शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

इगतपुरी : २० वर्षांपूर्वीचे भेंडीचे झाड रिक्षावर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 17:13 IST

सुदैवाने रिक्षात प्रवासी वा चालक नव्हते नाहीतर मोठी हानी झाली असती परंतु रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नाशिक :  पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडत असतो परंतु या वेळी तालुक्यात उशिराने पावसाला सुरुवात केली असली तरी गेल्या दोन दिवसांपासून सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी येथे रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या रिक्षावर वृक्ष पडल्याने रिक्षाची मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि जोरदार सोसाट्याच्या वा-यासह पावसाला सुरुवात झाल्याने आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास जुन्या आग्रारोडवरील राम मंदिराच्या पुढे सुमारे २० वर्षांपूर्वीचे  भेंडीचे झाड  रिक्षावर कोसळले सुदैवाने रिक्षात प्रवासी वा चालक नव्हते नाहीतर मोठी हानी झाली असती परंतु रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान अगोदरच कोरोना-१९ या जीवघेण्या आजाराने नागरिक त्रस्त झाले त्यात लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. कुठेतरी शिथिलता मिळाल्याने रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र या रिक्षावरच भलेमोठे भेंडीचे झाड पडल्याने या रिक्षा चालकासमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यानच्या काळात सकाळी मुख्य बाजारपेठेतील रस्ता असल्याने काही प्रमाणात वाहतूकीवर परिणाम झाला होता. परंतु नगर परिषदेच्या अग्नीशामक गाडीचे चालक व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरीत येऊन हे मुख्य रस्त्यावर पडलेले भेंडीचे झाड बाजूला सारून रस्ता मोकळा करून दिला परंतु या कर्मचाऱ्यांना नगर परिषदेने झाड तोडण्यासाठी कुठल्याही प्रकारचे साहित्य दिले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकauto rickshawऑटो रिक्षाRainपाऊस