शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

४६ घरांमध्ये ‘एडीस’ डासांची उत्पत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:42 AM

वडाळागाव परिसरात चिकुनगुनियासदृश आजारासह विषमज्वर, विषाणूजन्य तापाची साथ पसरल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. येथील घरांची तपासणी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ४६ घरांमध्ये ‘एडीस’ डासाच्या उत्पत्तीला पूरक असे पाण्याचे साठे आढळून आले आहेत.

नाशिक : वडाळागाव परिसरात चिकुनगुनियासदृश आजारासह विषमज्वर, विषाणूजन्य तापाची साथ पसरल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. येथील घरांची तपासणी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ४६ घरांमध्ये ‘एडीस’ डासाच्या उत्पत्तीला पूरक असे पाण्याचे साठे आढळून आले आहेत. वडाळागाव परिसरात मिश्र आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये ६५ रुग्णांना सांधेदुखीचा त्रास जाणवत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. रुग्णांमध्ये हिवतापाची लक्षणे दिसत नसली तरी चिकुनगुनिया संशयित रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. या भागात महापालिकेच्या आरोग्य व राज्य शासनाच्या शहर आरोग्य विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने घरांना भेटी देत पाण्याचे साठे तपासले जात आहे. तसेच डासप्रतिबंधात्मक औषध-धूर फवारणीलाही प्रारंभ करण्यात आला आहे. दोन दिवसात ४६ नागरिकांच्या घरांमधील पाणीसाठ्यात एडीस डासाच्या अळ्या, कोष आढळून आल्याच्या नोंदी आरोग्य विभागाने घेतल्या आहेत. स्वच्छ पाणीसाठ्यामध्ये या डासाची उत्पत्ती होत असल्यामुळे पाण्याचे साठे उघडे न ठेवता ते दिवसाआड स्वच्छ करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.  आरोग्य विभाग जरी जागा झाला असला तरी या विभागाला महापालिकेच्या अन्य विभागांची साथ मिळणे आवश्यक आहे. त्याशिवाय साथीच्या आजारावर मात करणे शक्य होणार नाही. येथील मनपा शाळेच्या परिसरातील कोळीवाडा, माळी गल्ली, संजरी मार्ग, गोपालवाडी, गरीब नवाज कॉलनी, राजवाडा, रजा चौक, केबीएच विद्यालयाचा परिसर, जय मल्हार कॉलनी या भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. माळी गल्ली, बारा खोली, गरीब नवाज कॉलनी आदी परिसरातील पाण्याचे नमुने संकलित करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.  जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गुरुवार (दि. २१) दुपारपर्यंत नमुन्यांचा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. दूषित पाण्यावाटे पसरणारे आजारांचे निदान अहवालातून स्पष्ट होईल.दूषित पाण्यावाटे आजारांचा फैलाववडाळागावातील प्रभावित भागात काही ठिकाणी पाण्याला पिवळसर रंग दिसत आहे. पिण्याचे पाणी गढूळ मातीमिश्रित असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच काही परिसरांमध्ये पाण्याला दुर्गंधीही जाणवत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. यामुळेदेखील पाण्यावाटे पसरणाºया आजाराचा फैलाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येथील परिसरात जुनाट जलवाहिन्या असून, जलवाहिन्या या भूमिगत गटारींच्या शेजारून टाकण्यात आलेल्या आहेत. गटारींमधील सांडपाणी जलवाहिन्यांची अंतर्गत गळतीमधून मिसळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Healthआरोग्य