शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आठ कारखान्यांच्या मालकांना फिरावे लागतेय दारोदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST

सहा सहकारी आणि दोन खासगी, असे आठ साखर कारखाने असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज दुसऱ्यांच्या दारात जाऊन आमचा ...

सहा सहकारी आणि दोन खासगी, असे आठ साखर कारखाने असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज दुसऱ्यांच्या दारात जाऊन आमचा ऊस घ्या म्हणून विनवणी करावी लागत आहे, ही जिल्ह्यातील सहकार धुरिणांची शोकांतिका आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अपवाद फक्त कदवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांचा. निसाका, रासाका, वसाका, नासाका, कादवा, गिरणा या सहा सहकारी कारखान्यांबरोबरच द्वारकाधीश आणि रावळगाव हे दोन खासगी साखर कारखाने यामुळे एकेकाळी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊर अभिमानाने भरून यायचा; पण आजची स्थिती त्या उलट झाली आहे. एकटा कादवा सोडला, तर एकही सहकारी साखर कारखाना सुरळीत सुरू नाही. रावळगाव कारखान्याकडेही शेतकऱ्यांचे पैसे थकल्यामुळे तो बंद आहे. आपले हक्काचे कारखाने बंद झाले असल्याने आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. कारखाने बंद व्हायला जबाबदार कोण किंवा ते कशामुळे बंद झाले, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे; पण त्यामुळे आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेली स्थिती भयंकर आहे. वावरात उभा असलेला ऊस हंगामात आडवा होईल की नाही, या चिंतेने आजच अनेकांना झोप येत नाही. जे ऊस लागवडीकडून भाजीपाल्याकडे वळाले त्यांनाही कोरोनामुळे दराचा फटका बसला आहे. परजिल्ह्यातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस नव्हता तोपर्यंत त्यांनी आपल्या जिल्ह्यातील ऊस घेतला; पण आता तेही नकार देऊ लागले असल्याने जिल्ह्यातील कारखाने सुरू होणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित होते. धाराशीवमुळे वसाकाचा प्रश्न काही अंशी तरी मार्गी लागला आहे. आमदार दिलीप बनकर यांच्या पतसंस्थेच्या पाठबळाणे लवकरच रासाकाची चाके फिरण्याची आशा निर्माण झाली आहे, तर नासाकासाठीही ई-निविदा निघणार असल्याने सभासदांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निसाकाचा प्रश्न कायम आहे, तर गिसाकाचे प्रकरण वेगळे आहे. कारखाना कोण चालावयास घेतो याला सभासदांच्या लेखी महत्त्व नाही, तर कारखान्याची चाके फिरणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. बाहेरच्या लोकांनी येऊन आपला कारखाना चालविण्यापेक्षा आपणच थोडी हिंमत दाखविली, तर ते सहज शक्य आहे, हे कादवाच्या रूपाने श्रीराम शेटे यांनी दाखवून दिले आहे. इतरांप्रमाणेच कादवाही आर्थिक अडचणीत होता; पण काटकसरीचे धोरण राबवून त्यांनी बाराशे मेट्रिक टन क्षमतेचा कारखाना आज अडीच हजार मेट्रिक टनांपर्यंत नेला आणि शेतकऱ्यांना भाव देत नवा आदर्श घालून दिला आहे. आता नासाकासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत, ते फळाला यावेत, हीच सभासदांची भावना आहे.

-संजय दुनबळे