शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

उघडे रोहीत्र, लोंबकळणाऱ्या तारा बनताहेत मृत्युचे सापळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 8:02 PM

खेडलेझुंगे : कोळगांव, रु ई, खेडलेझुंगे, धारणगांववीर व खडक, सारोळेथडी परिसरात विज वितरण कंपनीच्या लोंबकळणाºया तारांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहे. असे असतांनाही विज वितरण कंपनीकडून अद्याप पावेतो कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देखेडलेझुंगे : विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष

खेडलेझुंगे : कोळगांव, रु ई, खेडलेझुंगे, धारणगांववीर व खडक, सारोळेथडी परिसरात विज वितरण कंपनीच्या लोंबकळणाºया तारांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहे. असे असतांनाही विज वितरण कंपनीकडून अद्याप पावेतो कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.या परिसरामध्ये विजेचा शॉक बसुन एप्रिल मध्ये बाळासाहेब पाठक आणि मागील महिन्यात कोळगांव येथील गोविंद गवळी तर शिरवाडे वाकद येथील लिलाबाई वाघ यांनी जीव गमावला आहे. याघटनेसंदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये दखलपात्र गुन्ह्यांची नोंद देखील करण्यात आलेली आहे. तरीही विज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचारी वर्गाकडुन गांभीर्याने घेतल्याचे दिसुन येत नसल्याचे चित्र दिसत आहे.कोळगांव रोडलगत विक्र म घोटेकर यांच्या शेतात असलेले रोहीत्र हे उघड्या स्वरुपात आहे, त्यामुळे मोठी दुर्घटना घडु शकते. यासारखे अनेक शेतकºयांच्या शेतावरील, रोडच्या लगत असलेल्या डिपींच्या अवस्था अत्यंत दयनीय आहे. डीपीचा पत्रा सडलेल्या स्वरु पात आहे.पावसाचे आगमन सुरु झाले की विज वितरण कंपनीची बत्ती गुल होते, ती ८-१५ दिवसांनी पुर्ववत होते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला पाणीपुरवठा सारख्या अत्यंत महत्वाचे विभागतील कामकाज करणे अवघड होवुन बसते.अधिकारी वर्गाशी संपर्क केला असता होवुन जाईल, माणसं पाठविलेली आहेत, आवाज येत नाही, बघुन घेतो, तुम्हाला का माहीती द्यावी या सारखी उत्तरे ऐकावयास मिळातात असे स्थानिक रहीवाशांकडुन सांगितले जाते.धारणगांव वीर येथील गणेश बोडके यांच्या शेतातुन दोन पोलमधील विद्युत तारा इतक्या प्रमाणात लोंबकळलेल्या आहेत की, त्यावर बसुन झोका खेळता येईल. जमीनीपासुन अवघ्या ४-५ फुट अंतरावर तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे शेती करणे अत्यंत जिकिरीचे झालेले आहे. शेतीची कामे करतांना डिपी आॅफ केली जाते. शेती काम होईपर्यंत घरातील एक सदस्य डीपीजवळ बसवुन ठेवावा लागतो. याबाबत संबंधीत वायरमन यांना वारंवार सांगुनही काही उपयोग झाला नाही, असे बोडके यांनी सांगीतले.धारणगांववीर येथील कृष्णा सोनवणे यांच्या तर घरावर तारा लटकत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात हक्काचे घर असुनही जीव मुठीत धरु न रहावे लागत आहे.याबाबत वारंवार लेखी अर्ज करु नही विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी डोळे झाक करत आहे. घरावरील तारा काढुन घेण्यासाठी लागणारा विद्युत पोल हा परिसरातील काम पुर्ण झाल्यानंतर तिरपा झालेला पोल हा स्वखर्चाने आणुन सरळ करु न ठेवलेला आहे. या पोलासाठी आर्थिक देवाण-घेवाणही झालेली असुन देखील अद्याप पावेतो सदरचा पोल रोवुन विद्युत तारा घरावरु न स्थलांतरीत केलेल्या नाहीत. त्यामुळे सदरचा शेतकºयाने नाराजी व्यक्त केली आहे.धारणगांव खडक येथील शेतकरी केशव दत्तात्रय पेंढारे यांच्या शेतात मागील मिहन्याच्या सुरवातीला झालेल्या वादळी पावसात पोल पडलेला आहे. त्याची दुरु स्ती अद्याप पावेतो करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी शेती कामे करतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच केशव पेंढारे यांचे बायपास झालेले आहे. विहीरीला भरपुर पाणी असुनही त्यांना पाणी काढता येत नाही. जमिनीपासुन अवघ्या दोन फुटापर्यंत तारा झोका घेत आहेत. याबाबत लेखी देवुनही विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी कामात कुचराई करत आहेत.बोरमाथा वस्ती ते खेडलेझुंगे रस्त्यावर डिपी असुन तीची अवस्थ अत्यंत दयनीय झालेली आसुन त्या डिपी ते पोलामधील तारा लोंबकळत असल्याने तात्पुर्ती उपाय योजना म्हणुन बांबु लावण्यात आलेला आहे. या रस्त्याने विद्यार्थी, रहिवाशी, शेतकºयांची मोठी वर्दळ असते. याबाबत वारंवार कळवुनही त्याकडे अधिकारी डोळेझाक करीत आहे.- प्रमोद गिते, शेतकरी.माझ्या शेतात या दोन पोल मधील विद्युत तारांचे झोळ मागील वर्षापासुन असुन याबाबत संबंधीत वायरमन यांना वारंवार कळवुनही सदरचे काम अपुर्ण स्थितीत आहे. त्यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. कर्मचाºयांकडुन नेहमीच उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने अपमानास्पद वागणुक मिळाली.- गणेश बोडके, शेतकरी, धारणगांववीर.