शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

पायी वारीसाठी फूस लावणाऱ्यांकडून वारकऱ्यांच्या जिवाशी खेळ :  संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 17:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने समाजिक सुरक्षेच्या दृष्टीने मनावर दगड ठेवून पायी वारीवर यावर्षीही निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वारकरी सांप्रदायासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधत आहेत; परंतु पायी वारीसाठी फूस लावणारे काही राजकीय पक्ष व संघटना वारकऱ्यांच्या जिवाशी खेळत असून वारीमधून कोरोनाचा प्रसार झाला तर अशा संघटना व राजकीय पक्ष जबाबदारी घेणार का? असा सवाल करीत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी पायी वारीच्या मुद्द्यावर विरोधकांना टोला लगावला आहे.

ठळक मुद्देनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव योग्य संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली भूमिका स्पष्ट

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने समाजिक सुरक्षेच्या दृष्टीने मनावर दगड ठेवून पायी वारीवर यावर्षीही निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वारकरी सांप्रदायासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधत आहेत; परंतु पायी वारीसाठी फूस लावणारे काही राजकीय पक्ष व संघटना वारकऱ्यांच्या जिवाशी खेळत असून वारीमधून कोरोनाचा प्रसार झाला तर अशा संघटना व राजकीय पक्ष जबाबदारी घेणार का? असा सवाल करीत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी पायी वारीच्या मुद्द्यावर विरोधकांना टोला लगावला आहे.नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिका व ग्रामीण भागात चार दिवस दौरा केल्यानंतर संजय राऊत यांनी रविवारी (दि.१३) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नाशिक महापालिका प्रभागरचना महाविकास आघाडीतील मित्रपक्षांतील स्थानिक नेत्यांची एक, दोन दिवसांत चर्चा होईल. त्यानंतर लवकरच निर्णय होण्याचे संकेत दिले. तर राज्यात संपूर्ण पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार असल्याचे सांगतानाच महाविकास आघाडीची स्थापना करतानाच हे ठरले असून आपण त्याचे साक्षीदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केेले. त्याचप्रमाणे २०२४ मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाकितावर भाजपकडे मोदींशिवाय दुसरा चेहराच नसल्याची टीका केली; परंतु राजकारणातील बदल अतिशय वेगाने होतात. त्यामुळे भविष्यातील आडाखे आताच मांडता येणार नाहीत, असेही ते म्हणाले.  सध्याच्या स्थितीत पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपचा नव्हे तर केव‌ळ मोदी, शहा यांचाच पराभव झाल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आतापासून विरोधकांनी मोर्चेबांधणी करून सक्षम चेहरा उभा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तर मराठा समाजाच्या नेत्यांनी दिल्लीत मोर्चा काढणे आवश्यक असून आरक्षणाचा निर्णय संसदेत किंवा पंतप्रधान अथवा राष्ट्रपतींकडेच होऊ शकतो. त्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनीही पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आमदार नरेंद्र दराडे, सुहास कांदे यांच्यासह  वसंत गिते, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, सुनील बागूल आदी उपस्थित होते.  

भुजबळांना शिवसेचा नवा प्रवाह माहीत नाहीनवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव दिले जाणार असून मंत्रिमंडळाने या प्रस्तावास मंजुरी देऊन केंद्राला प्रस्ताव पाठविला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तर छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून २५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटला असून त्यांना शिवसेनेतील नवा प्रवाह माहिती नसल्याची बोचरी टीका करताना त्यांनी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्री