शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नदी-खोऱ्यातील पाणी मराठवाड्यास देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 20:39 IST

वैतरणा- गारगाई-कडवा-गोदावरी तसेच दमणगंगा-एकदरे हे दोन नदीजोड प्रकल्प नाशिक जिल्ह्याचे हक्काचे प्रकल्प आहेत. या दोन प्रकल्पातून बारा टीमसी अधिकचे पाणी उपलब्ध होणार असल्याने सिन्नर तालुक्याचा

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी आक्रमक : जलसंपदामंत्र्यांना साकडे प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ४१ कोटी रुपये शासनाकडून मंजूरही झाले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील वैतरणा, गारगाई, कडवा, दमणगंगा या जिल्ह्यातील नदी, खोऱ्यांचे पाणी मराठवाड्यास नेण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला असून, सदरचे पाणी मराठवाड्यास देण्याऐवजी नदीजोड प्रकल्पाद्वारे वळविल्यास सुमारे बारा टीएमसी अधिकचे पाणी जिल्ह्याला मिळणार आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्याचा पाणीप्रश्न कायमचा संपुष्टात येणार असल्याने हे दोन्ही प्रकल्प वगळण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वैतरणा- गारगाई-कडवा-गोदावरी तसेच दमणगंगा-एकदरे हे दोन नदीजोड प्रकल्प नाशिक जिल्ह्याचे हक्काचे प्रकल्प आहेत. या दोन प्रकल्पातून बारा टीमसी अधिकचे पाणी उपलब्ध होणार असल्याने सिन्नर तालुक्याचा दुष्काळी तालुका हा कलंक कायमचाच पुसला जाणार आहे त्याचबरोबर नाशिक शहरवासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. गेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सरकारने जिल्ह्यातील नदीखोºयांमध्ये जमा होणारे पाणी मराठवाड्यात नेण्याचा निर्णय घेतला. मुळात नाशिक शहरासह सिन्नर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघावा यासाठी खासदार हेमंत गोडसे, जलसिंचन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांची शासनाकडून वैतरणा-गारगाई कडवा तसेच दमणगंगा- एकदरे हे दोन नदीजोड प्रकल्प मंजूर करून घेतले, तसेच नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ४१ कोटी रुपये शासनाकडून मंजूरही झाले आहेत. यापैकी दमणगंगा-एकदरे या प्रकल्पातून नाशिक शहरासाठी पाच टीएमसी पाणी, तर गारगाई-वैतरणा- कडवा-देव या लिंक प्रकल्पातून सिन्नर तालुक्यासाठी सात टीएमसी पाणी अधिकचे उपलब्ध होणार आहे. या सात टीएमसी पाण्यातून सिंचन, औद्योगिक वापराच्या पाण्यासह दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोअरचा पाणीप्रश्न सुटणार आहे. या दोन्हीही प्रकल्पांचे सर्वेक्षणही पूर्ण झाले असून, अशातच मागील सरकारने नदीखोºयात जमा होणारे सर्वच पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हावासीयांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प नदीजोड प्रकल्पातून वगळावेत, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव, राजेंद्र जाधव, रंजन ठाकरे आदींनी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक