शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पालखेडमधून पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:13 IST

पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरिका नंबर ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारातील प्रासंगिक कोठ्यातील पाण्याने भरून देण्याचे आदेश पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले आहेत.

येवला : तालुक्यातील पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरिका नंबर ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारातील प्रासंगिक कोठ्यातील पाण्याने भरून देण्याचे आदेश पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले आहेत.  वितरिका ४६ ते ५२ ला फक्त पावसाळ्यात ओव्हरफ्लोचे पाणी दिले जाते. त्यासाठीही शेतकºयांना सततचा संघर्ष करावा लागतो. यावर्षी बाबा डमाळे यांनी नागपूर, जामनेर, जळगाव, नाशिक व मुंबई अशा फेºया मारत शेतकºयांना बरोबर घेत पालकमंत्र्यांकडे मागणी केली होती.  रब्बी हंगामातील प्रासंगिक पाणी हे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारात असल्यामुळे या हंगामात पिण्याचे पाणी मागण्याकरिता शेतकरी गेले तर जिल्हाधिकारी कार्यालयातून शेतकºयांना नेहमीच अपमानित केले जाते. मात्र, जिल्हाधिकाºयांच्या समोरच पालकमंत्र्यांकडे भाजपाचे नेते बाबासाहेब डमाळे यांनी अशी तक्र ार करत मागील दोन वर्षे २०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असतानादेखील पिण्याचे पाणी दिलेले आहे. यावर्षी ३५० दशलक्ष घनफूट प्रासंगिक कोठ्यातील पाणी शिल्लक असताना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व अप्पर जिल्हाधिकारी रामदास खेडकर पाणी देण्यास नकार देतात.  या पाटपाण्यासंदर्भात बाबा डमाळे यांच्या नेतृत्वाखाली रामूदादा भागवत, बाळासाहेब काळे, नानासाहेब भागवत, आप्पासाहेब भागवत, अरुण देवरे, अमोल सोनवणे, संतोष केंद्रे, नाना शेळके, रावसाहेब मगर, ठकचंद वरे, बाबा शंकर सोनवणे, अण्णासाहेब ढोले, जगदीश गायकवाड, किरण सोनवणे, भास्करराव भागवत, ज्ञानेश्वर वडाळकर, शिवाजी भागवत, रामनाथ पवार, नामदेव भागवत, भरत बोंबले, गणपत भागवत, सीताराम सोनवणे, रमेश सोनवणे, शिवनाथ सोनवणे, रघुनाथ एंडाईत यांच्यासह  शेकडो शेतकरी नाशिक येथे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीस उपस्थित होते.अभिनंदनाचे फलकही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली असता पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना बजावले की, आपणास पाणी सोडता येत नसेल तर मी माझे अधिकारातील पाणी सोडण्याचे आदेश देत आहे, असे स्पष्ट करून महाजन म्हणाले की, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक राजेश मोरे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, कार्यकारी अभियंता राघवेंद्र भाट, पालकमंत्र्यांचे शासकीय सचिव संदीप जाधव, वैभव भागवत तुम्ही एकत्रित बसून नियोजन करा व दोन दिवसात याबाबतचे आदेश करा, असा आदेश दिल्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी वितरिकावरील सर्व बंधारे पाण्याने भरून देण्याचे पाटबंधारे अधिकाºयांना निर्देश दिले. याबद्दल अंदरसूलपासून पूर्व भागातील शेतकºयांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे अभिनंदनाचे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.

टॅग्स :DamधरणWaterपाणी