निर्यातबंदी उठताच कांदा दरात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:34 PM2020-02-27T12:34:02+5:302020-02-27T12:34:20+5:30

लासलगाव : केंद्र सरकारने निर्यातबंदी उठविताच येथील बाजार समिती आवारात कांदा दरात ३५० रूपयांची तेजी झाली. कमाल भाव २३५२ रूपये जाहीर झाला.

 Onion prices rise sharply after export ban | निर्यातबंदी उठताच कांदा दरात तेजी

निर्यातबंदी उठताच कांदा दरात तेजी

Next

लासलगाव : केंद्र सरकारने निर्यातबंदी उठविताच येथील बाजार समिती आवारात कांदा दरात ३५० रूपयांची तेजी झाली. कमाल भाव २३५२ रूपये जाहीर झाला. बाजारभावातील घसरण थांबविण्यासाठी कांद्यावरील निर्यातबंदी उठवली असल्याचे ट्विट केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी बुधवारी केले होते. त्यानंतर गुरूवारी सकाळी लाल कांदा आवक १५०४८ क्विंटल झाली असून बाजारभाव रु पये प्रति क्विंटल किमान १००० ते कमाल २३५२ व सरासरी २००० रूपये जाहीर झाले. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी शंभर रूपयांची कांदा भावात घसरण झाली होती. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी १२६० वाहनातील १७२४८ क्विंटल आवक झाली. लाल कांदा किमान ९०१ ते कमाल २००१ व सरासरी १७५० रूपये भावाने विक्र ी झाला.तर सोमवारी लासलगांवी २५०४४ क्विंटल लाल कांदा किमान १००० ते कमाल २१११ व सरासरी १८५१ रूपये भावाने विक्र ी झाला होता. आता कांदा निर्यात बंदी उठवली असल्याने कांदा भावात सुधारणा होण्याची शक्यता आहे.  बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात घसरन सुरु आहे.अवकाळी पावसाने कांदा उत्पादनात घट झाल्याने मिळणारे दर हे शेतकरी वर्गाला परवडत नसल्याने केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवुन आणि कांदा साठवणुकीची मर्यादा रद्द करण्याची मागणी होत होती.दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर बंदी उठवली जाईल अशी चर्चा होती. लासलगांव मुख्य बाजार समितीसह, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर दररोज साधारणत: २० ते २५ हजार क्विंटल अली खरीप कांद्याची विक्र ी होत आहे. परंतु माहे सप्टेंबर, २०१९ पासुन संपुर्ण देशभरात कांदा आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारातील कांदा दरवाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या बाणज्यि व उद्योग मंत्रालयाने दि. २९ सप्टेंबर, २०१९ चे अधिसूचनेनुसार भारतातून होणा-या सर्व प्रकारच्या कांद्याचे निर्यातीस प्रतिबंध केला होता. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दि. ३ डिसेंबर २०१९ चे आदेशानुसार देशभरातील घाऊक व्यापा-यांना २५० क्विंटलपर्यत (२५ मे. टन) व किरकोळ व्यापा-यांना २५ क्विंटलपर्यंत (०५ मे. टन) कांदा साठवणुकीची मर्यादा लागु केली.
----------------------
उशीरा की होईना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठविली आहे. चीनमधुन कांदा निर्यात बंदी कोरोनामुळे आहे. त्यामुळे परत परदेशी बाजारपेठेत आपले वर्चस्व कायम करण्यासाठी ही निर्यात बंदी उठणे फारच गरजेचे होते.आता या निर्णयाचा फायदा लवकरच कांदा बाजार भावात होत असलेली घसरण थांबुन भावात सुधारणा झाली असली तरी अजुन होऊ शकते .
-सुवर्णा जगताप, सभापती, बाजार समिती लासलगाव

Web Title:  Onion prices rise sharply after export ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक