शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नवसमाज निर्मितीकडे होणारी वाटचाल हेच वारीचे संचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 12:39 AM

पंढरपूरची वारी ही खरी महाराष्टÑाची लोकसंस्कृती आहे. या वारीत खऱ्या अर्थाने राष्टÑीय एकात्मतेचे दर्शन आपल्याला घडते. वारीचे रूप आपल्याला विराट आणि विस्तीर्ण दिसते. कारण महाराष्टÑातील खेड्यापाड्यांतून आणि वाडी-वस्त्यांमधून वारकरी या वारी सोहळ्यात सहभागी होतात. अनेक जण तन- मन-धनाने यात सामील होतात.

ठळक मुद्देदूरवरच्या भागातून पंढरीच्या दिशेने शेकडो मैल चालत राहतात.

 

 

 

 

 

पंढरपूरची वारी ही खरी महाराष्टÑाची लोकसंस्कृती आहे. या वारीत खऱ्या अर्थाने राष्टÑीय एकात्मतेचे दर्शन आपल्याला घडते. वारीचे रूप आपल्याला विराट आणि विस्तीर्ण दिसते. कारण महाराष्टÑातील खेड्यापाड्यांतून आणि वाडी-वस्त्यांमधून वारकरी या वारी सोहळ्यात सहभागी होतात. अनेक जण तन- मन-धनाने यात सामील होतात. महाराष्टÑातील अनेक भागात त्या त्या भागातील संतांच्या पालख्यांसमवेत वारकऱ्यांच्या दिंड्या दरकोस दर मुक्काम चालत राहतात. आळंदीहून संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी निघते, तर देहूहून संत तुकोबारायांची पालखी मार्गस्थ होते. त्र्यंबकहून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांची पालखी येते. त्याचप्रमाणे संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज यांच्या पालख्या मराठवाडा, खान्देश, विदर्भ अशा दूरवरच्या भागातून पंढरीच्या दिशेने शेकडो मैल चालत राहतात. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश अशा विविध प्रांतांमधूनदेखील वारकरी वाहनांमधून पंढरपुरात दाखल होतात. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक प्रांताच्या सीमेवर महाराष्टÑातील हे तीर्थक्षेत्र अन्य भाषिक राज्यातील लोकांचे तीर्थस्थान आहे. किंबहुना पिढ्यान पिढ्यापासून ‘विठ्ठल’ हे त्यांचे दैवत आहे. पद्मपुराणात पंढरपूरचा अपूर्व महिमा गायला आहे. पंढरपूरची मूर्ती ही स्थापन केलेली नाही तर स्वयंभूआहे, असाही उल्लेख काही ग्रंथांमध्ये केलेला आढळतो.महत्त्वाची गोष्ट ही आहे की, पंढरपूरची वारी आणि वारकरी पंथ अनादी आहे. महाराष्टÑाची संपूर्ण लोकसंस्कृती वारकरी संप्रदायात सामावलेली आहे. महाराष्टÑात आज अनेक पंथ, संप्रदाय आहेत, परंतु वारकरी संप्रदायाचा विस्तार अगदी खेड्यापाड्यात झालेला आहे. जुने जाणते लोक तर वारकरी संप्रदायात आहेतच, परंतु नवतरुणदेखील या वारकरी संप्रदायात सहभागी होत आहेत. याला एक कारण म्हणजे वारी होय. मी स्वत: वयाच्या १८ वर्षांपासून सहभागी होत आहे आणि त्याची अतिशय चांगली अनुभूती घेत आलो आहे.गेली ५० वर्षे मी पंढरीची वारी करीत आहे. वारीमध्ये आम्हाला खºया अर्थाने राष्टÑीय एकात्मतेचे दर्शन घडते. वारकरी संप्रदाय सर्व जाती, पंथ आणि धर्माचेदेखील संत होऊन गेले आहेत. वारकरी संप्रदायातील संतांनी नेहमी मानव कल्याणाचा आणि विश्वकल्याणाचा विचार मांडला आहे. तरुण कीर्तनकार, प्रवचनकार वारीमध्ये याच संतविचारांचा प्रचार आणि प्रसार करीत असतात.‘बैसू जिवे एके ठायी’ असे संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात. प्रत्येकाची काया, वाचा, मती म्हणजेच शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धी या वारीमुळे घडून येते. सध्याच्या काळात चंगळवाद वाढला आहे. परंतु वारीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक वारकरी हा भौतिक सुखापासून दूर असतो.त्याला ओढ असते ती अध्यात्माची. त्यामुळे त्याच्या गरजा कमी असतात. प्रतिकूल परिस्थितीतही तो राहू शकतो. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची पर्वा न करता शेकडो मैल अंतर चालत राहतो. पंढरीच्या वारीत सहभागी झालेला झोपडीतील गरीब माणूस आणि बंगल्यातील श्रीमंतदेखील येथे समान असतो.वारीमध्ये सहभागी झालेले भाविक खेड्यापाड्यातून आलेले असून अशिक्षित असले तरीही त्यांच्यात सर्व निती नियमांची जाणीव असते़ त्यामुळे वारीच्या नियमाचे ते पालन करतात़ पांडुरंगावर भाव ठेवून नियमितपणे ते वाटचाल करत राहतात़ त्याचवेळी ठिकठिकाणी दिंडीत सहभागी झालेले वारकरी हा संतांचा विचार ऐकत चालत राहतात. पंढरपूरनजीक वाखारी येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र जमतात, ‘संत सज्जनांचा जमला मेळा, अवघा रंग एक झाला’ असा तो अनुपम्य सोहळा असतो. वारकरी हा पंढरीकडे वाटचाल करतो म्हणजे तो केवळ वाट चालत नाही तर नवसमाजनिर्मितीची वाट दाखवितो, असे म्हणावे लागेल आणि हेच वारीचे संचित आहे.(लेखक संत साहित्याचेअभ्यासक आहेत.) डॉ. रामकृष्ण महाराजलहवितकर