शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

ग्रामीण भागात ग्रामस्थांचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:08 AM

खामखेडा : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातदेखील संचारबंदीचे आदेश देण्यात आल्याने नगर, महानगरात प्रशासनाला नियंत्रण मिळविता आले आहे. लोक किमान घरामध्ये थांबले आहेत. संपर्क टळू लागला आहे.

ठळक मुद्देखेडोपाडी पोलिसांचा वॉच नसल्याने लोक घोळक्याने बसत असल्याचे दुर्दैवी चित्र

लोकमत न्यूज नेटवर्कखामखेडा : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातदेखील संचारबंदीचे आदेश देण्यात आल्याने नगर, महानगरात प्रशासनाला नियंत्रण मिळविता आले आहे. लोक किमान घरामध्ये थांबले आहेत. संपर्क टळू लागला आहे.याउलट चित्र ग्रामीण भागातील काही गावांमध्ये दिसून येत असून, पारांवर गप्पांचे फड रंगल्याचे आणि ग्रामस्थांचा मुक्त संचार सुरू आहे. पोलीस प्रशासनाने शहरी भागातील गस्त वाढविली मात्र खेडोपाडी पोलिसांचा वॉच नसल्याने लोक घोळक्याने बसत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. साथ आटोक्याबाहेर गेल्यास ग्रामीण जीवनाच्या अघळपघळ सवयींमुळे मार्ग खडतर मानला जात आहे.ग्रामीण भागात घरे छोटी छोटी व जवळ जवळ असतात. संपूर्ण गाव हे एका घरासारखे असते. साहजिकच सर्वांचे एकमेकांशी उठणे बसणे असते. अद्याप ग्रामीण भागात या विषाणूचा संसर्ग झालेला नाही. शिवाय ग्रामीणमध्ये काही गावांत तेवढे गांभीर्यानेही घेतले गेले नाही. त्यामुळे लोक सकाळ-संध्याकाळी घोळक्या-घोळक्याने बसत आहेत.शाळांना सुटी असल्याने लहान मुले सर्रास गावभर खेळत आहे. ही बाब अत्यंत घातक ठरू शकते. ग्रामीण भाग हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत भाग आहे. शिवाय शेतकरी, शेतमजुरांचा भरणा या भागात जास्त आहे. या ठिकाणी साथ पोहोचल्यास ती घराघरात पोहचायला वेळच लागणार नाही. खेड्यातील जीवन हे एकमेकांशी निगडित आहे. पुणे-मुंबई किंवा इतर शहरातून गावी येणाºया लोकांची संख्यादेखील लक्षणीय आहे. या लोकांची आरोग्य केंद्रात नोंद करून त्यांची तपासणी केली जात आहे आणि त्यांना घरी बसण्याचा सल्ला देऊन इतरांच्या संपर्कात येऊ नका असे सांगितले जात आहे तरीदेखील काही लोक बाहेर वावरताना दिसून येत आहे. ग्रामीण भागातही सक्तीच्या उपाययोजना न केल्यास शहरांपेक्षाही हा भाग सर्वाधिक भरडला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या