाण गावातील परिसर व परिसरातील पाणीपुरवठा योजना या ओझरखेड कालव्याला येणाऱ्या पाण्यावरच अवलंबून असतात या गावातील पाणी वापर संस्थांचा व मागणीनुसार विभागाने बैठकीअंतर्गत पाण्याचे नियोजन केले जाते त्यामुळे या वर्षाच्या मागणीनुसार पाटबंधारे विभागामार्फत पाणी सोडण्यात आले आहे.वर्षातील पहिले आवर्तनया वर्षातील पहिले आवर्तन सोडण्यात आले असून पाण्याचा योग्य वापर शेतकरीवर्गाने करावा. पाणी घेण्यासाठी कोणीही शेतकरीवर्गाने वंचित राहू नये. तसेच गाव तळे नदीवरील बंधारे भरून घेण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्यात यावे. सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे या गावांतील परिसराला पाणीटंचाई तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकagricultureशेती