शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

कांदा आवक झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 22:46 IST

लासलगाव : गेली काही दिवस लासलगाव सह नाशिक जिल्ह्यात सर्वच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारावर कमी झालेली कांदा आवक पाहता खरोखरच कांदा शिल्लक नाही की शेतकरी बांधवांनी आता कांदा निर्यात बंदीमुळे व विविध निर्णयामुळे कांदा उत्पादकांच्या आर्थिक फटका पाहता एक प्रकारे बाजारात कांदा न आणता सत्तारूढ पक्षाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर संतापाची सलामी देण्याची रणनिती आहे. हे येत्या काही दिवसांतच समजून येणार आहे.

ठळक मुद्देसरकारला सलामी देण्यासाठी अघोषीत आवक बंदी?

शेखर देसाईलासलगाव : गेली काही दिवस लासलगाव सह नाशिक जिल्ह्यात सर्वच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारावर कमी झालेली कांदा आवक पाहता खरोखरच कांदा शिल्लक नाही की शेतकरी बांधवांनी आता कांदा निर्यात बंदीमुळे व विविध निर्णयामुळे कांदा उत्पादकांच्या आर्थिक फटका पाहता एक प्रकारे बाजारात कांदा न आणता सत्तारूढ पक्षाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर संतापाची सलामी देण्याची रणनिती आहे. हे येत्या काही दिवसांतच समजून येणार आहे.सरकारी बाबु जे निर्णय घेतात ते केवळ शहरी लोकांना कांदा योग्य भावात मिळाला पाहीजे यासाठी परंतु कांदा भाव पडतात तेव्हा लवकर केंद्र सरकार ढुंकूनही पाहत नाही हा अनुभव नेहमीच आलेला आहे.कांदा आवक कमी झाल्याने आता केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना पत्र पाठवीत कांदा आवक व उपलब्धता याचे नियोजन मागवले आहे. काही कांदा व्यापारी इजिप्तचा कांदा आणीत आहे. तर कांदा आवक कमी होत असल्याचे पाहुन आता आयातीचा लवकरात लवकर कांदा आणुन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.केंद्र सरकार करणार २००० टन कांद्याची आयात लवकर करून लासलगाव बाजारातील तुटवडा भरून काढण्यासाठी नवा मार्ग शोधला जात आहे. आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणजेच लासलगाव. बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या एम एम टी सी कंपनीकडून २००० टन कांद्याची आयात करण्यासाठी एक निविदा जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येकी टनामागे ३५२ इतकी मोठी रक्कम खर्च करण्याची तयारी आहे. साधारणत: आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस ही आयात केली जाईल असे खात्रीशी समजते.परंतु हा कांदा आयात केला तर आज शहरी ग्राहकांना दिलासा मिळेल. परंतु कांदा उत्पादक सरकार विरोधात जातील अशी भिती आहे. ही दिवसात एपीएमसी मार्केट मध्ये सुद्धा सातत्याने कांद्याचे भाव वाढतात होते, परिणामी देशात एका वेळी कांद्याने शंभरी गाठल्याचे देखील समजत होते.यंदा दाक्षिणात्य भागात पावसामुळे कांद्याचे उत्पादन घटले. उत्तरेकडील राज्यात देखील खरीप पैकी अजून बाजारात आली नसल्याने व महाराष्ट्रात अजुन लाल कांद्याची आवक सुरू झालीनाही.ती होताच भाव कमी होतील असे दिसत असले तरी नवीन येणारे कांदा पिक काही दिवस चांगला भाव देईल असे जाणकारांनी सांगितले आहे.सोमवारी लासलगांव बाजार समतिीत कांदा आवकेत कमालीची घट होऊन केवळ १५९ वाहनातील १८७२ क्विंटल कांदा किमान १००० ते कमाल ३८२५ व सरासरी ३६०० रूपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाले.आवक कमी झाल्याने भावात काही प्रमाणात सुधारणा झाली.दसऱ्यानिमित्त मंगळवारी (दि.८) सार्वजनिक सुट्टी असल्याने कांदा व धान्य लिलाव बंद राहतील असे बाजार समितीच्या वतीने सांगितले आहे.काल गुरूवारी मंगळवारच्या तुलनेत ४२१ रूपयांची घसरण होत ३०२० हा सर्वाधिक भाव लिलावात सकाळी जाहीर झाला. त्यामुळे कांदा उत्पादकात नाराजीचा सूर दिसुन आला.दिनांक ३ आॅक्टोबर रोजी २२० वाहनातील उन्हाळ कांदा १२५२ ते २७००-३०२० मंगळवारी ३३५ वाहनातील ४१३९ क्विंटल कांदा १२५२ ते ३४४१ रूपये भावाने व सरासरी ३२०० रूपये भावाने विक्र ी झाला होता.देशांतर्गत कांद्याचे किरकोळ बाजारात वाढते बाजार भाव कमी व्हावे यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली देशांतर्गत बाजारात कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या होलसेल व्यापाºयांकडे कांद्याच्या साठ्यावर ५०० क्विंटल तर किरकोळ व्यापाºयांकडे १०० क्विंटल पर्यंत साठवणूक करण्याची मर्यादा आणली आहे.गेल्या दोन-तीन वर्षानंतर कांद्याला चांगले बाजार भाव यंदा मिळत असताना केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घाईगर्दीत निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.(फोटो ०८ लासलगाव)

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी