शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

नदी-खोऱ्यातील पाणी मराठवाड्यास देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 20:39 IST

वैतरणा- गारगाई-कडवा-गोदावरी तसेच दमणगंगा-एकदरे हे दोन नदीजोड प्रकल्प नाशिक जिल्ह्याचे हक्काचे प्रकल्प आहेत. या दोन प्रकल्पातून बारा टीमसी अधिकचे पाणी उपलब्ध होणार असल्याने सिन्नर तालुक्याचा

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी आक्रमक : जलसंपदामंत्र्यांना साकडे प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ४१ कोटी रुपये शासनाकडून मंजूरही झाले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील वैतरणा, गारगाई, कडवा, दमणगंगा या जिल्ह्यातील नदी, खोऱ्यांचे पाणी मराठवाड्यास नेण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला असून, सदरचे पाणी मराठवाड्यास देण्याऐवजी नदीजोड प्रकल्पाद्वारे वळविल्यास सुमारे बारा टीएमसी अधिकचे पाणी जिल्ह्याला मिळणार आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्याचा पाणीप्रश्न कायमचा संपुष्टात येणार असल्याने हे दोन्ही प्रकल्प वगळण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वैतरणा- गारगाई-कडवा-गोदावरी तसेच दमणगंगा-एकदरे हे दोन नदीजोड प्रकल्प नाशिक जिल्ह्याचे हक्काचे प्रकल्प आहेत. या दोन प्रकल्पातून बारा टीमसी अधिकचे पाणी उपलब्ध होणार असल्याने सिन्नर तालुक्याचा दुष्काळी तालुका हा कलंक कायमचाच पुसला जाणार आहे त्याचबरोबर नाशिक शहरवासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. गेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सरकारने जिल्ह्यातील नदीखोºयांमध्ये जमा होणारे पाणी मराठवाड्यात नेण्याचा निर्णय घेतला. मुळात नाशिक शहरासह सिन्नर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघावा यासाठी खासदार हेमंत गोडसे, जलसिंचन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांची शासनाकडून वैतरणा-गारगाई कडवा तसेच दमणगंगा- एकदरे हे दोन नदीजोड प्रकल्प मंजूर करून घेतले, तसेच नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ४१ कोटी रुपये शासनाकडून मंजूरही झाले आहेत. यापैकी दमणगंगा-एकदरे या प्रकल्पातून नाशिक शहरासाठी पाच टीएमसी पाणी, तर गारगाई-वैतरणा- कडवा-देव या लिंक प्रकल्पातून सिन्नर तालुक्यासाठी सात टीएमसी पाणी अधिकचे उपलब्ध होणार आहे. या सात टीएमसी पाण्यातून सिंचन, औद्योगिक वापराच्या पाण्यासह दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोअरचा पाणीप्रश्न सुटणार आहे. या दोन्हीही प्रकल्पांचे सर्वेक्षणही पूर्ण झाले असून, अशातच मागील सरकारने नदीखोºयात जमा होणारे सर्वच पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हावासीयांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प नदीजोड प्रकल्पातून वगळावेत, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव, राजेंद्र जाधव, रंजन ठाकरे आदींनी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक