शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 5:41 PM

वणी : दिंडोरी तालुक्यात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे १२७ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

वणी : दिंडोरी तालुक्यात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे १२७ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रामुख्याने सर्वाधिक नुकसान द्राक्ष बागांचे झाले असून खतवड येथील सोमनाथ मुळाणे यांचा सुमारे चार एकर ऊस भुईसपाट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वारे व गारपीट झाल्याने परिसरात द्राक्ष मणांना तडे गेले असून, द्राक्षबागांवर विपरीत परिणाम जाणवू लागले आहेत. बुरशीजन्यरोग व कुज होवू नये यासाठी महागडी औषधे फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त दिसत आहे. पडझड झालेला ऊस संबधित साखर कारखान्याने तात्काळ गाळपासाठी तोड करावी अशी मागणी केली जात आहे. वरखेडा, सोनजांब, आंबे वणी, घोडेवाडी, बोपेगाव, खतवड, आंबे दिंडोरी, शिवनई, जानोरी, वरवंडी आदी गावांचा समावेश आहे. द्राक्ष - ७८ हेक्टर,टोमॅटो २४ हेक्टर, कांदा -९ हेक्टर भाजीपाला ,फुलं आदी पिकांचा समावेश असून, १२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक पाऊस वरखेडा मंडळात झाला.वरखेझ- २२ मि.लि.मीटर , मोहाडी -४ ,दिंडोरी -१ असा एकूण २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे . नुकसानग्रस्त भागाचा प्रांताधिकारी उदय किसवे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, तालुका कृषी अधिकारी अभिजित जमदाडे यांनी पाहणी दौरा करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. 

 

टॅग्स :Farmerशेतकरी