शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

धरणातील बेकायदा उपसा रोखण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:44 IST

टंचाईसदृश परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेल्या पाण्याचा बेकायदा उपसा रोखण्याबरोबरच पाणीपुरवठा योजनांची गळती रोखण्याची व विहिरींच्या लगतच्या ५० मीटर अंतरातील सर्व विहिरींच्या पाणी उपसा बंद करण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

नाशिक : टंचाईसदृश परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेल्या पाण्याचा बेकायदा उपसा रोखण्याबरोबरच पाणीपुरवठा योजनांची गळती रोखण्याची व विहिरींच्या लगतच्या ५० मीटर अंतरातील सर्व विहिरींच्या पाणी उपसा बंद करण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.  आठ तालुक्यांत सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पेरणी केलेली पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी सर्व संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक मंगळवारी घेतली. जिल्ह्यात ९७ टक्के पेरण्या झालेल्या असल्या तरी, सध्या पूर्व भागातील पिकांना पाण्याची गरज आहे. पाऊस न पडल्यास पेरणी वाया जाणार आहे. काही धरणांमध्ये जेमतेम साठा असून, त्यातून पाणीउपसा केला जात असल्याच्या प्रकारावर चर्चा करण्यात आली. धरणातील पाणी पिण्या- साठीच ठेवण्याची पावले उचलावी लागतील ते लक्षात घेता, पाटबंधारे खात्याने पाणी उपसणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.  त्याचबरोबर धरणातून पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी उचलताना होणारी गळती त्या त्या यंत्रणांची रोखावी, असे आदेश देऊन पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी साठवण करणाºया विहिरींच्या ५० मीटर परिघात नवीन विहिरी खोदण्यास अनुमती न देतानाच बोअर घेण्यावर बंदी घालण्याची तसेच जुन्या विहिरी असतील तर त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.  या बैठकीत सरकारने दुष्काळसदृश परिस्थितीच्या बदललेल्या निकषाची माहिती महसूल, कृषी व गट विकास अधिकाºयांना देण्यात आल्या. प्रत्येक महिन्यात पडणारा सरासरी पाऊस, झालेल्या पेरण्या व त्यानंतर पिकाची परिस्थिती अशा तीन टप्प्यांत त्याची पाहणी करण्याचे व उत्पादनावर होणाºया परिणामावरच यापुढे दुष्काळ जाहीर केला जाणार असून, त्यासाठी आॅगस्ट महिन्यात पडणाºया पावसावर सारी भिस्त असणार आहे. अशा परिस्थितीत सर्व विभागांनी अचूक माहिती सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

टॅग्स :DamधरणWaterपाणी