शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

फेब्रुवारीतही कांदा लागवड सुरूच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 1:02 PM

पाटोदा :- फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम सुरु होतो मात्र यंदा गेल्या पंधरा वीस वर्षाच्या कालखंडात कांदा पिकाला उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकरी वर्गाला चांगला फायदा झाल्यामुळे शेतकर्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला असून कांदा लागवडीला वेग आलेला आहे.

पाटोदा :- फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम सुरु होतो मात्र यंदा गेल्या पंधरा वीस वर्षाच्या कालखंडात कांदा पिकाला उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकरी वर्गाला चांगला फायदा झाल्यामुळे शेतकर्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला असून कांदा लागवडीला वेग आलेला आहे. फेब्रुवारी मिहन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी येवला तालुक्यात कांदा लागवड सुरूच आहे.तालुक्यात यंदा विक्र मी २१ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर कांदा लागवड झाली असून अजून पंधरा दिवस हि कांदा लागवड सुरूच राहण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने कांदा लागवड क्षेत्रात वाढ होऊन उत्पादन वाढणार आहे. कांदा लागवडी साठी शेतकरी वर्गाने एकरी साठ ते पासष्ट हजार रु पये खर्च केले आहे. आगामी काळात कांदा उत्पादन जास्त तर मागणीत घट येणार असल्याने दर कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.उन्हाळ कांद्याची लागवड आॅक्टोबर नोव्हेंबर जास्तीत जास्त डिसेंबर मिहन्यापर्यंत केली जाते मात्र आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने रांगडा व उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी दुबार रोपे टाकत शेतात कांदा लागवडीला प्राधान्य दिले आहे. सध्या कांदा रोपाचा भाव गगनाला भिडला असून एकरी चाळीस हजार रपये प्रमाणे रोपे उपलब्ध करीत शेतकरी कांदा लागवड करीत असल्याचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक