शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पालखेडमधून पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:13 IST

पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरिका नंबर ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारातील प्रासंगिक कोठ्यातील पाण्याने भरून देण्याचे आदेश पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले आहेत.

येवला : तालुक्यातील पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरिका नंबर ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारातील प्रासंगिक कोठ्यातील पाण्याने भरून देण्याचे आदेश पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले आहेत.  वितरिका ४६ ते ५२ ला फक्त पावसाळ्यात ओव्हरफ्लोचे पाणी दिले जाते. त्यासाठीही शेतकºयांना सततचा संघर्ष करावा लागतो. यावर्षी बाबा डमाळे यांनी नागपूर, जामनेर, जळगाव, नाशिक व मुंबई अशा फेºया मारत शेतकºयांना बरोबर घेत पालकमंत्र्यांकडे मागणी केली होती.  रब्बी हंगामातील प्रासंगिक पाणी हे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारात असल्यामुळे या हंगामात पिण्याचे पाणी मागण्याकरिता शेतकरी गेले तर जिल्हाधिकारी कार्यालयातून शेतकºयांना नेहमीच अपमानित केले जाते. मात्र, जिल्हाधिकाºयांच्या समोरच पालकमंत्र्यांकडे भाजपाचे नेते बाबासाहेब डमाळे यांनी अशी तक्र ार करत मागील दोन वर्षे २०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असतानादेखील पिण्याचे पाणी दिलेले आहे. यावर्षी ३५० दशलक्ष घनफूट प्रासंगिक कोठ्यातील पाणी शिल्लक असताना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व अप्पर जिल्हाधिकारी रामदास खेडकर पाणी देण्यास नकार देतात.  या पाटपाण्यासंदर्भात बाबा डमाळे यांच्या नेतृत्वाखाली रामूदादा भागवत, बाळासाहेब काळे, नानासाहेब भागवत, आप्पासाहेब भागवत, अरुण देवरे, अमोल सोनवणे, संतोष केंद्रे, नाना शेळके, रावसाहेब मगर, ठकचंद वरे, बाबा शंकर सोनवणे, अण्णासाहेब ढोले, जगदीश गायकवाड, किरण सोनवणे, भास्करराव भागवत, ज्ञानेश्वर वडाळकर, शिवाजी भागवत, रामनाथ पवार, नामदेव भागवत, भरत बोंबले, गणपत भागवत, सीताराम सोनवणे, रमेश सोनवणे, शिवनाथ सोनवणे, रघुनाथ एंडाईत यांच्यासह  शेकडो शेतकरी नाशिक येथे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीस उपस्थित होते.अभिनंदनाचे फलकही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली असता पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना बजावले की, आपणास पाणी सोडता येत नसेल तर मी माझे अधिकारातील पाणी सोडण्याचे आदेश देत आहे, असे स्पष्ट करून महाजन म्हणाले की, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक राजेश मोरे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, कार्यकारी अभियंता राघवेंद्र भाट, पालकमंत्र्यांचे शासकीय सचिव संदीप जाधव, वैभव भागवत तुम्ही एकत्रित बसून नियोजन करा व दोन दिवसात याबाबतचे आदेश करा, असा आदेश दिल्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी वितरिकावरील सर्व बंधारे पाण्याने भरून देण्याचे पाटबंधारे अधिकाºयांना निर्देश दिले. याबद्दल अंदरसूलपासून पूर्व भागातील शेतकºयांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे अभिनंदनाचे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.

टॅग्स :DamधरणWaterपाणी