शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

नऊ दिवसांत कांदा भाव निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:38 IST

लासलगाव : कोरोनाचा कहर, लॉकडाऊनची परिस्थिती, कांदापुरवठा अधिक, तर मागणीत घट या कारणामुळे कांद्याचे भाव १३०० रुपयांपर्यंत आले असून सध्या कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, परराज्यांतील कांदा आता बाजारात यायला सुरुवात व मागणीत घट होत असल्यामुळे दि. १ मार्चच्या तुलनेत कांदा दर निम्म्यावर आले आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्रीयन कांद्यास मागणी कमी झाली.

लासलगाव : कोरोनाचा कहर, लॉकडाऊनची परिस्थिती, कांदापुरवठा अधिक, तर मागणीत घट या कारणामुळे कांद्याचे भाव १३०० रुपयांपर्यंत आले असून सध्या कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, परराज्यांतील कांदा आता बाजारात यायला सुरुवात व मागणीत घट होत असल्यामुळे दि. १ मार्चच्या तुलनेत कांदा दर निम्म्यावर आले आहेत.राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कोलकाता या राज्यांत कांदा आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे महाराष्ट्रीयन कांद्यास मागणी कमी झाली. परिणामी, भाव कोसळले आहेत. त्यातही मध्यंतरी भाव वाढल्यामुळे शेतकरी कच्चा कांदा विक्रीला आणत आहेत. तसेच लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. अनेक जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे प्रशासनाने निर्बंध कडक केल्याने हॉटेलमध्ये गर्दी कमी झाल्याने कांद्याच्या मागणीत घट झाली आहे.वर्षभरापूर्वी कांद्याने किलोला शंभरी पार केली होती. परिणामी, शेतकऱ्यांनी चढ्या भावाने बियाणे व कांदा रोपे विकत घेऊन लागवड केली. कांदा लागवड क्षेत्र वाढले. त्यातच ४० ते ५० रुपये किलोवर असणारे भाव घाऊक बाजारात १२ ते १५ रुपयांवर आल्यावर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. मिळणाऱ्या दरातून झालेला खर्चही निघत नसल्याने कांद्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी काढले आहे.येथील मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याला कमीतकमी ५०० रुपये, सरासरी १३५१, तर जास्तीतजास्त १४३० तर उन्हाळी कांद्याला कमीतकमी ९०० रुपये, सरासरी १२५०, तर जास्तीतजास्त १३७२ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.लाल कांदा कमाल भाव आलेख (प्रति क्विंटल)१ मार्च - २८५३२ मार्च - २७४१४ मार्च - २४४५५ मार्च - २११२६ मार्च - २०५२८ मार्च - १७६१९ मार्च - १४३०१० मार्च - १२५०कांदा भावाची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे आता नाफेडने कांदा स्थिरीकरण निधीतून कांदा खरेदी सुरू केली पाहिजे. त्याचा परिणाम बाजारपेठेत भाव वाढण्यासाठी होणार आहे. हॉटेल व्यवसायावर तसेच विवाहात सामील लोकांच्या संख्येत घट झाली आहे. त्याचा फटका कांदा उत्पादकांच्या भावावर झाला आहे.- सुवर्णा जगताप, सभापती, बाजार समिती, लासलगाव

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा