शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

आठ कारखान्यांच्या मालकांना फिरावे लागतेय दारोदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST

सहा सहकारी आणि दोन खासगी, असे आठ साखर कारखाने असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज दुसऱ्यांच्या दारात जाऊन आमचा ...

सहा सहकारी आणि दोन खासगी, असे आठ साखर कारखाने असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज दुसऱ्यांच्या दारात जाऊन आमचा ऊस घ्या म्हणून विनवणी करावी लागत आहे, ही जिल्ह्यातील सहकार धुरिणांची शोकांतिका आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अपवाद फक्त कदवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांचा. निसाका, रासाका, वसाका, नासाका, कादवा, गिरणा या सहा सहकारी कारखान्यांबरोबरच द्वारकाधीश आणि रावळगाव हे दोन खासगी साखर कारखाने यामुळे एकेकाळी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊर अभिमानाने भरून यायचा; पण आजची स्थिती त्या उलट झाली आहे. एकटा कादवा सोडला, तर एकही सहकारी साखर कारखाना सुरळीत सुरू नाही. रावळगाव कारखान्याकडेही शेतकऱ्यांचे पैसे थकल्यामुळे तो बंद आहे. आपले हक्काचे कारखाने बंद झाले असल्याने आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. कारखाने बंद व्हायला जबाबदार कोण किंवा ते कशामुळे बंद झाले, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे; पण त्यामुळे आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेली स्थिती भयंकर आहे. वावरात उभा असलेला ऊस हंगामात आडवा होईल की नाही, या चिंतेने आजच अनेकांना झोप येत नाही. जे ऊस लागवडीकडून भाजीपाल्याकडे वळाले त्यांनाही कोरोनामुळे दराचा फटका बसला आहे. परजिल्ह्यातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस नव्हता तोपर्यंत त्यांनी आपल्या जिल्ह्यातील ऊस घेतला; पण आता तेही नकार देऊ लागले असल्याने जिल्ह्यातील कारखाने सुरू होणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित होते. धाराशीवमुळे वसाकाचा प्रश्न काही अंशी तरी मार्गी लागला आहे. आमदार दिलीप बनकर यांच्या पतसंस्थेच्या पाठबळाणे लवकरच रासाकाची चाके फिरण्याची आशा निर्माण झाली आहे, तर नासाकासाठीही ई-निविदा निघणार असल्याने सभासदांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निसाकाचा प्रश्न कायम आहे, तर गिसाकाचे प्रकरण वेगळे आहे. कारखाना कोण चालावयास घेतो याला सभासदांच्या लेखी महत्त्व नाही, तर कारखान्याची चाके फिरणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. बाहेरच्या लोकांनी येऊन आपला कारखाना चालविण्यापेक्षा आपणच थोडी हिंमत दाखविली, तर ते सहज शक्य आहे, हे कादवाच्या रूपाने श्रीराम शेटे यांनी दाखवून दिले आहे. इतरांप्रमाणेच कादवाही आर्थिक अडचणीत होता; पण काटकसरीचे धोरण राबवून त्यांनी बाराशे मेट्रिक टन क्षमतेचा कारखाना आज अडीच हजार मेट्रिक टनांपर्यंत नेला आणि शेतकऱ्यांना भाव देत नवा आदर्श घालून दिला आहे. आता नासाकासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत, ते फळाला यावेत, हीच सभासदांची भावना आहे.

-संजय दुनबळे