शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

कांदा आवक झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 22:46 IST

लासलगाव : गेली काही दिवस लासलगाव सह नाशिक जिल्ह्यात सर्वच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारावर कमी झालेली कांदा आवक पाहता खरोखरच कांदा शिल्लक नाही की शेतकरी बांधवांनी आता कांदा निर्यात बंदीमुळे व विविध निर्णयामुळे कांदा उत्पादकांच्या आर्थिक फटका पाहता एक प्रकारे बाजारात कांदा न आणता सत्तारूढ पक्षाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर संतापाची सलामी देण्याची रणनिती आहे. हे येत्या काही दिवसांतच समजून येणार आहे.

ठळक मुद्देसरकारला सलामी देण्यासाठी अघोषीत आवक बंदी?

शेखर देसाईलासलगाव : गेली काही दिवस लासलगाव सह नाशिक जिल्ह्यात सर्वच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारावर कमी झालेली कांदा आवक पाहता खरोखरच कांदा शिल्लक नाही की शेतकरी बांधवांनी आता कांदा निर्यात बंदीमुळे व विविध निर्णयामुळे कांदा उत्पादकांच्या आर्थिक फटका पाहता एक प्रकारे बाजारात कांदा न आणता सत्तारूढ पक्षाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर संतापाची सलामी देण्याची रणनिती आहे. हे येत्या काही दिवसांतच समजून येणार आहे.सरकारी बाबु जे निर्णय घेतात ते केवळ शहरी लोकांना कांदा योग्य भावात मिळाला पाहीजे यासाठी परंतु कांदा भाव पडतात तेव्हा लवकर केंद्र सरकार ढुंकूनही पाहत नाही हा अनुभव नेहमीच आलेला आहे.कांदा आवक कमी झाल्याने आता केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना पत्र पाठवीत कांदा आवक व उपलब्धता याचे नियोजन मागवले आहे. काही कांदा व्यापारी इजिप्तचा कांदा आणीत आहे. तर कांदा आवक कमी होत असल्याचे पाहुन आता आयातीचा लवकरात लवकर कांदा आणुन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.केंद्र सरकार करणार २००० टन कांद्याची आयात लवकर करून लासलगाव बाजारातील तुटवडा भरून काढण्यासाठी नवा मार्ग शोधला जात आहे. आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणजेच लासलगाव. बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या एम एम टी सी कंपनीकडून २००० टन कांद्याची आयात करण्यासाठी एक निविदा जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येकी टनामागे ३५२ इतकी मोठी रक्कम खर्च करण्याची तयारी आहे. साधारणत: आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस ही आयात केली जाईल असे खात्रीशी समजते.परंतु हा कांदा आयात केला तर आज शहरी ग्राहकांना दिलासा मिळेल. परंतु कांदा उत्पादक सरकार विरोधात जातील अशी भिती आहे. ही दिवसात एपीएमसी मार्केट मध्ये सुद्धा सातत्याने कांद्याचे भाव वाढतात होते, परिणामी देशात एका वेळी कांद्याने शंभरी गाठल्याचे देखील समजत होते.यंदा दाक्षिणात्य भागात पावसामुळे कांद्याचे उत्पादन घटले. उत्तरेकडील राज्यात देखील खरीप पैकी अजून बाजारात आली नसल्याने व महाराष्ट्रात अजुन लाल कांद्याची आवक सुरू झालीनाही.ती होताच भाव कमी होतील असे दिसत असले तरी नवीन येणारे कांदा पिक काही दिवस चांगला भाव देईल असे जाणकारांनी सांगितले आहे.सोमवारी लासलगांव बाजार समतिीत कांदा आवकेत कमालीची घट होऊन केवळ १५९ वाहनातील १८७२ क्विंटल कांदा किमान १००० ते कमाल ३८२५ व सरासरी ३६०० रूपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाले.आवक कमी झाल्याने भावात काही प्रमाणात सुधारणा झाली.दसऱ्यानिमित्त मंगळवारी (दि.८) सार्वजनिक सुट्टी असल्याने कांदा व धान्य लिलाव बंद राहतील असे बाजार समितीच्या वतीने सांगितले आहे.काल गुरूवारी मंगळवारच्या तुलनेत ४२१ रूपयांची घसरण होत ३०२० हा सर्वाधिक भाव लिलावात सकाळी जाहीर झाला. त्यामुळे कांदा उत्पादकात नाराजीचा सूर दिसुन आला.दिनांक ३ आॅक्टोबर रोजी २२० वाहनातील उन्हाळ कांदा १२५२ ते २७००-३०२० मंगळवारी ३३५ वाहनातील ४१३९ क्विंटल कांदा १२५२ ते ३४४१ रूपये भावाने व सरासरी ३२०० रूपये भावाने विक्र ी झाला होता.देशांतर्गत कांद्याचे किरकोळ बाजारात वाढते बाजार भाव कमी व्हावे यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली देशांतर्गत बाजारात कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या होलसेल व्यापाºयांकडे कांद्याच्या साठ्यावर ५०० क्विंटल तर किरकोळ व्यापाºयांकडे १०० क्विंटल पर्यंत साठवणूक करण्याची मर्यादा आणली आहे.गेल्या दोन-तीन वर्षानंतर कांद्याला चांगले बाजार भाव यंदा मिळत असताना केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घाईगर्दीत निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.(फोटो ०८ लासलगाव)

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी