शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पालखेडमधून पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:13 IST

पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरिका नंबर ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारातील प्रासंगिक कोठ्यातील पाण्याने भरून देण्याचे आदेश पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले आहेत.

येवला : तालुक्यातील पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरिका नंबर ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारातील प्रासंगिक कोठ्यातील पाण्याने भरून देण्याचे आदेश पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले आहेत.  वितरिका ४६ ते ५२ ला फक्त पावसाळ्यात ओव्हरफ्लोचे पाणी दिले जाते. त्यासाठीही शेतकºयांना सततचा संघर्ष करावा लागतो. यावर्षी बाबा डमाळे यांनी नागपूर, जामनेर, जळगाव, नाशिक व मुंबई अशा फेºया मारत शेतकºयांना बरोबर घेत पालकमंत्र्यांकडे मागणी केली होती.  रब्बी हंगामातील प्रासंगिक पाणी हे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारात असल्यामुळे या हंगामात पिण्याचे पाणी मागण्याकरिता शेतकरी गेले तर जिल्हाधिकारी कार्यालयातून शेतकºयांना नेहमीच अपमानित केले जाते. मात्र, जिल्हाधिकाºयांच्या समोरच पालकमंत्र्यांकडे भाजपाचे नेते बाबासाहेब डमाळे यांनी अशी तक्र ार करत मागील दोन वर्षे २०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असतानादेखील पिण्याचे पाणी दिलेले आहे. यावर्षी ३५० दशलक्ष घनफूट प्रासंगिक कोठ्यातील पाणी शिल्लक असताना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व अप्पर जिल्हाधिकारी रामदास खेडकर पाणी देण्यास नकार देतात.  या पाटपाण्यासंदर्भात बाबा डमाळे यांच्या नेतृत्वाखाली रामूदादा भागवत, बाळासाहेब काळे, नानासाहेब भागवत, आप्पासाहेब भागवत, अरुण देवरे, अमोल सोनवणे, संतोष केंद्रे, नाना शेळके, रावसाहेब मगर, ठकचंद वरे, बाबा शंकर सोनवणे, अण्णासाहेब ढोले, जगदीश गायकवाड, किरण सोनवणे, भास्करराव भागवत, ज्ञानेश्वर वडाळकर, शिवाजी भागवत, रामनाथ पवार, नामदेव भागवत, भरत बोंबले, गणपत भागवत, सीताराम सोनवणे, रमेश सोनवणे, शिवनाथ सोनवणे, रघुनाथ एंडाईत यांच्यासह  शेकडो शेतकरी नाशिक येथे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीस उपस्थित होते.अभिनंदनाचे फलकही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली असता पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना बजावले की, आपणास पाणी सोडता येत नसेल तर मी माझे अधिकारातील पाणी सोडण्याचे आदेश देत आहे, असे स्पष्ट करून महाजन म्हणाले की, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक राजेश मोरे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, कार्यकारी अभियंता राघवेंद्र भाट, पालकमंत्र्यांचे शासकीय सचिव संदीप जाधव, वैभव भागवत तुम्ही एकत्रित बसून नियोजन करा व दोन दिवसात याबाबतचे आदेश करा, असा आदेश दिल्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी वितरिकावरील सर्व बंधारे पाण्याने भरून देण्याचे पाटबंधारे अधिकाºयांना निर्देश दिले. याबद्दल अंदरसूलपासून पूर्व भागातील शेतकºयांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे अभिनंदनाचे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.

टॅग्स :DamधरणWaterपाणी