शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

कांदा व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांना वेठीस धरलंय, राधाकृष्ण विखे-पाटलांचा आरोप

By संकेत शुक्ला | Updated: July 27, 2024 18:31 IST

नाशिक येथे पक्षाच्या अंतर्गत आढावा बैठकीसाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला.

नाशिक : भारतीय कांद्याला जगभरात मोठी बाजारपेठ आहे. आजही निर्यातीसाठी ५ लाख कांद्याची गरज आहे. शेतकऱ्यांकडे कांद्याचा साठाही आहे. परंतु व्यापाऱ्यांनी निर्यात मूल्याच्या मुद्द्यावर कांदा अडवून ठेवला आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम व्यापाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. 

नाशिक येथे पक्षाच्या अंतर्गत आढावा बैठकीसाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले की कांद्याच्या दराबाबतच शेतकरी आणि व्यापारी असे दोन मतप्रवाह आहेत. ते शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक आहे. निर्यातीसाठी कांदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. निर्यातमूल्य कमी करण्यासाठी पीयूष गोयल यांच्याकडे मागणी केली आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल असेही ते म्हणाले.

शरद पवार यांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टिकेविषयी विचारले असता पवार सध्या वैफल्यग्रस्त आहेत. ज्येष्ठ नेत्याने अशी टीका करू नये. बॉम्बस्फोटातील आरोपी समवेत त्यांनी केलेला विमान प्रवास सगळ्यांनाच ज्ञात आहे. परंतु आता अशा टीका करणे योग्य नाही. त्यांनीही याची जाण ठेवायला हवी अशी अपेक्षा विखे पाटील यांनी व्यक्त केली. लोकसभेला वेगळे चित्र होते, आता विधानसभेत वेगळे असेल, राज्यात नक्कीच महायुतीचे सरकार येईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

लाडकी बहीण साठी निधीची कमतरता नाहीराज्य शासनाने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना सादर करण्यापूर्वी अर्थ खात्याशी संवाद साधला नाही, या योजनेसाठी पैसे नाहीत अशा चर्चा सुरू असताना महसूल मंत्री विखे पाटील यांनी मात्र त्याचा साफ इन्कार केला आहे. राज्य शासनाकडे पुरेसा पैसा आहे. निधीची कोणतीही चिंता नाही. ठरवल्यानुसार बहिणींच्या खात्यात रक्कम नक्कीच येईल असा दावाही त्यांनी केला.

शरद पवारांवर टीकाशरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.त्या काळात त्यांनी काय केलेले हे सर्वांना माहीत आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी काय केले हे त्यांनी सांगावे. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची हाच त्यांचा आजवरचा उद्योग असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलonionकांदाNashikनाशिक